नमस्कार मित्रांनो.
मित्रहो आपल्या हिंदू धर्मात गायीला माता मानले जाते, गाय आपली देवता असते. तिची नेहमी सर्वजण मनोभावे पूजा करत असतात. असेही म्हणतात की गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव निवास करतात, म्हणून तर तिला माता म्हणजेच देवाचे स्थान दिले आहे.
प्रत्येक सणाला गायीला देखील नैवेद्य दिला जातो, तिचा आशीर्वाद घेऊन कोणत्याही कामास सुरुवात करणे अत्यंत शुभ मानले जाते. गायीच्या पायाखालची माती अतिशय शुभ मानली जाते, या मातीला आपण जर जवळ ठेवले तर जीवन अत्यंत सुंदर आणि समाधानकारक बनते.
जीवनात सुख समृद्धी मध्ये वाढ होते, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. आजचा हा महाउपाय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण हा उपाय केल्याने आपली अनेक संकटे दूर लोटली जाणार आहेत. आर्थिक स्थिती चांगली होऊन सर्व सुखसोयी मनासारख्या असणार आहेत.
ज्यांच्या जीवनात विवाह समस्या आहेत, विवाह लवकर जुळत नाही त्यांनी हा उपाय नक्कीच करावा.तसेच ज्या विवाहित जोडप्यांना संतान सुखाची प्राप्ती होत नाही त्यांनी देखील हा उपाय अवश्य करावा. खास करून घरातील स्त्रियांनी ज्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे त्यांनी हा उपाय करावा.
हा उपाय केल्याने शारीरिक आणि मानसिक त्रासातून सहज मुक्ती मिळते. काही लोक भरपूर कमाई करतात मात्र त्या पैशाचा त्यांना योग्य लाभ होत नाही किंवा घडत नाही, स्वतः राबून देखील स्वतःसाठी पैसे उरत नसतील किंवा कुटुंबाला पैसे देता येत नसतील अशा लोकांनी देखील आपल्या समस्या दूर करण्यासाठी गो मातेच्या पायाखाली असलेल्या मातीचा हा उपाय नक्की करावा.
मित्रहो हा उपाय केल्याने आपली मानसिक शांतता अधिक पटीने वाढते. धनसंपत्ती सुद्धा वाढते, त्यामुळे आत्मिक शांती टिकून राहते. मित्रहो एकादशी पासून जर या उपायला आपण सुरुवात केली तर आणखीन चांगले फळ आपणाला मिळू शकते. मित्रहो घराजवळ असणाऱ्या गो मातेजवळ आपल्याला जायचे आहे.
जाताना आपल्या घरातील बनवलेली पहिली चपाती किंवा भाकरी घेऊन जायचे आहे. घरातील गृहिणीला सांगावे जी पहिली भाकरी किंवा चपाती बनवत आहेस ती गो मातेच्या नावाने बनवा. ही चपाती बनवताना त्या गृहिणीच्या मनात देखील शुद्ध भावना असावी. ही बनवलेली रोटी घेऊन आपण जायचे आहे आणि आपल्या उजव्या हाताने त्या गो मातेला भरवायची आहे.
गो माता जेव्हा तुंमच्या हातची रोटी खात असते तेव्हा तिच्या पाठीवरून हाथ फिरवायचा आहे. त्यानंतर तिच्यासमोर हाथ जोडून आपल्या जीवनातील सर्व समस्या बोलून दाखवायच्या आहेत. नंतर त्या गो मातेच्या कोणत्याही पायाखालची मूठभर माती घ्यायची आहे, ही माती अत्यंत पवित्र आहे. ही माती घरी घेऊन यायची आहे.
घरातील गंगाजल वापरून त्या मातीचा चिखल बनवायचा आहे. बनलेल्या चिखलाचे शक्य तितके छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत. ज्या व्यक्तीला जीवनात भरपूर समस्या आहेत त्या व्यक्तीच्या उशाखाली हे गोळे ठेवायचे आहेत. हे गोळे कोऱ्या पांढऱ्या कागदात घ्या.
दुसऱ्या दिवशी उठल्यावर स्नान करून देवपूजा करावी, व पिंपळाच्या झाडाजवळ जावे जाताना ते केलेले गोळे आणि तांब्यातून थोडेसे पाणी घेऊन जावे. ते जल आणि गोळे वृक्षाला अर्पण करायचे आहेत. आपल्या जीवनातील समस्या पुन्हा एकदा सांगून हाथ जोडायचे आहे. हा उपाय मित्रहो नक्की करून पहा, तुम्हाला देखील याचा परिणाम नक्की जाणवेल.
आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेन्ट करून सांगा, तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.