श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती स्थापनेचा १२७ वर्षांपूर्वीचा इतिहास ऐकून तुम्हीही चकित व्हाल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपण आज या लेखा मध्ये जाणून घेणार आहोत पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई या गणपती बद्दल. आम्ही या लेखामध्ये तुम्हाला पुढील काही गोष्टी सांगणार आहोत.
१) या गणपतीला “श्रीमंत दगडूशेठ हलवाई” असे एका व्यक्तीच्या नावाने ओळखले जाते?
२) या गणपतीची स्थापना कशी झाली? या मंदिरामागील १२७ वर्षांपूर्वीचा इतिहास काय आहे?
३) हा गणपती नवसाला पावतो आणि कशाप्रकारे अमिताभ बच्चन यांची प्रकृती गंभीर असताना ते सुखरूप बरे व्हावे असा नवस करण्यात आला होता आणि तो पूर्णही झाल.

आम्ही या लेखामध्ये या गणेश मूर्तीची वैशिष्ट्ये ही सांगणार आहोत. तर हा लेख पूर्ण वाचा आणि जर लेख आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा.

पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे याच पुण्यात शनिवार वाडा सुद्धा प्रसिद्ध आहे. पण पुणे म्हटल की, अजून एक नाव डोळ्यासमोर येऊ लागत ते म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समस्त पुणेकरांचे श्रद्धा स्थान गणेशोत्सव म्हटल की मोठ्या शहरातील गणपतींची नावे विशेषत्वाने समोर येतात. त्यामध्ये पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे नाव आघाडीवर आहे बाहेर गावातून पुण्याला आलेल्या व्यक्ती दगडूशेठच्या दर्शनासाठी गेले नाही.

असे फारच क्वचित घडत असावे केवळ गणेश उत्सव साजरा करण्यापुरती तर श्रद्धेपोटी समाजाने दिलेल्या पैशातून सामाजिक कार्याच्या माध्यमातून मानवतेचे महामंदिर भरण्याचा प्रयत्न करणारे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट हे मंडळ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दगडूशेठ गणपतीने जगभर नावलौकिक संपादन केला.
ही गोष्ट आहे इसवी सन १८९१ साली जेव्हा भारतावर इंग्रजांचे आधिपत्य होत.

दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील एक प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते समाजात त्यांना खूप मान होता. त्यांना श्रीमंत ही पदवी देण्यात आली होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असल्यामुळे ब्रिटिशांनी ही त्यांना नगरशेठ हे भूषण देऊन सन्मानित केले होते. श्रीमंत दगडूशेठ यांच्या वर साक्षात देवाचेच वरदहस्त होते संपत्ती, मान सन्मान, प्रतिष्ठा यातील कशाचीच कमी नव्हती.

त्या वेळी पुण्यात प्लेगची साथ पसरली होती या आजारावर कोणताही ठोस उपचार नसल्याने अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले होते. प्लेग बद्दल सांगायच झाल तर को-रो-ना पेक्षाही भयावह म्हणण चुकीच ठरणार नाही. याआधी अशी महामारी १८२० साली सुद्धा आली होती या महामारी मुळे लाखो लोक मरण पावले होते.

१८९२ सालाच्या या प्लेगच्या साथी मध्ये दगडूशेठ यांच्या एकुलत्या एक मुलाच निधन झाल. त्यामुळे दगडूशेठ आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला सर्व वैभव असूनही ते पूर्ण वेळ नैराश्यात आणि चिंतेत असायचे. यावर त्यांचे अध्यात्मिक गुरु श्री माधवनाथ महाराज यांनी त्यांना एक सल्ला दिला ते दगडूशेठ यांना म्हणाले की, तुम्ही एक गणपतीच दत्तक घ्या ना त्याचा मुलाप्रमाणे सांभाळ करा त्या गणपतीची कीर्ती जगभर सर्वत्र पसरेल असे ते म्हणाले.

गुरूंचे म्हणणे ऐकून दगडूशेठ आणि लक्ष्मीबाई यांनी श्री कुंभार यांच्याकडून एक सुंदर आणि लोभस गणेश मूर्ती बनवून घेतली आणि भक्तिभावाने त्या मूर्तीची स्थापना ही केली. या गणेश मंदिरात येणाऱ्यांची संख्या दिवसों दिवस वाढू लागली लोक या गणपतीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचा गणपती असे संबोधू लागले. असे म्हणता म्हणता काही कालावधीने या गणपतीचे नामकरण श्रीमंत दगडूशेठ हलवाई असे झाले. या गणपतीची कीर्ती संपूर्ण पुण्यात पसरली लोक श्रद्धेने या मंदिरात येऊ लागले.

