हनुमान चालीसा वाचल्याने मिळतात “हे” फायदे. तुम्ही पण वाचताय का हनुमान चाळीसा.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धर्मामध्ये पवनपुत्र हनुमान यांना विशेष महत्त्व प्राप्त आहे. अडचणींच्या काळात श्री हनुमान आपल्या भक्तांसाठी धावत येतात अशी मान्यता आहे. शिवाय श्री हनुमान भगवान शंकरांचे अवतार आहेत आणि त्यांना जर आपल्याला प्रसन्न करायचा असेल. तर हनुमान चालीसाचे पटन करणे आवश्यक आहे.

हनुमान चालीसाचे पठण केल्याने श्री हनुमान यांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त तर होतेच त्याचबरोबर हनुमान चालीसाच्या पठणाने आपल्याला आयुष्यातील दुःख सुद्धा कमी होण्यास मदत होईल. याही व्यतिरिक्त हनुमान चालीसाच्या पटनाने काय फायदे होतात आणि हनुमान चालीसाच्या पटनाची योग्य वेळ कोणती चला जाणून घेऊयात.

भगवान श्री हनुमान भगवान श्रीरामाचे सर्वात मोठे भक्त आहेत. श्री हनुमान चालीसा मध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे. शिवाय श्री भगवान हनुमानाला महादेवांची रूपही मानले जाते. जर तुम्ही पूर्ण भक्तिभावाने त्यांची प्रार्थना केली. तर भगवान हनुमान तुमच्या मार्गातील सर्व अडचणी दूर करतात. आपले मन अस्वस्थ असेल तर हनुमान चालीसाचे पटन नक्की करा.

यामुळे आपण दिवसभर आनंदी राहू शकतो असेही म्हणतात. जर तुम्हाला वाईट शक्तीपासून मुक्ती मिळवायची असेल. तर हनुमान चालीसाचे पठण करणे फायदेशीर ठरेल. त्याचप्रमाणे श्री हनुमान चालीसा उशाखाली ठेवून झोपल्याने त्याचा फायदा होतो. त्याबरोबरच दररोज हनुमान चालीसाची पठण केल्याने भीती पासून मुक्ती मिळते आणि आयुष्यात बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला छोट्या छोट्या गोष्टींची भीती वाटू लागते.

श्री हनुमान चालीसाचे पठण केल्याने व्यक्तीला कशाचीही भीती वाटू शकत नाही. यासाठी तुमचा आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो. बऱ्याच लोकांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो. आभावामुळे त्यांना यश मिळवता येत नाही. म्हणूनच दररोज हनुमान चालीसांचा पाठ करावा. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.

श्री हनुमान चालीसाचे पठण केल्याने व्यक्तीला आर्थिक त्रासातूनही मुक्ती मिळते. जर तुम्हाला कर्जामुळे त्रास होत असेल तर दररोज श्री हनुमान चालीसाचे पठण करावे. ते केल्याने आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास प्रारंभ होतो. याबरोबरच रोज हनुमान चालीसाची पठण केल्यास कोणत्याही कामात अडथळे येत नाहीत.

माणसाला प्रत्येक कामात यश मिळू लागत. रोज हनुमान चालीसाचे पठण केल्याने नकारात्मकता ही दूर होते आणि सकारात्मकतेचा आपल्यामध्ये संचार होत असतो. जो व्यक्ती नियमितपणे हनुमान चालीसाचे पठण करतो. त्याला स्वतः हनुमान संरक्षण देत असतात. रोज हनुमान चालीसाची पठण केल्यास मोठे आजारही बरे होतात.

जो व्यक्ती दररोज हनुमान चालीसाची पठण करतो तो आजारांपासून दूर राहतो. श्री हनुमान चालीसाचे नियमित पाठ केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळते. श्री हनुमान यांच्या भक्तांवर वाईट नजर पडत नाही असे सुद्धा म्हटले जाते. हनुमान चालीसा सकाळी किंवा संध्याकाळी वाचावी.

काही लवकर उठून आंघोळ करून हनुमान चालीसा वाचावी. जर तुम्हाला संध्याकाळी हनुमान चालीसा वाचायची असेल तर तुम्ही स्वच्छ आंघोळ करून पठण करू शकता. त्याचबरोबर कोणत्याही प्रवासापूर्वी जर तुम्हाला अपघाताची भीती असेल तर कोणत्याही प्रवासाची सुरुवात तुम्ही हनुमान चालीसा वाचून सुरू करू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *