नमस्कार मित्रांनो.
२० फेब्रुवारीला आहे सोमवती अमावस्या आणि या दिवशी ३ गोष्टी केल्यास तुमच्या आर्थिक समस्या सुटू शकतात. इतरही समस्यांचे निवारण होऊ शकते. कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी चला जाणून घेऊयात जी अमावस्या सोमवारी येते त्या अमावस्याला सोमवती अमावस्या असे म्हणतात. समवती अमावस्याला दानधर्माचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे.
या दिवशी काही उपाय केल्यास व्यक्तीच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात पैशांची अडचणही मिळते त्यामध्ये जर तुम्हाला नोकरीची समस्या असेल तर ज्योतिष शास्त्रानुसार नोकरीशी संबंधित समस्या असल्यास तुम्ही काय करायचं. आहे तर सोमवती अमावस्येच्या दिवशी ओमकार या मंत्राचा जप करायचा आहे.
ओमकार चा जप केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात याशिवाय कुत्र्याला रात्री मोहरीचे तेल लावलेली भाकरी खाऊ घालायची आहे. त्यामुळे सर्व अडचणी आणि करिअरमधील सर्व अडथळे दूर होतात लक्षात घ्या हा ग्रहांशी संबंधित उपाय आहे जर तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तर तुम्ही हा उपाय करून बघू शकता.
ज्योतिष शास्त्रानुसार आणखीन एक उपाय तुम्ही करू शकता तो म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी मौन व्रत धारण करणे. सोमवती अमावस्येला जर तुम्ही मौनव्रत धारण केले तर हजार गाई दान केल्याची पुण्य मिळत अस म्हटल जात. आता लक्षात घ्या मौनव्रत धारण करायच. पण टीव्ही बघताय, गाणे ऐकताय हे सगळ करायच आसा त्याचा अर्थ होत नाही.
मौन व्रत धारण करायच म्हणजे ईश्वराची साधना करायची. मनातली मनात ईश्वराच्या नामाचा जप करायचा, संसारिक गोष्टीतून लक्ष काढून घ्यायच आणि तो संपूर्ण दिवस ईश्वर साधनेमध्ये व्यतीत करायचा. असा त्याचा अर्थ आहे तरच तुम्हाला हजार गाईदान केल्याचे पुण्य मिळू शकतो. त्याचबरोबर या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा केली जाते.
भगवान श्री हरी विष्णूंची पूजा सुद्धा या दिवशी केली तर मनोकामना पुरती होते असे म्हटले जाते. पूजेनंतर पिंपळाच्या झाडाला १०८ प्रदक्षिणा अवश्य घालाव्या आणि नतमस्तक होऊन आपल्या जीवनातील समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करावी. आता बघूया आर्थिक सुबत्ता आर्थिक संपन्नता यावी यासाठी ज्योतिषशास्त्राने काय उपाय सांगितले आहेत तर सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला सुती धागा १०८ वेळा प्रदक्षिणा मारून गुंडाळा.
असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात आर्थिक सुबत्ता येते त्याचबरोबर तुमच्या घरातल्या मुलांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते. त्यामुळे संपत्ती येते आणि संकटे दूर होतात. माणसाच्या आयुष्यात सर्व प्रयत्न करून ही पैसा जेव्हा येत नाही किंवा पैसा या ना त्या कारणाने खर्च होतो. तेव्हा ज्योतिष शास्त्रातले हे काही उपाय करून बघायला हरकत नाही.
सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही तुळशीची पूजा सुद्धा नक्की करा. तुळशीला पाणी घाला फुल और आणि त्यानंतर धूपदी दाखवून भक्ती भावाने श्रीहरी विष्णूंच्या कोणत्याही एका मंत्राचा जप तुम्ही तुळशीजवळ बसून १०८ वेळा करू शकता. तुमच्या जीवनातील कशाही प्रकारच्या संकटे असली तरी त्यामुळे ती दूर होतील.
मंडळी आता उपाय मी सांगितले आहे त्यातला कुठलाही एक उपाय जो तुम्ही करू शकतात तो करून बघू शकता पण त्यासाठी आधी तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असायला हवा जर असेल तर यातला कोणताही उपाय श्रद्धाभक्ती पूर्ण अंतकरणाने करून बघा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.