हा काळ होता इंग्रजांच्या जुलमी राजवटीचा त्यामुळे लोकांना व्यक्ति स्वातंत्र्य नव्हते. ब्रिटिश अत्यंत जुलमी होते ते भारतीयांना गुलामा सारखीच वागणूक देत देशात त्यांचा मनमानी कारभार चालायचा एके काळी “सोने की चिडिया” म्हणून ओळखला जाणार्‍या आपल्या देशाला लुटण्याचा ब्रिटिशांनी जणू ठेकाच घेतला होता. त्यांच्याविरुद्ध जो कोणी आवाज उठवेल त्याला अटक केली बऱ्याचदा फाशीची शिक्षाही दिली जायची. पण संपूर्ण भारतीयांन मध्ये ब्रिटिशांविरुद्ध संतापाची आग होती. आणि या आगीची चांगलीच झळ इंग्रजांना १८५७ साली लागली होती.

१८५७ चा उठाव यशस्वी ठरला होता पण या आगीच्या ठिणग्या मात्र संपूर्ण भारतभर पसरल्या. आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे या चर्चेला उधाण आल होत. या सर्वाला घाबरून इंग्रजांनी लोकांना एकत्र येण्यास आणि संघटना स्थापन करण्यास बंदी घातली. ब्रिटिशांन विरुद्ध बोलणे हा जणू एक प्रकारचा गुन्हाच आहे असे घोषित करण्यात आले. पण आपला देश स्वतंत्र व्हावा. असे प्रत्येक भारतीयाला वाटत होते काही लोक तर यासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान ही द्यायला तयार होते. त्यातीलच एक होते बाळ गंगाधर टिळक ज्यांना लोकमान्य टिळक या नावाने आजही ओळखल जात.

त्यांनी लोकांना संघटित करून ब्रिटिशांविरुद्ध लढा द्यायच अस ठरवल. पण यासाठी सरकार समोर लोकांना एकत्रित आणणे कठीण होत. म्हणून त्यांनी सार्वजनिक उत्सव साजरे करायचे असे ठरवले आणि यासाठी सार्वजनिक मंडळही तयार करून लोकांना एकत्रित करायचे असे त्यांचे ध्येय होते. यातूनच सार्वजनिक गणेश उत्सव उदयास आला जो गणपती आधी फक्त घरा पुरताच मर्यादित होता. तो आता सर्व मंडळात मैदानात आणि चौकात बसू लागला याची सुरुवात पुण्यातून झाली.

पुण्यात जोराने आणि आनंदाने गणेश उत्सव साजरा केला जाऊ लागला. १८९३ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई या मंदिरात सुद्धा एक गणेश मूर्ती आणण्यात आली तेव्हापासून सर्व करण्यात आलेली ही परंपरा १२७ वर्षांनंतर आजही चालू आहे. तीही तितक्याच श्रद्धेने आणि विश्वासाने या गणपतीला तेव्हापासून अनेक लोकांनी वेगवेगळे नवसही केलेत आणि ते पूर्णही झालेत. त्यामुळे नवसाला पावणारा गणपती असे नावलौकिक या गणपतीला प्राप्त झाले आहे.

श्री माधवनाथ महाराजांनी म्हटल्याप्रमाणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई या गणपतीची कीर्ती संपूर्ण जगात पसरली आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे वेगवेगळ्या देशातील अनेक लोक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात. वर्षभर या मंदिरात भक्तांची गर्दी असते या गणपतीची पालखी आरती आणि नैवेद्य याच वेगळेच आकर्षण आहे सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये प्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या मूर्तीला देवत्व प्राप्त होण्याचे भाग्य दगडूशेठ गणपतीला लाभले आहे.

