घरात वाईट शब्द बोलल्याने काय होते? जाणून थक्क व्हाल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

घरातील सर्व सदस्य मिळून एक घर बनलेले असते घरातील सर्व सदस्य एकमेकांसोबत प्रेमाने राहतात व सर्व सदस्यांना बाबत सर्वांना सर्व काही माहीत असते. सर्व सदस्यांना बाबत आपल्याला प्रेम व आपुलकी असते परंतु घर म्हटले की भांड्याला भांडे लागतेच.

कधीकधी थोड्या थोड्या गोष्टीवरून एकमेकांमध्ये भांडण होते कधीकधी एकमेकांचे मत एकमेकांना पटत नाही कधीकधी वाद विकोपाला जातात व एकमेकांना खूप वाईट म्हटले जाते. अपशब्द बोलले जातात कधी कधी तर इतका राग आलेला असतो की रागाच्या भरात मध्ये आपण आपल्याच माणसांना खूप वाईट अपशब्द बोलून जातो.

कधीकधी आपल्या या अपशब्द दान मागे आपला असा काही हेतू नसतो परंतु आपल्या कामाचा त्रास ऑफिस मधील टेन्शन व इतर आर्थिक समस्या यामुळे ते सर्व संकटे आपल्या तोंडातून अपशब्दाचा रूपात बाहेर पडतात. आपण कधी कधी नकळत खूप वाईट बोलून जातो व आपल्या तोंडातून आपल्या कुटुंबातील व्यक्तीचे अहीत व्हावे व खूप वाईट व्हावे असे बोलून जातो.

तुझ कधीही चांगल होणार नाही तू मरून जाणार किंवा तुझ्यावर नेहमी संकट येत राहतील अशा प्रकारे आपण खूप काही अपशब्द आणि काही ही आपल्या कुटुंबातील व्यक्तींनाच बोलत असतो. आपल्याला हे माहिती आहे का की आपले घर म्हणजे असतो यामध्ये वास्तुपुरुष नीवास करत असतो आणि दिवसातून एक वेळा तथास्तू म्हणत असतो.

म्हणजेच आपण जर एका वेळेस आपल्या घरातील सदस्यांना वाईट-साईट बोलत असलो आणि त्याच वेळी घरातील वास्तुपुरुष तथास्तु असे म्हणाले तर त्या गोष्टीची खरी फळे आपल्याला मिळतात. म्हणजे आपण जे बोलतो ते त्या व्यक्तीला लागू होतं. असे झाल्यास घरातील तो सदस्य आजारी पडू शकतो. आर्थिक उत्पन्न कमी होते समस्या निर्माण होऊ लागतात.

घरात दारिद्र्य प्रवेश करते समाजात आपला मान सन्मान कमी होतो. कधीकधी घरामध्ये वंश उणीव सुद्धा होते मुलांचे विवाह होत नाही अपत्य होत नाही. प्रत्येक कार्यामध्ये अडथळे येण्यास सुरुवात होते. हळूहळू आपली परिस्थिती अत्यंत बिकट होत जाते आणि असे का होत आहे हे आपल्याला समजत नाही.

आपल्याला असे वाटते की सगळं काही व्यवस्थित चालू होत. मग हे चक्र उलट कस काय फिरत आहे. आपल्याला असे वाटू लागते की आपल्यावर भगवानांचा कोप झाला आहे आणि आपल्यावर कोणीतरी जादूटोणा केलेला आहे. कोणालातरी आपले चांगले झालेले सहन होत नाही आहे म्हणून असे होत आहे म्हणूनच हे सर्व घडण्याचे कारण आपणच आहोत.

आपले वाईट बोलणे याचे मुख्य कारण आहे हे आपल्या लक्षातच येत नाही आपण स्वतःहूनच हे संकट ओढवून घेतलेले अपडेट आपण जे मागतो जे बोलतो ते आपल्याला प्राप्त होत असते. आपल्या घरातील वास्तुपुरुष चांगल्या मनाने आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तथास्तु म्हणत असतात.

परंतु त्यावेळी आपण अशुभ आणि वाईट बोलत असलो तर आपल्याला तीच फळे मिळतात. म्हणजे जर आपण घरामध्ये चांगले वागलो आपण इतर घरातील सदस्यांना चांगले बोललो आणि त्यांचे हिताचे प्रयत्न केले तर त्यांचे हितच होते त्यांना त्यातून चांगली फळे मिळतात.

परंतु कळत किंवा नकळतपणे आपण ज्या चुका करतो जे वाईट बोलतो त्याची फळे आपल्याला मिळतच असतात. म्हणून घरामध्ये कधीही बोलताना चांगलेच बोला सकारात्मकच बोला आणि म्हणजे बोलताना सकारात्मक बोलल्याने तुमच्या घरामध्ये चांगले आणि सकारात्मक कस होईल. वाईट बाबींचा आणि नकारात्मक वस्तूंचा त्यात करा म्हणजे जे होईल ते शुभ होईल.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *