नमस्कार मित्रांनो.
तसे तर झाडू एक असामान्य वस्तू आहे. ज्याने आपण आपले घर स्वच्छ करतो. परंतु शास्त्रांमध्ये या वस्तूचा म्हणजे झाडूचा संबंध महालक्ष्मी मातेच्या कृपेशी जोडला गेला आहे. झाडू आपल्या घरातील कचऱ्याच्या रूपातील असलेली दरिद्रता घरातून बाहेर काडते.
साफसफाईच्या रूपात महालक्ष्मीची कृपा आपल्याला मिळवून देते. ज्या घरात स्वच्छता असते तेथे देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते. असे म्हटले जाते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर कोणत्याही एका मंदिरात दान करा.
परंतु हे दान गुप्तदान म्हणून करायचे आहे. हे कोणाला सांगू नये व कोणासमोरही झाडु ठेवू नये. एक दिवस अगोदर तीन झाडू घरी आणून ठेवावे. व दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे कोणाला दिसणार नाही. अशा वेळी तीनही झाडू मंदिराच्या दरवाजात ठेवून निघून यावे.
यामुळे आपल्या आर्थिक परिस्थितीत नक्कीच सुधारणा होते. ही प्रथा खूप प्राचीन काळापासून चालत आलेले आहे. प्राचीन काळी लोक मंदिरात झाडूनचे गुप्तदान करीत असत. सकाळी ब्रह्मा मुहूर्तावर मंदिरात झाडू ठेवावेत. हे काम करताना एखादा विशेष दिवस निवडावा.
म्हणजे एखादा सण-उत्सव ज्योतिषातील शुभयोग किंवा या दिवशी नाही जमले तर एखाद्या शुक्रवारी हा उपाय करावा. हे काम कोणालाही न सांगता गुप्त स्वरूपात करावे. आपल्या शास्त्रांमध्ये गुप्तदानाचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. झाडू मुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
जर घरातील कचरा धूळ जाळी जळमटे व्यवस्थितरीत्या स्वच्छ केले नाही तर घरातील वातावरण नकारात्मक बनते. झाडू मुळे ही सर्व घाण आपण बाहेर काढतो. म्हणजेच नकारात्मकता बाहेर काढतो.
घरातील वातावरण सकारात्मक बनते. नकारात्मक वातावरणात राहणारे व्यक्तींचे विचारही नकारात्मक होऊ शकतात. कारण आपण जसा वातावरणात राहतो. तसाच प्रभाव आपल्यावर पडतो. आणि याचाच प्रभाव घरातील आर्थिक स्थितीवर पडू शकता.
घराची जर स्वच्छता ठेवली तर वेळोवेळी साफ-सफाई केली तर अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत नाहीत. व अशा समस्यांना सामोरे हि जाऊ शकत नाही. तसेच देवी-देवतांची कृपा आपल्याला प्राप्त होते शास्त्रांमध्ये झाडूला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे.
म्हणून कोणत्याही प्रकारे झाडूचा अनादर करू नये. आजही अनेक लोक झाडूला पाय लागल्यानंतर झाडूला प्रणाम करतात. मी झाडू ला दरवाजामागे ठेवणे जास्त शुभ असते. झाडू कधीही उभा ठेवू नये. अपशकून असतो जेव्हा तुम्ही नवीन घरात प्रवेश करणार आहात.
तेव्हा नवा झाडू घेऊन प्रवेश करावा. हा शुभशकुन मानला जातो. यामुळे आपल्यावर देवी-देवतांची कृपा होते. व नवीन घरामध्ये सुख समृद्धी येते आणि धनधान्याची बरकत येते. जर घरामध्ये एखादे लहान बालकाच्या नक्की हातामध्ये झाडू घेऊन घर झाडायला लागले तर असे समजावे की एखादा पाहुणा अचानक आपल्या घरी येणार आहे.
सूर्यास्ताच्या वेळी कधीही घर झाडू नाही. असे केल्याने घरात दरिद्री येते. घराची साफसफाई कधीही सूर्यास्तापूर्वी करावी. कारण सुर्यास्ताच्या पूर्वी देवी लक्ष्मी पृथ्वी वर फिरत असते. आणि या वेळी जर आपण घर आमचा झाडले तर देवी लक्ष्मीला घराबाहेर काढल्या सारखे होते.
म्हणूनच स्वच्छता कधीही सूर्यास्त पूर्वीच करावी. जेव्हा झाडूचे काम संपते. तेव्हा झाडू कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावा. बाहेरच्या व्यक्तीला जर आपल्या घरातील झाडू दिसला तर घरात भांडण तंटे होऊ शकतात. असे वास्तूशास्त्रात म्हटले गेले आहे.
झाडू ला कधीही पाय लावू नये झाडूला पाय लावणे म्हणजे झाडूचा अपमान करणे होय. आणि पर्यायाने देवी लक्ष्मीचा निराधार करणे होय. म्हणून झाडून नेहमी लपवून ठेवावा. असे केल्याने घरात बरकत येते.
चला तर मग जाणून घेऊया झाडू कोणत्या दिशेला ठेवावा. ते झाडू कधीच ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर-पूर्व दिशेला ठेवू नये. यामुळे घरात बरकत राहत नाही. झाडू नेहमी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावा. हे आपल्या घरासाठी आणि घरातील सदस्यांसाठी शुभ असते.
मित्रांनो माहिती तर तुम्हाला नक्कीच आवडले असेल. माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि काही प्रश्न असेल तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद