नमस्कार मित्रांनो.
हिंदू धर्मामध्ये देवपूजेचे फार महत्त्व आहे. दररोज सकाळी स्नान झाले की घरातील कोणीतरी एक सदस्य सर्वात आधी देव पूजा करतात. देवपूजा करताना सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे दिवा लावणे. आपण देव पूजा करायला बसलो की सर्वात आधी दिवा लावतो.
देवपूजा करताना आपण जे काही पूजन करतो भगवंताजवळ पोहोचवण्याचे कार्य दिवा मार्फतच होते. म्हणून देव पुजा करण्यापुर्वी दिवा जरूर लावला जातो. आणि त्यानंतरच भगवंतांचे पूजन केले जाते. जेते ज्याच्या-त्याच्या श्रद्धेने क्षमतेनुसार तेलाचा तुपाचा लहान मोठा असा दिवा लावतात.
काही घरांमध्ये दिवस-रात्र अखंड दिवा तेवत असतो. तर काही ठिकाणी सकाळ-संध्याकाळ दिवा देवासमोर लावला जातो. तुमच्या घरातील देवांसमोर सतत दिवा तेवत असतो. त्या घरातील वातावरण प्रसन्न राहते. घरात सकारात्मक ऊर्जा बनलेली राहते.
नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आणि पवित्र वातावरण तयार होते. देवघरात दिवा तेवत असेल तर आपल्याला तिकडे बघूनही प्रसन्न वाटते. दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचा प्रतीक आहे. ज्योतिष शास्त्रानुसार दिव्याला सकारात्मक तेचे प्रतीक मानले जाते.
तसेच दारिद्र्य दूर करण्याचे प्रतीक मानले जाते. साजूक तुपाचा दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते. प्रत्येक कार्यात यश प्रगती घडून यावी असं वाटत असेल. तसेच घरात सुख-समृद्धी येण्यासाठी दररोज साजूक तुपाचा दिवा लावावा. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेत वाढ होते.
दिव्याची वात जर पूर्व दिशेला असेल तर यामुळे आपल्या घरातील सर्वांचे आजार नष्ट होतात. आणि आपल्याला दीर्घायुष्याची प्राप्ती होते. दिव्याची वात उत्तर दिशेकडे असेल. तर आपल्या धन संपत्तीत वाढ होते. दक्षिण दिशेला दिव्याची वात कधीही असू नये. यामुळे आपल्या धनसंपत्तीची हानी होत राहते.
आपल्या स्वयंपाक घरात आपण ज्या ठिकाणी पिण्याचे पाणी ठेवतो. त्याठिकाणी ही गायीच्या साजुक तुपाचा दिवा सहज लावावा. यामुळे आपल्याला आरोग्याची प्राप्ती होते. तसेच धनवृद्धीही होते. तसेच घरातील वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो.
आपल्यावर जर खूप कर्ज झालेले असेल. त्यापासून मुक्तता मिळवायची असेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. दररोज पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा. यामुळे आपल्या डोक्यावरील खरच लवकरच मीटेल. जर रात्री आपल्याला शांत झोप लागत नसेल घरात कोणीतरी अदृश्य शक्ती वावरत आहे.
असा भास होत असेल. आपल्या आसपास कोणीतरी आहे असे वाटत असेल. तर आपण ज्यावेळी झोपतो त्यावेळी आपल्या झोपण्याच्या खोलीत एक दिवा जरूर लावावा. या दिव्याच्या प्रभावामुळे आपल्या घरातील वाईट शक्ती नष्ट होतील. मनावरील भीती दडपण नष्ट होईल. जर रात्रभर दिवा लावून ठेवत नसाल.
तर झोपण्यापूर्वी अर्धा तास तरी दिवा लावून ठेवावा. आपल्याला झोप लागेपर्यंत तो दिवा तेवत राहील याची काळजी घ्यावी. नंतर तो दिवा शांत झाला तरी हरकत नाही. तसेच आपल्याला जीवनात खूप प्रगती करायची असेल भरपूर धनसंपत्ती मिळवायचे असेल.
आपल्या कार्यातील अडचणी दूर करायचे असतील. तर रात्री झोपण्यापूर्वी पश्चिम दिशेला तिळाच्या तेलाचा दिवा लावून ठेवावा. त्यात भरपूर तेल टाकावे म्हणजे तो दिवा भरपूर वेळ तेवत राहील. हा उपाय दररोज रात्री न चुकता करावा. यामुळे आपल्या जीवनातील सर्व कष्ट व बाधांचे निवारण होईल.
घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सकारात्मक ऊर्जेचा निर्मिती होईल. उत्पन्नाचे खुले मार्ग निर्माण होतील. या उपायांमुळे आपल्या कुंडलीत काही ग्रह दोष असतील शनि दोष राहू दोष केतू दोष हे सर्व दोष नष्ट होतील. आणि आपल्याला त्या ग्रहांच्या दोषातून मुक्तता मिळेल. आणि आपल्या साधनसंपत्तीत ही वाढ होईल.
उपाय अगदी साधा व सोपा आहे. त्याशिवाय खूप प्रभावीही आहे. हा उपाय नक्की करून पहा आणि स्वतः अनुभव घ्या. मित्रांनो माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा.
माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद