पाठवणीच्या वेळी नवरीचा हातून तांदूळ का उधळतात. ही आहेत ५ कारण.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी भारतात जेवढे प्रांत तेवढ्या पद्धती आहेत. त्यात प्रत्येक प्रांताची आपली अशी वेगळी खासियत असते. रूढी परंपरा असते. लग्नाच्या पद्धती ही वेगवेगळ्या आहेत पण एक पद्धत मात्र बहुतांश ठिकाणी बघायला मिळते ती म्हणजे पाठवणीच्या वेळी तांदूळ उधळणे. हा विधी लग्नाच्या शेवटी केला जातो. नवरी सासरी जाताना ती तांदूळ उधळते. पण प्रत्येकाला या मागचं कारण माहिती नाही.

चला तर मग जाणून घेऊयात यामागे काय शास्त्रीय कारणे आहेत. मित्रांनो लग्न हे शुभकार्य असतं. त्याच्या प्रत्येक विधीत पद्धतीत आनंदाचे वातावरण असत गणेश पूजनापासून याची सुरुवात होते. साखरपुडा झाला मेहंदी हळद लग्नाचे विधी रिसेप्शन अशा सगळ्याच गोष्टी फार आनंदात वातावरणात पार पाडतात.

पण शेवटी मुलीची पाठवणी करण्याचा क्षण सगळ्यांसाठीच फार भावक्षण मानला जातो. मुलीची पाठवणी करताना तिला निरोप देताना पुढे चालत मागे न बघता नवरीच्या हातून मागे तांदूळ उधळले जातात. ती तिच्या माहेरच्यांनी विशेषत नवरीच्या आईने झेलावे असे मानले जाते. हा विधी का केला जातो हे सविस्तर जाणून घेऊयात.

तांदळाला लक्ष्मीचं प्रतीक समजले जात. समृद्धीचे प्रतीक मानलं जात. म्हणून नवरी मुलगी माहेरचा अंगणात तांदूळ उधळते. नवरी जाताना ते उधळते कारण यामध्ये असा विश्वास असतो की जरी तिचं लग्न झालं तरी माहेरच्या सुख आणि समृद्धीसाठी ती प्रार्थना करते. मुलीला लक्ष्मीचे रूप मानलं जात.

तिची पाठवणी केली म्हणजे तिचा सोबत माहेरची लक्ष्मी जाऊ नये म्हणून त्याचं प्रतीकात्मक म्हणून तांदूळ ती उधळते. एकाअर्थी माहेरची लक्ष्मी तिथेच नांदू दे अशी ती शुभेच्छा देते. शिवाय लहान ची मोठी ज्या घरात झाली तिथे कशाचीच कमतरता भासू नये या शुभेच्छा सह धन्यवाद करण्याचं हे माध्यम समजलं जात.

म्हणून नवरी मुलगी घरची लक्ष्मी सासरी जाताना अंगणात तांदूळ उधळते. तांदूळ ही समृद्धीचे प्रतीक आहे. आणि जेवणाचाही अभिन्न अंग आहे. त्यामुळे माहेरी अन्नाची कमतरता भासू नये अशी मनोकामना करत मुलगी सासरच्या वाटेने निघते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *