नमस्कार मित्रांनो.
शुभ सकाळ शुभ संयोग जोडून आला की व्यक्तीच्या नशिबाला कलाटणी घ्यायला वेळ लागत नाही. उद्या शनिवार पासून असाच काही संयोग काही राशींच्या जीवनात येणार असून भगवान शनि देवाची विशेष कृपा यांच्या राशीवर असणार आहे. आता आपल्या जीवनातील दुःखाचे वाईट दिवस संपणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या जीवनात येणार आहेत.
शनी देवाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील अमंगळ काळ आता संपणार असून मांगल्याची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही आपल्या जीवनातील ग्रह नक्षत्राची नकारात्मक स्थिती आता बदलणार असून आता ग्रह नक्षत्र आपल्यासाठी शुभ फळ देणार आहेत. आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार हे आपल्या जीवनात चालू असलेली नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे.
कामात येणारे अपयश आता दूर होणार असून हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनात येणारी वारंवार संकटे आता दुर होणार आहे. घर परिवारात चालू असलेला कलह मानसिक अशांतता दूर होणार असून सुख-समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. नात्यांमधील दुरावा दूर होणार असून नात्यांमध्ये आपुलकीचा भाव निर्माण होणार आहे. जीवनातील संघर्षाचा काळ आता समाप्त होणार आहे.
मित्रांनो मागील दिवस हे तुमच्या साठी वाईट होते. नक्षत्राची अनुकूलता नसल्यामुळे कामे बनत नव्हते. पण आता ग्रह नक्षत्र योग्य ठिकाणी असल्यामुळे काळ शुभ बनत आहे. आलेल्या संधीचे सोने करून घेणे महत्त्वाचे आहे. प्रयत्नांची गती वाढवणे आवश्यक असून प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे. मन लावून मेहनत केल्यास प्रगतीला वेळ लागणार नाही, प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील.
आज मध्यरात्रीनंतर आषाढ शुक्लपक्ष चित्रा नक्षत्र, दुर्गा अष्टमी दिनांक १७ जुलै रोजी शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनी देवाचा दिवस असून आज दुर्गाष्टमी असल्यामुळे या दिवसाला जास्तच महत्व प्राप्त होत आहे. दुर्गाष्टमी आणि शनिवार मिळून अतिशय शुभ संयोग बनत आहे. मित्रांनो भगवान शनिदेव हे कलीयुगाचे देवता मानले जातात. त्या सोबतच धनसंपत्ती चे कारक मानले जातात. जेव्हा शनी महाराज प्रसन्न होतात तेव्हा कोणाची ही प्रगती घडून यायला वेळ लागत नाही.
शनिदेव हे न्यायाचे देवता असून कर्म फळाचे दाता आहेत. त्यासाठी शनीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपले कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या काळात आपल्याला वाईट कामांपासून दूर राहणे आवश्यक आहे. वाईट विचार किंवा नकारात्मक विचारांचा त्याग करावा लागेल. सकारात्मक विचारांनी जीवन जगणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शब्दांनी कोणाचे मन दुखावणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
शनीच्या कृपेमुळे या कामांना हात लावणार किंवा ज्या कामासाठी प्रयत्न करणार त्या कामांमध्ये तुम्ही पूर्णपणे यशस्वी होणार आहात. उद्योग व्यवसाय आणि क्षेत्रामध्ये प्रगती चे दिवस येणार आहे.
आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अत्यंत अनुकूल ठरणार आहे. याकाळात पैशांचा योग्य उपयोग करणे आवश्यक आहे, अनावश्यक खर्च टाळावा लागेल. शनी देवाच्या कृपेने आपल्या धन संपत्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहे.
आपण ज्या राशीं बद्दल बोलत आहोत त्या आहेत. मेष, कुंभ मकर, मिथुन, कन्या, सिंह.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.