नमस्कार मित्रांनो.
आज आपण अश्या रहस्यमय किल्यांबद्दसल माहिती करून घेणार आहे जे ऐकून तुम्हाला पण आश्चर्य वाटेल. ते म्हणतात ना खूप जास्त सुंदर असणे पण कधी कधी श्राप बनून जात तसच झाल. या दुनियेतील सर्वात जास्त शक्तिशाली किल्ल्यामध्ये त्या किल्ल्याच नाव आहे भानगढ किल्ला.
एक वेळ होता जेव्हा या राज्यात खूप लोकांची ये जा असायची येथील लोक खूप मजेने राहत होते. पण या राज्यातील राजकुमारीने या राज्यातील लोकांचे सुख समृद्धी हिसकावून घेतली तिच्या फक्त सुंदरतेमुळे हें राज्य आज वीरान पडून आहे.
या राज्यातील राजा भगवान दास यांनी हा किल्ला आपला पुत्र माधवदास साठी बनवलेला होता.आणि माधव दास यांची मुलगी राणी रत्नमती खूप सुंदर होती, तिच्या सुंदरतेची ठाऊक पूर्ण भानगढ मध्ये होती.
तस तर या राणीचे सर्वत्र चाहते होते पण एक चाहता असा पण होता जो या राजकुमारिसाठी पूर्णपणे पागल होता. त्याला कोणत्याही किमतीमध्ये राजकुमारी रत्नमती पाहिजे होती. आणि महत्वाची गोष्ट अशी की हा एक साधाहरण माणूस नसून एक तांत्रिक होता. त्याच नाव सि-द्धीया होत.
या तांत्रिक ची प्रेम कथा तेव्हा सुरू झाली. जेव्हा राजकुमारी एक दिवशी भानगढ च्या जोहरी बाजारात आपल्या मैत्रिणीसोबत अत्तर घ्यायला गेली होती. तेव्हाच या तांत्रिक ने या राजकुमारीला पहिल्यांदा बघितले आणि तिच्या सुंदरतेचा चाहता झाला.
त्याने निश्चय केला की तो राणीला आपल करणारच आणि त्याला जस समजल की राणीला अत्तर पाहीजेय त्याने आपल्या का-ळा जादूचा उपयोग करून अत्तर ची बोटल तयार केली आणि त्या अत्तर ला राजकुमारीकडे पोहचवली. पण तेव्हाच एक त्या राज्यात राहणाऱ्या माणसाला याची महिती मिळाली.
त्याने ही माहिती लगेच राजकुमारीला सांगितली व राजकुमारीने ती बोटल लगेच किल्ल्यातून बाहेर फेकली आणि ती बोटल बाहेर जाऊन एक दगडावर आपटून फुटली, यामुळे त्या तांत्रिक चा केलेला का-ळा जादू त्याच्या स्वतःवर उलटला.
बोटल दगडावर आपटल्याने तो का-ळा जादु दगडावर झाला आणि तो दगड जोराने त्या तांत्रिक कडे जाऊ लागला. आणि त्याच दगडाखाली दाबून जाऊन त्या तांत्रिक चा मृ-त्यू झाला. पण मरायच्या आधी त्या तांत्रिक ने पूर्ण भानगढ ला हा श्रा-प दिला की भानगढ चा विनाश होऊन जाईल.
अस म्हटल जात की, त्या तांत्रिक च्या मृत्यूनंतर थोड्याच दिवसात त्या भानगढ किल्यावर शत्रूंनी हल्ला चढवला आणि भानगढ ची पूर्ण प्रजा मारली गेली. त्या राणीचाही त्याच हल्ल्यात मृत्यू झाला आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत तो भानगढ किल्ला विराण पडून राहिलेला आहे. काही तपासानुसार बघायला गेल तर आज पण त्या तांत्रिक चा आवाज त्या किल्याच्या आजूबाजूला ऐकायला येतो.