या आहेत जगातील सर्वांत श्रीमंत राशी मकर संक्रांती पासून पुढील १२ वर्षे ७ व्या शिखरावर असेल यांचे नशिब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांती या सणाला विशेष महत्व प्राप्त आहे. खासकरून स्त्रिया या दिवसाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. सूर्याच्या मकर राशीत होणाऱ्या राशी परिवर्तनाला मकरसंक्रांती असे म्हटले जाते. या दिवशी सूर्याचे गोचर होत असल्यामुळे ज्योतिषानुसार हा दिवस विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो.

वैद्यकीय ज्योतीषा मध्ये सूर्याला ग्रहांचे राजा मानले जाते. त्यामुळे सूर्याचे राशी परिवर्तन मनुष्याच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पाडत असते. या वर्षी म्हणजे दिनांक १४ जानेवारी २०२२ रोजी सूर्य धनू राशी तून निघून मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे १४ जानेवारी रोजी मकर संक्रांती साजरी होणार आहे.

भगवान सूर्य देव हे ग्रहांचे राजा असून ते ऊर्जेचे कारक मानले जातात. सुख- समृद्धी, वैभव, यश आणि पराक्रमाचे कारक मानले जातात. ते मानसन्मान आणि प्रतिष्ठितेचे देखील कारक मानले जातात. सूर्याचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून आणत असतो.

सूर्य जेव्हा शुभफल देतात तेव्हा भाग्यदय घडून आल्याशिवाय राहत नाही. या वेळी येणारी मकर संक्रांत ही विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. कारण यावेळी संक्रांतीला त्रिग्रही योग बनत आहे. यामुळे ही संक्रांत अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

कारण यावर्षी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करणार असून या अगोदरच शनी आणि बुध हे मकर राशीत विराजमान आहेत.
त्यामुळे हा त्रिग्रही योग बनत आहे. या संयुगाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण १२ राशींवर दिसून येणार असून या काही खास राशीसाठी हा संयोग अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.

आता यांच्या जीवनातील संपूर्ण संकटे आता दूर होण्यास सुरुवात होणार आहे. मकर संक्रांती पासून आपल्या जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. आता आपल्या जीवनातील परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून यायला वेळ लागणार नाही.

आपल्या कष्टाला फळ मिळणार आहे. अनेक दिवसांचा अपूर्ण राहिलेला या काळात अनेक दिवसांचा आपला संघर्ष आता फळाला येणार आहे. अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना आता पूर्ण होण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना कोणते फळ प्राप्त होणार आहेत.

मेष राशी- मकर संक्रात पासून पुढचा काळ मेष राशि साठी विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. या काळात सूर्य आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत. खास करून हा दिवस धन प्राप्तीसाठी लाभदायी ठरणार आहे. या काळात मान सन्मान आणि प्रतिष्ठामध्ये वाढ होणार आहे.

आपल्या साहस आणि पराक्रमामुळे वाढ दिसून येईल. सांसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. वैवाहिक जीवनात परम सुखाचा अनुभव आपल्याला होणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगती, करिअरमध्ये प्रगती आणि नोकरीत देखील प्रगतीचे संकेत आहेत. सूर्याचे गोचर सर्वच दृष्टीने शुभ ठरणार आहे.

आर्थिक आवक समाधान कारक असेल. पैशांना बरकत प्राप्त होणार आहे. अधिकारी वर्गाशीनम्रतेने वागणे आपल्यासाठी हितकारक ठरणार आहे. या काळात आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे किंवा शब्दावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. कोणाचेही मन दुखेल असे काही बोलू नका, कुणाच्या मनाला लागेल असे चुकूनही बोलू नका.

वृषभ राशी- वृषभ राशीसाठी हा काळ विशेष ठरण्याचे संकेत आहेत. संक्रांती पासून पुढचा काळ नवी कलाटणी देणारा काळ ठरणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधान कारक होणार आहे. मागील कठीण काळा आता समाप्त होणार आहे. आपण ठरवलेले योजना यशस्वी रीत्या पूर्ण होणार आहे.

ज्या मागील काळात आपण ठरवलेल्या अनेक योजना आता सफल होतील. सकारात्मक मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहेत. मागील अनेक दिवसापासून कामात येणाऱ्या अडचणी आता समाप्त होणार आहेत. आध्यात्मिक सुखात वाढवण्याचे संकेत आहे. या काळात अध्यात्माची आवड देखील आपल्याला निर्माण होऊ शकते.

एखादा चांगला अध्यात्मिक गुरु किंवा एखादा चांगला मित्र सल्लगार आपल्याला मिळू शकतो. नातेसंबंधात आलेला दुरावा आता संपणार आहे. आपले नातेसंबंध मधुर बनणार आहेत. या काळात आपले मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. कलाकारांसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. सुख, दुःख आणि रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

कर्क राशी- कर्क राशीच्या सुख समाधानात वाढ होईल. हा काळ आपल्या राशि साठी विशेष अनुकूल ठरणार आहे. सूर्याचे गोचर लाभकारी ठरणार आहे. मैत्रीचे नाते अधिक मजबूत व वैवाहिक जीवनात सुख समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. अनेक दिवसा पासून भोगत असलेले दुःख आता समाप्त होणार आहे.

भोग विलासीतेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. आरोग्य उत्तम राहणार आहे. या काळात अन अपेक्षित धन लाभ होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात अनुकूल घडामोडी घडून येतील. पारिवारिक कलह आता संपणार आहे. मित्रांची आपल्याला मदत लागणार आहे. या काळात मित्र आपल्याला भरपूर मदत करतील. नातेसंबंधात झालेली कटुता आता काहीशी कमी होणार आहे.

नातेसंबंध थोडेसे मधुर बनतील. नोकरीत अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. नोकरीसाठी हा काळ अनुकूल आहे. नोकरी आपले मन रमणार आहे. आपल्या कल्पनेत होत्या. त्या योजना आता प्रत्यक्षात उतरणार आहेत. संतती कडूननही एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.

आपल्या संततीकडून आपल्याला एखादी गोष्ट कानावर येण्याचे संकेत आहेत. मकर संक्रांती पासून पुढे प्रगतीचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. मकर संक्रांती पासून पुढे येणार्‍या काळात विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. माण सन्मानात वाढ होईल. पद प्रतिष्ठा मध्ये देखील वाढ होणार आहे.

सिंह राशी- सिंह राशीचा स्वामी हा सूर्य आहे. आपल्या राशीचा स्वामी सूर्य आहे. त्यामुळे हे गोचर आपल्यासाठी अतिशय लाभदायक ठरण्याची शक्यता आहेत. या काळात नोकरीसाठी जे प्रयत्न आपण करत आहात ते कदाचित आपल्याला यश मिळू शकते. नोकरीत बढतीचे योग देखील बनत आहेत.

बदली अथवा बढती आपल्याला मिळू शकते. या नोकरीत सुख प्राप्त होणार आहे. परीक्षा मध्ये देखील विद्यार्थी वर्गाला परीक्षांमध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा मध्ये देखील वाढ होईल. आपल्या कामाचे कौतुक होणार आहेत. अपूर्ण राहिलेली आपली कामे किंवा अपूर्ण राहिलेली इच्छा या काळात पूर्ण होतील.

मागील अनेक दिवसांपासून ज्या इच्छा आता आपल्या अपूर्ण राहिल्या आहेत. त्या या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. हा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरू शकतो. नवीन आर्थिक विवार्‍याला चालना प्राप्त होणार आहे. उद्योग व्यवसायात काही नवीन ओळखी आपल्या होणार आहे.

त्यामुळे नवीन आर्थिक व्यवहार होऊ शकतात. प्रगतीचे नवे संकेत आपल्याला प्राप्त होतील. वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येणार आहेत. पैशांची आवक वाढणार आहेत. काही पैशाची अडचण निर्माण झालेली आहे ती आता दूर होणार आहे.

कन्या राशी- सूर्याचे हे गोचर लाभकारी ठरणार आहे. मकर संक्रांती पासून पुढे विशेष अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. आता करिअरच्या दृष्टीने अतिशय आनंद दायी ठरण्याचे संकेत आहेत. करिअरमध्ये वारंवार येणाऱ्या अडचणी आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. व्यापारामध्ये देखील आपल्याला लाभ प्राप्त होईल.

मागील अनेक दिवसापासून येणाऱ्या व्यापारातील अडचणी आता समाप्त होतील. आर्थिक आवक वाढणार आहे. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहेत. कार्यक्षेत्रात आपल्या जिम्मेदारी मध्ये वाढ होणार आहे. म्हणजे काहीतरी नवीन जिम्मेदारी आपल्याला मिळू शकते. या काळात आपल्या कामाचे कौतुक देखील होईल.

आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. पैशांची गुंतवणूक या काळात करू शकता. पण गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. वैवाहिक सुख या काळात आपल्याला उत्तम लाभणार आहे.

या काळात केलेली गुंतवणूक पुढे चालून उपयोगी पडणार आहे. या काळात जो काही पैसा आपण गुंतवणूक करणार आहे. पुढे चालून त्या पैशां मध्ये खूप वाढ होऊन आपल्याला मिळणार आहे. पुढे चालून त्या पैशात आपल्याला लाभ प्राप्त होईल.

वृश्चिक राशि- सूर्याचे गोचर वृश्चिक राशीचा भाग्यदय घडून आणू शकतो. हा काळ आपल्यासाठी लाभकारी आहे. नोकरीत बदली अथवा बढतीचे योग येणार आहेत. अथवा परिवर्तन घडून येऊ शकते. म्हणजे नोकरीमध्ये बदल देखील होऊ शकतो. या काळात आपल्या जीवनात सुख-समृद्धी आणि आनंदात वाढ होणार आहे.

या काळात वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आता मंगलमय काळाची सुरुवात आपल्याला होणार आहे. आपला राशी स्वामी मंगळ असून सूर्य आणि मंगळ हे मित्र ग्रह मानले जातात. त्यामुळे हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

आपल्या कल्पनेत असणाऱ्या योजना आत्तापर्यंत जे आपल्या कल्पनेत होत्या किंवा आपल्या विचारात आतापर्यंत योजना होत्या त्या आता प्रत्यक्षात येऊ शकतात. हा बेरोजगारांसाठी अधिक काळ उत्तम आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होणार आहे.

या काळात आर्थिक सुखात वाढ होईल. सांसारिक सुख देखील उत्तम लाभणार आहे. व्यापारात आर्थिक आवक वाढणार आहे. करिअरमध्ये आता यश प्राप्त होणार आहे. मानसन्मान आणि प्रतिष्ठा मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.

मीन राशी- सूर्याचे गोचर मीन राशी साठी विशेष अनुकूल ठरणार आहे. या काळात काही आर्थिक अडचण येणार असल्या तरी किंवा काही अडचणी निर्माण होत असल्या तरी प्रत्येक अडचणीतून मार्ग देखील मिळणार आहे. धन प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणारा आहे. आपला अनेक दिवसांपासून अडकलेला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो.

आपल्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे. या काळात वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कोणाच्याही मनाला लागेल असे बोलू नका. या काळात रागावर देखील नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नोकरी मध्ये नम्रतेने वागणे आपल्या हिताचे ठरणार आहे. कुणाच्याही वादात पडू नका. किंवा वादापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *