दररोज सायंकाळी लावा असा दिवा. भगवान कुबेर घरात आणतील धन दौलत..

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

आपण देवपूजा करताना सर्वात आधी दिवा लावतो कारण दिवा लावल्याशिवाय केलेले कोणतेही पूजन अपूर्ण असते आपण जी काही पूजा करतो ती सर्व पूजा भगवंतांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य दिव्यामार्फतच होत असते. ते म्हणून देवपूजा करण्यापूर्वी सर्वात आधी दिवा लावावा. आज आपण या लेखामध्ये दिवा लावण्याचे काय नियम आहेत. तेलाचा दिवा व तुपाचा दिवा कसा कधी व कुठे लावावा, लावल्याने कोणकोणते लाभ होतात.

दिवा कसा लावावा ज्यामुळे आपल्याला यशाची प्राप्ती होईल आणि कुबेर निरंजन दिवा कसा कधी व कोठे लावावा ज्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होईल. हे सर्व पाहणार आहोत. घरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते, काही गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणे आवश्यक आहे, आपण देवघरात जो दिवा लावतो. तो लावण्यापूर्वी तो घासून पुसून लख्ख करावा नंतरच दिवा लावा.

दिवा कुठूनही तुटलेला फुटलेला तेल गळणारा असू नये. काही घरांमध्ये दिव्यावर तेलाचा थर आलेला असतो तोच दिवा सतत लावला जातो. यामुळे देव आपल्यावर कधीच प्रसन्न होणार नाही, कारण जेथे स्वच्छता असते अशाच ठिकाणी भगवंतांचा वास असतो. म्हणून देवघरात दोन दिवे ठेवावेत आणि रोज दिवा घासून पुसून बदलावा. काही घरांमध्ये तेलाचा दिवा लावला जातो, काही ठिकाणी तुपाचा दिवा लावला जातो. तर काही घरांमध्ये मध्ये तेलाचा व तुपाचा असे दोन दिवे लावले जातात.

तेलाचा दिवा कष्ट, बाधा, संकटे व अडचणींपासून सुटका मिळवण्यासाठी लावला जातो. तर तुपाचा दिवा धनसंपत्ती आणि सुख समृद्धी मिळवण्यासाठी तसेच मनोकामना पूर्तीसाठी लावला जातो. यांच्याकडे गायचे शुद्ध तूप असेल त्यांनी तर दररोज शुद्ध तुपाचा दिवा जरूर लावावा. परंतु आजकाल सर्वच गोष्टींमध्ये भेसळ येत असल्याने बहुतेक जण तेलाचा दिवा लावणे पसंत करतात. त्यांच्या घरी गाईचे तूप काढले जाते त्यांनी अवश्य घरात तुपाचा दिवा लावावा. यामुळे अनेक फायदे होतात.

तुपाचा दिवा व तेलाचा दिवा असे दोन्ही प्रकारचे दिवे लावले जातात. परंतु कोणता दिवा कोणत्या दिशेला लावावा हे आपल्याला माहीत नसते. या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ज्यामुळे आपली देवपूजा लाभदायक किंवा नुकसानदायक ठरू शकते. तुपाचा दिवा नेहमी आपल्या उजव्या बाजूला म्हणजेच देवघराच्या डाव्या बाजूला लावावा. तर तेलाचा दिवा नेहमी आपल्या डाव्या बाजूला म्हणजेच देवघराच्या उजव्या बाजूला लावावा. आपण मंदिरांमध्ये गेलो की, आपल्याला हे लक्षात येते अशा प्रकारे दिवा लावल्यास आपल्याला लाभ होतात.

त्याबरोबर दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी याविषयी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. आपले देवघर हे नेहमी ईशान्य दिशेला असावे आणि ज्यावेळी आपण दिवा लावतो त्यावेळी दिव्याची ज्योत पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी पश्चिम किंवा दक्षिण दिशेला दिव्याची ज्योत कधीही असू नये. पूर्व किंवा उत्तर दिशेला दिव्याची ज्योत असल्यास धनप्राप्तीचे योग बनतात व आपल्या मनोकामनांची ही पूर्तता होते.

