धनत्रयोदशीच्या पूजेतील ही १ वस्तू ठेवा आपल्या तिजोरीत वर्षभर पैसा कमी पडणार नाही. सुख शांती मिळेल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो धनत्रयोदशीला माता लक्ष्मीच्या पूजेत वापरलेली ही एक वस्तू ठेवा आपले तिजोरीमध्ये. यामुळे वर्षभर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहील. मित्रांनो २ नोव्हेंबर मंगळवार या दिवशी धनत्रयोदशी आलेली आहे.

धनत्रयोदशी दिवाळीचा पहिला दिवस दिवाळीमध्ये लक्ष्मी आपल्या घरी आगमन करत असते. धनत्रयोदशीला लक्ष्मी कुबेर देवता आणि धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते. असं मानलं जातं लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो. कुबेर देवतेच्या कृपेने आलेला पैसा घरामध्ये टिकून राहतो.

आणि धन्वंतरी देवतेची पूजा केल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. निरोगी राहत. या दिवशी एका चौरंगावर लाल कपडा टाकायचा आहे. त्यावर माता लक्ष्मीची कुबेर देवतेची आणि धनवंतरी देवतेची प्रतिमा आपल्याला ठेवायचे आहे. त्यानंतर त्यांची विधीवत पूजा करायची आहे.

गंध पुष्प अक्षता यांना अर्पण करायचा आहे. आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असा खिरीचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे. मित्रांनो ही पूजा करताना एक गाईच्या तुपाचा दिवा अवश्य प्रज्वलित करा. आणि शक्य असेल तर कोणताही लाल रंगाचे फूल माता लक्ष्मीला नक्की अर्पण करा.

कारण मित्रांनो लाल रंगाचे फूल ते माता लक्ष्मीला प्रिय आहे. या दिवशी घरामध्ये आणि अंगणामध्ये तेरा तेरा दिवे अवश्य करा. यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा आहे. ती नाहीशी होते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. आता या दिवशी पूजा झाल्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही स्नानादी निवृत्त व्हाल.

आणि माता लक्ष्मीची केलेली पूजा आहे. चौरंगावर जी पूजा मांडलेले आहे. ते तुम्ही उचलाल तेव्हा माता लक्ष्मी च्या मुर्तीला अक्षता पदार्पण केलेले आहेत. अक्षत म्हणजेच जे तांदूळ आपण मात्र लक्ष्मीला अर्पण केले आहेत. त्यातील तांदळाचे ११ दाने आपल्याला घ्यायचे आहेत.

आणि हे ११ दाने लाल रंगाच्या कोणतेही कपड्यांमध्ये बांधायचे आहेत. याची छोटीशी पुरचुंडी बनवायची आहे. मित्रांनोही तांदळाची पूरकुंडी आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे. ज्या ठिकाणी आपण आपले दागिने ठेवतो.

धन ठेवतो पैसे ठेवतो त्या ठिकाणीही तांदळाची पुरचुंडी वर्षभर ठेवून द्यायची आहे. आणि दुसऱ्या वर्षी दिवाळी मध्ये सुद्धा तुम्हाला हाच उपाय करायचा आहे. आणि या वर्षी ठेवलेली जी तांदळाची पुरचुंडी आहे ते पुढच्या वर्षी पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे.

वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहे. अशाप्रकारे दरवर्षी तुम्ही काय करू शकता. मित्रांनो अक्षत हे समृद्धीचे प्रतीक मानलं जातं असे अक्षत जे आपण माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये अर्पण केले आहेत. ते जर वर्षभर आपण आपल्या घरातील तिजोरी ठेवले तर यामुळे मोठ्या प्रमाणात धन आपल्या घरात येत.

आलेला पैसा घरामध्ये टिकून राहतो. तसेच जर तुमच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज असेल. अनेक प्रयत्न करून देखील हे कर्ज फिटत नसेल. तर या उपायामुळे काही दिवसातच तुमचं कर्ज फिटायला सुरुवात होईल. घरामध्ये बरकत येईल. हाती घेतलेल्या प्रत्येक कार्य मध्ये तुम्हाला यश मिळू लागेल. तर मित्रांनो तुम्ही या दिवाळीमध्ये हा उपाय अवश्य करून पहा.

मित्रांनो हा उपाय तुम्ही धनत्रयोदशीला किंवा लक्ष्मीपूजन या दोन्हीपैकी कोणत्याही दिवशी करू शकता. जर तुम्ही धनत्रयोदशीला हा उपाय केलात. तर धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी पूजा उचलताना त्यातील तांदूळ काढून आपल्या तिजोरीत ठेवायचे आहेत.

आणि जर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला. तर लक्ष्मी पूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडव्या दिवशी महालक्ष्मीला अर्पण केलेल्या तांदळाचे दाणे आपल्या तिजोरीत ठेवायचे आहेत.

मित्रांनो हो उपाय जरी साधा वाटत असला तरी अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे. तुम्ही हा या दिवाळीमध्ये नक्की करून पहा. यामुळे माता लक्ष्मीच्या कृपाशीर्वाद वर्षभर तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नक्की राहील.

माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो. हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद

तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *