दिनांक १० जुलै आज आषाढी एकादशी या राशीचे भाग्य चमकणार पुढील १२ वर्ष राजयोग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

दिनांक १० जुलै आज आषाढी एकादशी या राशींची लागणार लॉटरी पुढील बारा वर्षे राजयोग. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच आषाढी एकादशीही विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते.

वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव किंवा सर्वात मोठा सण म्हणून आषाढी एकादशीला महत्त्व प्राप्त आहे. त्यामुळे या दिवशी भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक लाखो वारकरी पंढरपुरामध्ये दाखल होतात. आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी विठ्ठलाच्या दर्शनासाठी अतुर असतात.

आषाढ महिन्यातील शुक्लपक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला आषाढी एकादशी असे म्हटले जाते. या एकादशीला देवशयनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते. मान्यता आहे की या दिवसापासून पुढील चार महिने भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात. आणि या चातुर्मासात पुरात उपास आणि तप केल्याने अतिशय शीघ्र गतीने त्याच्या लाभ प्राप्त होतो.

त्याचे चांगले फळ प्राप्त होते. मान्यता आहे की या दिवशी उपास करून श्री विठ्ठलाची विधी विधान पूर्वक पूजा आराधना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व पाप दूर होतात. आणि भगवान विठ्ठलाच्या कृपेने सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते.

यावेळी आषाढी एकादशीला शुक्लयुग आणि ब्रह्म योग बनत आहे. त्यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. एकादशीला व्रत उपास केल्याने मृत्यूनंतर वैकुंठाची प्राप्ती होते. एकादशीच्या दिवशी शुभ कार्य करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. त्यासोबतच वाईट कामांपासून दूर राहणे आवश्यक आहे.

मित्रांनो मनामध्ये सुद्धा वाईट विचार येऊ देऊ नये. या दिवशी हा दिवस व्रत उपासनासाठी लाभकारी मानला जातो. या दिवशी दिवसभर विष्णू नामाचा जप करणे हे देखील अतिशय शुभ मानले जाते. आणि रात्री सुद्धा विष्णू नामाचा गजर करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.

या काळात व्यक्तीने जर चांगले कर्म केले तर त्याच त्यांना अतिशय चांगले फळ व्यक्तीला प्राप्त होते. उद्या आषाढ शुक्लपक्ष विशाखा नक्षत्र दिनांक दहा जुलै रोजी रविवार लागत असून देवश्यनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी आहे.

आषाढी एकादशीपासून पुढे येणारा काळ या काही भाग्यवान राशीसाठी अतिशय शुभ आणि सकारात्मक ठरण्याचे संकेत आहेत. भगवान विठ्ठलाच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व दुःख आता दूर होणार आहेत. अतिशय अनुकूल काळ दिवस आपल्या वाट्याला येण्याचे संकेत आहेत.

प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होणार आहात. जीवनात मोठे परिवर्तन घडवून येण्यास सुरुवात होणार आहे. आर्थिक क्षमता सुद्धा मजबूत बनणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशि पासून.

मेष राशी- विठ्ठलाची विशेष कृपा आपल्यावर बरसणार आहे आषाढी एकादशीपासून पुढे येणारा काळ जीवनाला नवा आकार देणारा काळ ठरणार आहे. आता व्यवसायातून आपल्याला आर्थिक लाभ होणार आहेत. सांसारिक जीवनामध्ये सुखद परिणाम आपल्याला दिसून येईल.

भगवान विठ्ठलाच्या कृपेने जीवनातील समस्या आणि दुःखांचा नाश होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. उज्वल भविष्याची कामना आता इथून पुढे आपण करू शकता. कारण इथून पुढे अतिशय सुंदर काळ आपल्या जीवनात येणार आहे.

आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नांना आता यश प्राप्त होणार आहे. आपल्या मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये सुद्धा वाढ होईल. सामाजिक क्षेत्रात आपण करत असलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. नोकरीच्या क्षेत्रात भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे.

संसारिक आणि वैवाहिक जीवनामध्ये अतिशय अद्भुत परिणाम आपल्याला दिसून येतील. ज्या कामासाठी मन लावून मेहनत कराल त्यामध्ये आपल्याला प्राप्त यश होणार आहे. आता इथून पुढे भाग्य देखील भरपूर प्रमाणात साथ देईल. हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरण्याची संकेत आहेत.

मिथुन राशी- मिथुन राशीवर भगवान विठ्ठलाची विशेष कृपा बरसणार आहे. भगवान विष्णूच्या आशीर्वादाने जीवनातील संकटाचा काळ समाप्त होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक अडचणी अनेक समस्या आता समाप्त होणार असून प्रगतीच्या नव्या दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत.

कार्यक्षेत्र करियर उद्योग व्यवसाय आणि व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल घटना घडण्याचे शक्यता आहे. सोबतच नोकरीमध्ये भरतीचे संकेत आहेत. मित्रपरिवार आणि सहकार्य आपली चांगली मदत करेल. मागील अनेक दिवसापासून मनात चालू असणारी घालमेल किंवा चिंता आता मिटणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. सांसारिक जीवनात गोडवा निर्माण होईल. मित्रपरिवार सहकार्य चांगले मदत करणार आहेत.

वृषभ राशी- धनसंपत्ती आणि सुख समृद्धीमध्ये वाढ होणार आहे. विठ्ठलाच्या कृपेने जीवनात चालू असणारा दुःखाचा आता समाप्त होणार असून सुख सौभाग्य आणि आनंदाची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

आता इथून पुढे कामात येणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतील. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून सरकारी कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होण्याचे संकेत आहेत. कोर्टाचे निकाल आपल्या बाजूने लागण्याची संकेत आहेत.

तुळ राशी- तुळ राशीच्या जीवनावर विठ्ठलाचा आशीर्वाद बरसणार आहे. एकादशीपासून जीवनाला नवी कलाटणी प्राप्त होईल. जीवनात सतत चालू असणारी परेशानी आता दूर होईल. अनेक दिवसापासून कामात येणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होणार आहेत. कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील.

हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक क्षमतेमध्ये पहिल्यापेक्षा वाढ दिसून येणार आहे. आता इथून पुढे व्यवसायातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे भाग्यदेखील मोठ्या प्रमाणात साथ देईल. आता नशिबाला एक नवी कलाटणी प्राप्त होणार आहे.

धनु राशि- धनु राशीच्या जीवनात सुखाची सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. उद्योग व्यवसाय आणि व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आपल्याला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होईल. ज्या क्षेत्रात भरघोस प्रमाणात मेहनत कराल त्या क्षेत्रात मोठे यश आपल्याला प्राप्त होईल. संसारिक जीवनात प्रगतीचे दिवस येणार आहेत. आता भाग्यदेखील मोठ्या प्रमाणात साथ देईल.

मकर राशि- मकर राशीच्या जीवनात सुख सौभाग्य आणि आनंदाची बहार येणार आहे. भगवान विठ्ठलाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. एकादशीपासून पुढे येणाऱ्या काळात जीवनात उत्तम प्रगती घडून येण्याची शक्यता आहे. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्यामध्ये मोठ यश आपल्याला प्राप्त होईल.

कौटुंबिक जीवनात आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. सुख सौभाग्य आणि वैभव मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. एकादशीपासून पुढे आपल्या जीवनात अतिशय अनुकूल घडामोडी घडवून येण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर एकादशीचा सकारात्मक प्रभाव दिसेल. एकादशी पासून पुढे येणारा काळ जीवनात उत्तम प्रगती घडून आणणारा काळ ठरणार आहे. ज्या क्षेत्रात आपण मेहनत करत आहात त्या क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होईल. मागील अनेक दिवसांचे आपले प्रयत्न आता फळाला येणार आहेत.

प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होईल. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहेत. आपले आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक व्यक्तीच्या दृष्टीने काळ विशेष अनुकूल आणि लाभदारी ठरण्याचे संकेत आहेत. नवा व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते.

मीन राशि- मीन राशि वर एकादशीच्या सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. आषाढी एकादशी पासून पुढे येणाऱ्या काळात जीवनात उत्तम प्रगतीचे संकेत आहेत. यशाचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. ज्या क्षेत्रात आपल्याला यश हवी असेल त्या क्षेत्रात आपण जर चांगले प्रयत्न केले निश्चित आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

शत्रूपासून या काळात शत्रूवर विजय प्राप्त होणार आहे. शत्रूपासून होणारा त्रास आता समाप्त होणार असून प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. संसारिक सुख समृद्धी आणि आनंदामध्ये भरभराट पाहाव्यास मिळेल. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. उद्योग व्यवसायात मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *