नमस्कार मित्रांनो.
तुम्ही ऐकले असेल की, आपण कधी कधी बोलत असतो. तसे आपल्या सोबत होत असते कारण आपल्या मनाची शक्ती खूप जास्त असते. आपण जे बोलतो ते आपल्या अंतर्मनात जाते आणि काही दिवसांनी तेच सत्य होते.
कधी आपण जे ठरवतो तेच आपण करून सुद्धा दाखवतो आपण जसे बोलतो जे वाक्य बोलतो तशा भावना आपल्या अंतर्मनात जातात आणि तशी परिस्थिती आपल्यासमोर निर्माण होत असते. आपण नेहमी असे काही वाक्य बोलतो त्यामुळे आपल्याकडे सगळ्या गोष्टीची कमीच असते.
नकारात्मक भावना असलेली वाक्य तुमच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव टाकतात. तुम्हाला नकारात्मकतेने भरून टाकतात जसे की आपण बोलतो. पैसा कमी भेटला तरी चालेल पण नोकरी मिळायला हवी, नोकरीमध्ये समाधान मिळायला हवेत. हे नकारात्मक वाक्य आहे.
दुसरे मी घरी बसलो तरी चालेल पण सुखी असायला हव. माझे नशीबच खराब आहे म्हणून गोष्टी माझ्या मनासारखे होत नाही. मी श्रीमंत झालो नाही तरी चालेल पण दोन टाईप सुखाची जेवण मिळायला हवे.
या गोष्टी वाचायला छान वाटतात आणि तुम्ही या गोष्टी नक्की बोलत च असाल. पण विचार केला आहे का या गोष्टी नकारात्मक आहेत. तुमच्या मनात या नकारात्मक भावना पोहोचतात आणि अंतर्मनात ह्याच गोष्टी साठवून असतात.
मग तुम्ही गरीब असला तरी सुख तुमच्याकडे हवे हे मनाला वाटते आणि तेच तुमच्याकडे राहते की तुम्ही गरीबच राहतात पण सुखी राहतात. पण हे नकारात्मक आहे ना कारण आपल्या मनाची शक्ती एवढी असते की, आपल्या सगळ्या इच्छा ती पूर्ण करू शकते.
आपण त्या मनाला चुकीचे संदेश देत असतो. नकारात्मक भावना पोहोचवत असतो कारण त्या गोष्टीची भावना आपल्या मनात जाते आणि त्याच प्रकारे आपल्या आयुष्यात होऊ लागते. म्हणून मी गरीब राहिलो तरी चालेल, मला पैसा कमी मिळाला तरी चालेल, माझे नशीबच खराब आहे असे तुम्ही बोलत असाल तर मग तशीच परिस्थिती तुमच्यासमोर येईल.
विचार करा जर तुम्ही असे बोलालल की मला नोकरी मध्ये खूप पैसा मिळेल आणि मला समाधान पण मिळेल. माझे नशीब खूप चांगले आहे आणि मला सगळे काही मिळेल. मी श्रीमंत पण होईल आणि दोन टाईम सुखाने जीवन पण करेन. बघा हे वाक्य वाचायला ऐकायला पण छान वाटतात.
हे वाक्य सकारात्मक भावनांनी भरलेले आहेत, तुमच्या मनाला तुमच्या अंतर्मनाला या सकारात्मक भावना पोहोचवतात. तुम्ही ऐकले असेल अगोदर असे बोलायचे
रडत बसू नका, आयुष्यावर रडणं बंद करा. नाहीतर परिस्थिती कधीच बदलणार नाही.
म्हणून मित्रांनो नकारात्मक भावना असलेले वाक्य, शब्द तुम्ही कधीच बोलू नका तुमच्या मनावर तुमच्या अंतर्मनात हे नकारात्मक संदेश जात असतात ते संदेश देऊ नका. नेहमीच सकारात्मक बोला म्हणजे तुमच्या आयुष्यात त्याच्या चांगल्या गोष्टी होतील आणि तुम्हाला सगळे काही मिळेल.
जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.
मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.
मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.