नमस्कार मित्रांनो.
ऑक्टोंबर २०२३ हा महिना तीन राशींसाठी चांगला म्हणावा लागेल. कसा चांगला जाईल त्यांच्या आयुष्यात कसे बदल होतील. कोणत्या आहेत त्या तीन राशी चला जाणून घेऊया.
मंडळी काही महत्त्वाचे ग्रह ऑक्टोबर महिन्यामध्ये राशी परिवर्तन करत आहेत. ज्योतिषीय दिनदर्शिका नुसार मंगळ कन्या राशीतून तूळ राशीत ३ ऑक्टोबरला प्रवेश करणार आहे आणि मंगळ ४३ दिवस तूळ राशीतच राहणार आहे आणि याचा परिणाम काही राशींवरती होणार आहे तर काही राशींना याचा चांगला लाभ होणार आहे.
१) मेष रास – मेष राशीवर मंगळाचा विशेष प्रभाव आहे. अशा स्थितीत मंगळाचा हे संक्रमण त्यांना लाभदायक ठरेल. करोडपती होण्याचे स्वप्न ते या काळात बघू शकतात. शेअर मार्केट मध्ये पैसे मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांना उच्च पद आणि पगारासाठी नोकरीच्या ऑफर सुद्धा मिळू शकतात.
आर्थिक स्थितीसुधारेल. तुमचा तणाव दूर होईल. गुंतवणुकीतून लाभ होईल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. कला माध्यमं गायन अभिनय आणि मार्केटिंग या क्षेत्राशी जे लोक संबंधित आहेत. त्यांच्यासाठी तर हा काळ विशेष शुभ म्हणावा लागेल.
२) मिथुन रास – मंगळाच्या संक्रमणाचा शुभ परिणाम मिथुन राशि वर सुद्धा होणार आहे. कारण या राशीच्या लोकांना भाग्य साथ देणार आहे. व्यवसायात विशेष प्रगती होईल.नोकरीतही सकारात्मक बदल होतील. मंगळाच्या कृपेने वैवाहिक जीवनात आनंद राहील. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या संभाषण शैलीत सुधारणा केल्यास तुम्हाला अधिक लाभ होईल. नवीन संधी मिळतील. तुमचे उत्पन्न वाढेल.राजकारणात सक्रिय लोकांसाठी हा सुवर्णकाळ असेल.
३) मकर रास- मकर राशीचा मंगळाचा विशेष प्रभाव आहे. या काळात तुम्हाला न्यायालयीन वाद किंवा कोणत्याही प्रकारच्या वादातून दिलासा मिळेल. मंगळाचाही राशी परिवर्तन आर्थिक दृष्ट्या सुद्धा मकर राशीच्या लोकांना चांगला राहील. आदर मिळेल.आरोग्य सर्वसाधारणपणे चांगल राहील. तुमच्या रोजगाराची साधने वाढतील.
नोकरी करणाऱ्यांना पद पैसा आणि प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर नियोजन करा नक्की यशस्वी व्हाल. व्यवसायिकांना चांगली ऑर्डर मिळू शकते.मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे योग आहेत.
मित्रांनो बऱ्याचदा तुम्हाला असा अनुभव येत असेल की राशिभविष्यामध्ये जे सांगितल जात आहे ते तुमच्या अनुभवाला येत नाही तुमच्या आयुष्यात तसे काहीही सकारात्मक बदल घडत नाही याला कारण तुमच्या घरात असणाऱ्या वास्तु दोष किंवा पितृदोष किंवा इतर काही ग्रहदोष सुद्धा असू शकतात.
जर पितृदोष असेल तुमच्या घरामध्ये काही तुमच्या कुटुंबामध्ये पितृदोष असेल तर तो पितृदोष दूर करण्याची चांगली संधी तुम्हाला पितृपक्षात मिळत असते. पितृपक्षामध्ये तुमच्या पितरांच्या तिथीला तुम्ही श्राद्ध नक्की करा. श्रद्धा पक्ष केल्यामुळे पितृदोष दूर होतात आणि मग घरातल्या सततच्या कटकटी भांडण पैसा न टिकण घरामध्ये पैसाच नाहीये ना अशा ज्या समस्या असतात. त्या सगळ्या दूर होऊन प्रगतीच्या मार्गातले अडथळे दूर होतात आणि प्रगती होत राहते.
कारण बऱ्याचदा हे बघण्यात आलेला आहे की एखाद्या कुटुंबाची प्रगतीच होत नाही तेव्हा त्यांच्या घरामध्ये कुटुंबामध्ये पितृदोष असतो व्यवस्थित होत नसतात पक्ष व्यवस्थित होत नसतात किंवा त्यांच्या घरामध्ये ज्या व्यक्ती अचानक गेलेले आहेत अपघाती गेलेले आहेत.
त्या लोकांच्या घरामध्ये सुद्धा व्यवस्थित क्रियाकर्म झालेला नसत आणि त्याचे परिणाम त्यांच्या पुढच्या पिढीला ज्यांना भोगावे लागतात अस शास्त्र सांगत. म्हणून श्राद्ध पक्षांमध्ये व्यवस्थित श्राद्ध पक्ष आपल्या इतरांच्या तिथींना करावे आणि इतरांना संतुष्ट करावे. जेणेकरून त्यांचा आशीर्वाद आपल्या आणि आपल्या पुढच्या वंशज्यांनाही लाभतो.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.