या मंडळाची स्थापना १८९३ मध्ये झालेली असून दगडूशेठ गणपती हा लौकिक प्राप्त झाला आहे. ती मूर्ती मंडळाने १९६८ मध्ये तयार करून घेतलेली आहे. प्रसिद्ध शिल्पकार मूर्तिकार आणि यंत्रविदनेचे अभ्यासक शंकराप्पा शिल्पी यांच्या मूर्ती कलेची साक्ष म्हणजे दगडूशेठ गणपतीची ही मूर्ती ती घडवताना मूर्तिकार नागेश शिल्पी यांचेही या कामात योगदान होते. ही मूर्ती तयार करण्याचे काम सुरू असताना त्यावेळी सूर्यग्रहण आले होते. त्या ग्रहणातील एका विशिष्ट वेळेत मूर्तीमध्ये गणेश यंत्र बसविले तर त्या मूर्तीचे तेज उत्तरोत्तर वाढत जाईल आणि या मूर्तीला देवत्व प्राप्त होईल अशी शिल्पी यांची श्रद्धा होती.

त्यांच्या श्रद्धेचा मंडळातील कार्यकर्त्यांनी आदर केला आणि धार्मिक पद्धतीने विधी करूनच मूर्ती घडविण्यात आली. शांत प्रसन्न आणि पाहताच पावले थबकून राहती असे भाव या मूर्तीच्या चेहऱ्यावर आहे. बैठ्या मूर्तीचे चारही हात सुट्टे असून डाव्या हातामध्ये मोदक आहे. तर उजवा हात वरद म्हणजे आशीर्वाद देणारा आहे. अन्य दोन हातांमध्ये कमळ आणि डोक्यावर मुकुट आहे. मूर्तीच्या सोंडे वरील नक्षीकाम आहे. उत्कृष्ट कलाकारी चा नमुना आहे, या मूर्तीचे डोळे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य या डोळ्या मध्येच मूर्तीची प्रसन्नता सात्विकता आणि उदात्तता एकवटली आहे.

कोठूनही पाहिल तरी गणपती आपल्याकडेच पाहत आहे. याची प्रचिती दर्शन घेणाऱ्या भाविकाला येते मूर्तीच्या बोलक्या डोळ्यांमधून व्यक्त होणारे भाव पाहून भक्त नकळतच नतमस्तक होतो. उत्सव काळात ५ किंवा ११ नारळांचे तोरण अर्पण करणाऱ्या भाविकांची दर्शनासाठी लागलेली रांग हे दगडूशेठ गणपतीचे खास वैशिष्ट्य ठरले. पुढे १९८४ मधील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरामध्ये गणपतीची स्थापना झाली. या मंदिरासाठी ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष प्रतापराव गोडसे, मामासाहेब रासने आणि आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले.

कुली चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना जीवघेणा अपघात झाला होता. त्यावेळी जया बच्चन यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन नवस केला होता. सुखरूप अमिताभ आणि जया बच्चन या दाम्पत्याने सोन्याचे कान अर्पण केले होते.

पूर्वीचे मंदिर अपुरे पडू लागल्यानंतर २००२ मध्ये सध्याचे भव्य मंदिर उभारण्यात आले ट्रस्टच्या तीनही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पुढच्या पिढीच्या हाती सध्या नेतृत्वाचे सुकाणू आहेत. त्यांनीही त्याच निष्ठेने आणि भाविकतेने सारे उपक्रम सुरू ठेवत गणपतीचे पावित्र्य जपले असून ट्रस्टच्या लौकीका मध्ये ही भर घातली आहे.

गणेश उत्सव हा केवळ आपल्या मंडळा पुरताच राहू नये भूमि एकतेतून उत्सवाला विधायक वळण प्राप्त करून देण्यासाठी ट्रस्टने राष्ट्रीय गणेश उत्सव स्पर्धा सुरू केली. गणेशोत्सवामध्ये ऋषिपंचमीला हजारो महिलांचा समावेश असलेला अथर्व शीशे उपक्रम जगभर पोहोचला आहे. ट्रस्टतर्फे कोडव्यामध्ये देवदासी आणि अनौरस मुलांचा सांभाळ करून त्यांना योग्य शिक्षण देणारे बाल संगोपन केंद्र आणि पिताश्री वृद्धाश्रम चालवण्यात येत आहे.

ती गोरी गावामध्ये जलसंधारण याची कामे यशस्वी केलेल्या ट्रस्टतर्फे सुसून रुग्णालयातील रुग्णांना उत्तम भोजन सेवा दिली जात आहे. ट्रस्टतर्फे दरवर्षी सादर केल्या जाणारा देखावा आणि त्याची विद्युत रोषणाई हा भाविकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *