साडेसाती म्हणजे नक्की काय, साडेसातीत काय घडते. आणि त्यावर उपाय काय.. जाणून घ्या शनी साडे सातीविषयी संपूर्ण माहिती.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

साडेसाती हा शब्द ऐकला तरी सगळेच घाबरतात. पण साडेसाती मध्ये असं घडतं तरी काय? माणसाच्या आयुष्यात अशी काय उलथा पालथ होते. खरंच साडेसातीला घाबरायला हवा का? त्याचबरोबर साडेसाती जर इतकी कठीण असेल तर त्यावर उपाय आहे का? चला जाणून घेऊयात.

साडेसाती विषयीची जी माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत ती आम्हाला दिली आहे ज्योतिषी सोनाली खित कर यांनी .
मंडळी सतत अडचणी येऊ लागल्या की नकळत आपल्या तोंडातून निघतं की काय साडेसाती लागलीये कोण जाणे कधी संपणार कोणास ठाऊक कोणाला जर खरच साडेसाती सुरू असेल कोणाला साडेसाती सुरू होणार असेल तर तो माणूस खूपच भेदरलेला असतो.

काय होणार कोण जाणे आजच्या या व्हिडिओचा मूळ उद्देशच हा आहे की साडेसाती म्हणजे काय? आणि तिला खरोखरच घाबरण्याची गरज आहे का? हे जाणून घेणं. ते सांगायला सुरुवात करण्याआधी २०२३ मध्ये कोणाला साडेसाती आहे? कोणत्या राशींना साडेसातीचा सामना करावा लागेल?

आकाशामध्ये जे १२ प्रकारचे जे तारका समूह आहेत त्यांना राशी असे म्हणतात. मग त्यामध्ये (मेष, ऋषभ, मिथुन ,कर्क ,सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन.) अशा १२ राशी येतात. त्यामध्ये जेव्हा शनिमहाराज एखाद्या विशिष्ट राशीतून भ्रमण करतात राशीच्या आधीच्या राशीला आणि त्या विशिष्ट राशीला आणि त्यानंतरच्या राशीला साडेसाती आहे असं सांगितलं जातं.

म्हणजेच उदाहरणार्थ शनि महाराज सध्या मकर राशीत आहेत. म्हणून मकर राशीला आणि तिच्या मागच्या धनु राशीला आणि पुढच्या कुंभ राशीला साडेसाती आहे.२०२३ मध्ये हे चित्र बदलणार आहे. आता या साडेसातीला घाबरण्याचं कारण म्हणजे शनि आपल्या राशीत किंवा आपल्या राशीच्या जवळच्या राशीत येतो.

तेव्हा आपल्याला बऱ्याच अडचणी उत्पन्न होतात. त्याचं कारण समजून घ्यायचं म्हणाल तर, आपल्याला शनी ग्रहाचे गुणधर्म लक्षात घेतले पाहिजेत. हा ग्रह अतिशय संत सावकाश आहे. एकलकोंडा आहे. सत्यप्रिय आहे. आणि प्रत्येक व्यक्तीला त्या व्यक्तीची स्वतःची जागा दाखवून देणारा ग्रह आहे. म्हणूनच ज्या व्यक्तीचे पाय जमिनीवर आहेत तिला या साडेसातीचा विशेष त्रास होत नाही.

पण स्वतःच्याच धुंदीत असणाऱ्या काम, क्रोध, लोभ या मोहात अडकलेल्या व्यक्तींना साडेसातीचा भयंकर त्रास होतो.
जर नीट विचार केला तर एखादी व्यक्ती स्वतःला भारी समजते तिला स्वतः शिवाय बाकीचे जग कस्पट समान वाटते. पैशांशिवाय दुसरी गोष्ट सुचत नाही. घरात सासू सासरे नणंद यांच्या ती पाण्यात पाहते.

किंवा नोकरीच्या ठिकाणी घाणेरडे राजकारण करते. लाचखोरी करते, स्वतः शिवाय दुसऱ्या कोणाला मदत करत नाही. अशा व्यक्तीला शनी महाराज स्वतःचा झटका दाखवल्याशिवाय राहत नाहीत. मग पूर्णपणे तावूनसुलातून बाहेर काढण्याचा प्रयत्न शनिदेव करतात.

आणि त्या साडेसातीला न जमता पुन्हा येरे माझ्या मागल्या अशाप्रकारे पुन्हा सर्व विसरून पुन्हा वाईट मार्गाने जाणारे लोकही कमी नाहीत. पण या साडेसातीचा धडा घेऊन त्यातून माणूस स्वतःला चांगलं घडवायचा प्रयत्न करेल तर ती खरी परीक्षा. आता यामध्ये अडीच वर्ष उत्तम. अडीच वर्ष मध्यम आणि अडीच वर्ष अत्यंत वाईट जातात. असा समज आहे. पण तो अत्यंत चुकीचा समज आहे.

कारण अशी कोणतीही विभागणी शनी करत नाही. जर तुम्ही आलेल्या संकटांमधून काही शिकलात नाही, तर सर्व साडेसात वर्ष वाईट जाऊ शकतात. ज्योतिष सोनाली लिखितकर सांगतात, की दोन वर्षांपूर्वी त्यांच्याकडे एक मुलगी आली होती. स्वाती नावाची.

तिला तीन-चार वर्षांपासून साडेसाती चालू होती. ती म्हणाली की माझे वडील अचानक मला साडेसाती असताना निघून गेले. माझी आजी सुद्धा गेली. तसेच माझे काका अर्धांगवायुने आजारी आहेत. आणि मला पण नोकरी मिळत नाही. माझी आई हल्ली माझ्यावर आणि घरात खूप चिडचिड करते. या साडेसातीने मी खूप हैराण झाली आहे. काहीतरी उपाय सांगा. रत्न सांगा, पूजा सांगा. तेव्हा सोनाली ताईंनी तिला विचारले.

१) एक सांग तुझ्या वडिलांचे वय काय होते?
ती म्हणाली ५५ वर्ष. २) ते कशाने गेले? ती म्हणाली की ते खूप दारू प्यायचे. लिव्हर खराब झालं म्हणून ते गेले.
३) आजी किती वर्षाची होती? ती मुलगी म्हणाली ८३ वर्षाची होती. म्हातारपणाने गेली. मग मी म्हणाले अग तुझे वडील दारू पीत होते ते काय शनि देवांच्या परवानगीने पीत होते का आणि तुझी आजी ती आज ना उद्या वृद्धत्वाने जाणारच होती.

अर्धांगवायू हा कोणालाही होऊ शकतो. आणि तुझे काका हे तुझ्या नात्यातील आहेत. त्यातल्या प्रत्येकाला होणाऱ्या दुष्परिणामाला तुझी साडेसाती जबाबदार नाही. आणि तुला नोकरी नाही म्हणतेस तर तुझं शिक्षण काय? तर ती म्हणाली बारावी. पुढे शिकले नाही. मग मी तिला म्हणाले अगं शिक्षण चांगलं असेल तर सहज नोकरी मिळते.

शिक्षणच नाही तर नोकरी कुठून मिळणार. मग तिची कुंडली पाहून मी तिला विचारलं. तुला नक्कीच एखादी कला येत असणार. त्यात आवड असणार आणि तीच कला तुला पैसे मिळवून देईल हो ताई मी शिवण काम करते मी चांगलं शिवू शकते. मग तिला तिच्या याच कलेचा व्यवसायिक रूपांतर करण्यास सांगितलं.

असे हे गैरसमज साडेसाती बाबत पसरलेले आहेत वास्तविक पाहता साडेसाती नसताना सुद्धा आपण काही खूप सुखी असतो असं काही नाही पण आपल्याला साडेसाती बद्दल भीती वाटते हे खरं. शनिदेव हे कर्मफलदाता आहेत आणि प्रत्येकाच्या कर्मानुसार ते फळ देत असतात . तर साडेसाती आली तर घाबरून न जाता त्यावर काही उपाय तुम्ही करू शकता.

साडेसातीचे पारंपारिक उपाय आणि धार्मिक उपाय आपण पाहू. १)शनी मंदिरात जाऊन किंवा मारुतीच्या मंदिरात जाऊन तेल वहावे. २) रुईंच्या पानाची माळ वहावी. ३) काळया रंगाचे कांबळे शनि देवांना अर्पण करावे. ४) शनि देवास काळे उडीद वाहने. ५) शनिवारी मारुती समोर नारळ फोडावा. हे झाले धार्मिक आणि पारंपारिक उपाय. पण त्याशिवाय हल्लीच्या काळाप्रमाणे सुद्धा काही उपाय सोनाली ताईंनी सांगितले आहेत.

१) एखाद्या गरीब माणसास तळलेले पदार्थ दर्शनी वारी खायला देणे. उडदाचा वडा वडापाव किंवा फरसाण इत्यादी.
२) गरीब आणि निराधार व्यक्तीस काळया किंवा निळ्या रंगाचे ब्लॅंकेट देणे. ३) सर्व कामे सावकाश पणे करणे.
४) जे काम आठ दिवसात होणार होत ते काम महिनाभर होणार आहे असं धरून चालणे. ५) खर बोलणे दुसऱ्याला न फसवणे दुसऱ्यांविषयी वाईट विचार न करणे. या गोष्टींचे पालन केलं तर शनिदेव नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *