नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक एकादशीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच मोहिनी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी मानली जाते. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला मोहिनी एकादशी असे म्हणतात. हा दिवस भगवान विष्णू ला समर्पित आहे.
या दिवशी व्रत उपवास करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा देखील केली जाते मान्यता आहे की एकादशीच्या दिवशी उपवास करून भगवान विष्णूची पूजा आराधना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व पापे नष्ट होतात. सुख सौभाग्याची प्राप्ती होते.
एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ व्रत मानले जाते. मान्यता आहे की व्रत उपास करून संध्याकाळच्या वेळी गायीला गुळाचा नैवेद्य दिल्याने माणसाच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात. आणि आर्थिक परेशानी सुद्धा दूर होते.
सुख समृद्धी आणि आनंदाने जीवन बहरून येते. मित्रांनो मोहिनी एकादशीच्या दिवशी व्रत करणे हे अतिशय शुभ फलदायी मानले जाते. या वेळी येणारी एकादशी ही विशेष महत्त्वपूर्ण एकादशी आहे. कारण यावेळी एकादशीला अतिशय शुभ संयोग बनत आहेत.
या संयुगाच्या शुभ प्रभावाने या सहा राशींचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. यांच्या जीवनातील दुःख दारिद्रयाचा काळ आता समाप्त होणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाने यांचे जीवन फुलून येणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा सुंदर प्रवास सुरू होणार आहे.
मनासारखी फलप्राप्ती आपल्याला होऊ शकते. कार्यक्षेत्रातून प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत. संसारिक सुखात प्रेम आणि गोडवा निर्माण होणार आहे. मित्रांनो आज वैशाख शुक्लपक्ष उत्तरा नक्षत्र दिनांक 12 मे रोजी गुरुवार लागत असून मोहिनी एकादशी आहे.
एकादशी चा काळ ह्या काही खास राशींसाठी शुभ फलदायी ठरणार आहे. एकादशीपासून पुढे येणारा काळ यांच्या जीवनात आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.
मेष राशी- मेष राशी वर एकादशीचा फार सकारात्मक परिणाम दिसून येईल. उद्योग-व्यापार आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावर आहे. जिवनातील वाईट ग्रहदशा आता समाप्त होणार असून चुकी समृद्धीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे.
आता प्रगतीच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे या काळात चांगले कर्म करणे अत्यंत आवश्यक आहे. करणार आहात तेवढे चांगले फळ आपल्याला प्राप्त होऊ शकते. त्यामुळे या काळात चांगले कर्म करणे अत्यंत आवश्यक आहे.
वृषभ राशि- वृषभ राशि वर एकादशीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बसणार आहे. तारीख सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन भरून येणार आहे. मागील अनेक दिवसापासून आपल्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये अतिशय सुंदर प्रगती घेऊन येण्याचे संकेत आहेत. भगवान विष्णू ची कृपा सदैव आपल्यावर पडत राहील.
सिंह राशि- सिंह राशिच्या जीवनात अतिशय सुंदर काळ आपल्या वाट्याला येणार आहे. या काळात एकादशीचे व्रत उपवास करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. त्याबरोबरच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची भक्ती आराधना करणे आपल्यासाठी शिवाय फलदायी ठरणार आहे.
आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आपल्या योजना सफल बनतील. आपण करत असलेल्या प्रत्येक कामांना यश प्राप्त होणार आहे. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घेत आहात त्या क्षेत्रात आपल्याला मोठे यश प्राप्त होऊ शकते.
कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनात आनंदाची बाहार येणार आहे. वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल. आपण करत असलेल्या कामांना चांगले फळ प्राप्त होईल. हा काळ आपल्या प्रगतीचा काय ठरणार आहे. उद्योग-व्यापार यातून मोठ्या प्रमाणात लाभ होण्याची शक्यता आहे.
आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. भविष्याविषयी आपण पाहिलेले स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत. भगवान विष्णूची पूजा आराधना करणे आपल्यासाठी उपयोगी ठरू शकते.
तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ लाभकारी ठरणार आहे.
नवीन व्यवहार जमून येतील. आता इथून पुढे आपल्या कमाई मध्ये सुद्धा वाढ होणार आहे. कमाईचे अनेक स्रोत उपलब्ध होणार आहेत. पैशांची अडचण दूर होण्याचे संकेत आहेत. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा अर्चा करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.
कुंभ राशी- कुंभ राशिच्या जीवनात आता प्रगतीच्या वाटा मोकळा होणार आहेत. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्या क्षेत्रात आपल्याला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होऊ शकते.
मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. व्यापाराच्या दृष्टीने काय विशेष अनुकूल ठरणारा आहे. जीवनात चालू असलेली पैशांची अडचण आता दूर होईल. हाती पैसा खेळता राहणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद