नमस्कार मित्रांनो.
मांसाहार का करू नयेयासाठी स्वामींनी अगोदर कथन केलेले आहे. ते आम्ही आज तुम्हाला सांगणार आहे. एक गृहस्थ तो स्वामींच्या मठाच्या क्षेत्रात राहत होता, त्यांनी एक कुत्रा पाळला होता. त्या कुत्र्याला मांसाहाराची सवय होती एकदा त्या गृहस्थला बाहेरगावी जायचे होते. पण कुत्र्याला कोण सांभाळणार तेव्हा त्या गृहस्थाने स्वामींना सांगितले व त्या गृहस्थाने स्वामींना सांगितले की या कुत्र्याला मांसाहार लागतो.
हे ऐकून स्वामी हसले आणि म्हणाले काळजी नका करू मी सांभाळतो तुमच्या कुत्र्याला, दोन-तीन दिवसांनी तो गृहस्थ परत घरी आला. आणि त्या कुत्र्याला स्वामींकडून घरी घेऊन गेला आणि त्या कुत्र्याला मांस खायला दिले. पण कुत्र काहीही खात नव्हता तेव्हा त्या गृहस्थाने स्वामी ला विचारले की तुम्ही या कुत्र्याला काय खायला दिले की हा मास खायला तयार नाही?
स्वामी म्हणाले मी तर फक्त दूध आणि भाकर खायला दिले. जर दोन दिवस स्वामीं बरोबर राहून कुत्रे बदलू शकतात. तर माणस का नाही स्वामी म्हणाले जर उकळून गार केलेले पाणी पचायला चार तास लागतात आणि साधे गार पाणी पचायला आठ तास लागतात. तसेच शाकाहारी जेवण पचायला आठ तास लागतात व मांसाहारी जेवण पचायला ७२ तास लागतात.
मग आपणच ठरवा आपल्यासाठी काय योग्य आहे ते स्वामींनी त्यासाठी एक उदाहरण सांगितले मातीमध्ये दोन खड्डे करा. त्या खड्ड्यामध्ये एका खड्ड्यात माप व एका खड्ड्यात कोणतेही धान्य घाला तीन दिवस त्या दोघी खड्ड्यांना पाणी द्या.
ज्या खड्ड्यामध्ये तुम्ही धान्य घातलेल्या असणार त्याला अंकुर फुटले असतील आणि ज्या खड्ड्यांमध्ये मास असेल त्या खड्ड्याला किडे लागलेले असतील. जेव्हा एखादा प्राणी मरणार असतो तेव्हा त्याच्यामध्ये मरण्याची भीती व क्रोध निर्माण होतो त्यामुळे रासायनिक तयार होतात. हे रासायनिक आपल्यासाठी हानीकारक आहे आता तुम्हीच सांगा आपला कोणता नातेवाईक मेल्यावर आपण त्याला किचन पर्यंत नेतो का?
याउलट माणूस मेलेला प्राणी किचन मध्ये नेऊन शिजवून खातो. स्वामी म्हणाले जर मिक्सर मधल्या भांड्यामध्ये आपण चटणी फिरवली तर ती व्यवस्थित बारीक होते पण त्यात भांड्यामध्ये आपण हळद फिरवली तर पाते सैल होतात. तसेच आपल्या दातांचे पण आहे. मांसाहार करताना दाताना थोडा त्रास होतो व पुढे जाऊन आपले दात लवकर पडतात.
मग आता तुम्हीच ठरवा स्वामी समर्थ जर एवढी चांगली शिकवण देत आहे तर त्याबद्दल आपण विचार नको का करायला. विचार करायलाच हवा माणसाला हानिकारक गोष्टीपासून दूर राहायलाच पाहिजे पण तो मांसाहार असो की नकारात्मक विचार.
मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.
मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.