नमस्कार मित्रांनो.
मंडळी घरात घडत असलेल्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला काही ना काही संकेत देतातच. आणि या संकेतांना आपण समजून घेतल तर आपल्याला कळेल आपल्या भविष्यात काय परिणाम होणार आहे. आणि बऱ्याच संकटांपासून स्वतःला आपण वाचवू शकतो.
आज आपण जाणून घेणार आहोत की, घरातील दुर्भाग्याला कसे दूर करता येईल. आणि महाशिवपूराणामध्ये अस सांगितल आहे की, कोणती वस्तू कधी दान केली पाहिजे. ज्यामुळे तुमच्या जीवनातील बरबादी कायमस्वरूपी निघून जाईल. चला तर मग जाणून घेऊयात.
मित्रांनो प्रत्येक जण दानधर्म करतो. आणि त्याला त्याचे फळ नक्कीच चांगले मिळते. यामुळे दानशूर व्यक्तींवर देवांचा विशेष असा आशीर्वाद असतो. काही वस्तू दान केल्यावर आपण संकटा पासून वाचू शकतो. या वस्तू दान केल्याने घरातील दोष निघून जातो. तुमच्या आयुष्यात घडत असलेले विपरीत परिणाम सुद्धा गायब होतील.
पहिली वस्तू मीठ, मीठ दान केल्यामुळे जो व्यक्ती खूप कष्टातून जात असेल त्याच्यावर असलेले संकटे घरातील असले वास्तुदोष निघून जातील. त्यामुळे सोमवारच्या दिवशी मीठ दान करा त्यामुळे तुमचे दुर्भाग्य तुमची संकटे व वासुदोष नाहीसे होतील.
मीठदान केल्यामुळे तुमची संकट दूर करण्याला खूप मोठा हातभार लावतो. पण एक लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या हातून समोरच्याच्या हातावर मीठ देऊ नका. त्याला नमस्कार करून ते खाली ठेवा आणि मग ते समोरच्या व्यक्तीला घ्यायला सांगा. मीठ दान केल्याने तुमच्या घरातील वास्तुदोष व संकटे निघून जातील.
दुसरी गोष्ट गुळ जर तुम्ही गुळ दान करत असाल, तर तुमचे नातेसंबंध खूप घट्ट होतील. नाते कोणासोबतही असो ते चांगलेच होतील. नात्यात जर गोडवा हवा असेल तर सोमवारी गुळ दान केला पाहिजे. वैवाहिक जीवनात तुमचे सतत खटके उडत असतील एकमेकांना समजून नसेल घेत तर तुम्ही गुळ दान केल्यावर सगळं काही ठीक होईल.
जर तुमचे भांडणे घटस्फोटापर्यंत गेले असेल तर सोमवारच्या दिवशी गुळ अवश्य दान करा. असे केल्याने तुमचे अपसातले प्रेम वाढेल आणि नातं टिकून राहील. नात आई-वडिलांच असो वा पालक आणि मुलांच असो. जर तुमचे मुल तुमच ऐकत नसेल तुमच्या विरोधात जात असेल तर तुम्ही सोमवारी महादेवाच्या नावाने गुळ दान करा.
तिसरी गोष्ट आहे. जी महाशिवपूराणात सांगितलेली आहे.ती म्हणजे तीळ, जर व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होत असेल, कधी कधी अस होत व्यक्ती खूप आत्मविश्वासू असतो पण तो अपयशी ठरतो. तर तीळ दान केल्याने या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार नाहीत. तुम्ही जे कष्ट कराल त्यात तुम्हाला यश मिळेल.
नोकरीसाठी अफाट प्रयत्न करूनही नोकरी मिळत नाही या सगळ्यावर उपाय म्हणून सोमवारी तीळ दान करा. तुमच्या आयुष्यात होणाऱ्या अडचणी निघून जातील. तुम्ही काळे तीळ सुद्धा दान करू शकता. पण काळे तीळ तुम्ही शनिवारी दान करा. आणि पांढरे तीळ हे सोमवारी दान करा. हा उपाय केल्याने अडचणींवर मात होईल आणि तुमच्या घरातील दोष निघून जाईल. धन्यवाद…
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.