नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो १० सप्टेंबर शुक्रवार च्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या घरोघरी विराजमान होणार आहे. कोणाच्या घरी दीड दिवस कोणाच्या घरी पाच, सात, दहा, अकरा असे बाप्पा विराजमान होत असतात. तर मित्रांनो या दिवसांमध्ये आपण गणपतीची एक खास सेवा करावी.
ही सेवा म्हणजे बाप्पाची आणि स्वामींची सेवा आहे. जर तुम्हीही स्वामी भक्त असाल तर ११ दिवस अनंत चतुर्थी पर्यंत ही स्वामींची सेवा नक्की करा. तुम्हाला घरात पैसा, सुख, ऐश्वर्य सर्व काही मिळेल कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही. मित्रांनो या सेवेमध्ये तुम्हाला तीन गोष्टी करायच्या आहेत.
ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकतात एक वेळ तुम्ही निश्चित करावी. देवघरासोर बसून अगरबत्ती दिवा लावुन तुम्हाला तीन गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक वेळेस गणपती अथर्व शीर्ष वाचायचे आहे.
स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या पोथीत गणपती अथर्व शीर्ष दिलेले आहे. त्यानंतर तुम्हाला एक माळ श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हे झाल्यावर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या नामाचा सुद्धा जप करायचा आहे.
तर या तीन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अकरा दिवस करायच्या आहेत एकही दिवस न चुकता. तुम्ही अन्य कोणती सेवा करत असाल तर त्या सेवेबरोबर आम्ही सांगितलेली ही सेवा सुद्धा तुम्ही करू शकतात.
यामुळे गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील व तुम्हाला सुखसमृद्धी, ऐश्वर्य, पैसा कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही.
मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.
मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.