चुकीच्या दिशेला दिव्याची ज्योत लावल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही. अशा प्रकारे तुपाचा दिवा लावल्यास आपल्या मनोकामनांची पूर्तता होते व सुख-समृद्धीतही वाढ होते आणि तेलाचा दिवा लावला तर आपल्या सर्व कष्ट, बाधा व अडचणीचे निवारण होते. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. परंतु दिवा लावताना या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की, एकाच दिव्यात कधीही तूप व तेल एकत्रित घालू नये. जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर त्यात तूप टाकू नये आणि तुपाचा दिवा लावत असाल तर त्यात तेल टाकू नये.

जे व्यक्ती नेहमीच तुपाचा दिवा लावतात, त्यांना नक्कीच समृद्धी मिळते व त्यांच्या कष्टाचे हे निवारण होते. या गोष्टीकडे लक्ष द्यावे कोणतेही कार्य करताना नियमपूर्वक व योग्य पद्धतीने केले तर त्याचे पूर्ण फळ आपल्याला मिळते. जर तुम्ही खूप कष्ट करता, पण त्याचे योग्य फळ तुम्हाला मिळत नाही तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल. तुम्हाला नोकरीचे आवश्यकता असेल, परंतु नोकरी मिळत नसेल तुम्ही कर्जबाजारी झाला आहात अशावेळी या सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी श्रीहरी विष्णू भगवंत व देवी लक्ष्मी समोर दररोज शुद्ध तुपाचा दिवा लावावा. परंतु यातील दिव्याची वात ही लाल रंगाच्या दोऱ्याची असावी.

यासाठी तुम्ही लाल रंगाचा नाडा वापरू शकता कापसाची वाट नसावी लाल नाड्या ने शुद्ध तुपाचा दिवा लावल्यास त्याचे खूप फायदे होतात ज्या दिव्यात दररोज हळद-कुंकू टाकून नमस्कार करावा रोजगार नियमपूर्वक अशा प्रकारे दिवा लावला तर त्याचे खूप शुभ फायदे आपल्याला मिळतात. व धनप्राप्तीचे फायदेही अनेक होतात. त्याचे फायदे बघून तुम्ही अचंबित व्हाल तुमच्याकडे धनाचा ओघ वाढेल व तुमची वेगाने प्रगती होईल.

अशाच प्रकारे जर तुमच्यावर खूप मोठे संकट आले असेल तुम्हाला तुम्हाला कशाची तरी भीती वाटत असेल तर हनुमानासमोर रोज लाल दिव्याच्या वतीने चमेलीच्या तेलाचा रोज तीन मुखी दिवा लावा यामुळे आपल्यावर हनुमानजींची कृपा होते. व आपली भीती व कष्ट दूर होतात . हा उपाय तुम्ही हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी व मनोकामना पूर्ण करण्यासाठी करू शकता चमेलीच्या तेलाचा दिवा लावल्याने कोणत्याही प्रकारचे अनामिक भीती असेल तर ती दूर होते .

या उपायाने खूप दिवसांपासून चालत असलेल्या आजारपण ही दूर होते आणि मनोकामनांची पूर्तता होते. दिवाना दिवा लावताना राईच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा वापर करावा यामुळे जास्त शुभ फळे प्राप्त होतात. तसे तर आपण रोजच भगवंतांपुढे दिवा लावत असतो परंतु लक्ष्मी प्राप्तीसाठी जो दिवा लावला जातो तो दिवा कुबेर निरंजन दिवा घ्यावा कुबेर निरंजन दिवा हा बस का व गोल असतो याला पुढे चोची सारखा थोडा मोठा भाग तयार केलेला असतो.

हा दिवा आपण तेलाचा किंवा तुपाचा कोणत्याही प्रकारे लावू शकतो परंतु हा दिवा लावताना या दिव्यात एक लवंग काळी तीळ तांदूळ किंवा फुलाची एखादी पाकळी यापैकी कोणतीही एक वस्तू आवश्यक आहे काहीही न टाकता हा दिवा लावू नये अशा प्रकारे आपण हा दिवा जर भगवंतांपुढे लावला तर आपल्या घरात धन संपत्तीची भरभराट होते.

त्याशिवाय हा दिवा डायरेक्ट जमिनीवरही ठेवू नये या दिव्याखाली थोडेसे तांदूळ टाकावेत आणि त्यावरच हा देवा ठेवावा हा दिवा करणारा भरभराट आणणारा आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करणारा दिवा यामुळे आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपा होते व आपल्या घरात आपले घर धनसंपत्ती समृद्धी व ऐश्वर्याने भरून जाते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *