नमस्कार मित्रांनो
एक लवंग चा हा उपाय तुमच्यावर आलेले सर्व संकट नष्ट करेल सर्व अडचणीतुन तुम्हाला बाहेर काढेल. याने तुमच आयुष्य बदलेल तुमच्या जीवनात जेव्हा संकट नसतील, अडचणी नसतील तेव्हा तुमच आयुष्य नक्की बदलेल. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लवंग ची गरज आहे. लवंग घरात नसेल तर तुम्ही एखाद्या मसाल्याच्या दुकानातून आणू शकतात.
घरात असेल तर तोही लवंग वापरू शकतात. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या. लवंग पूर्ण पाहिजे तो कुठूनही तुटलेला वापरू नका अन्यथा तुम्हाला याचा लाभ होणार नाही. तुम्ही हा उपाय कोणत्याही दिवशी सोमवार पासून ते रविवार पर्यंत करू शकतात. फक्त तुम्हाला हा उपाय संध्याकाळी ७ वाजता नंतर जेव्हा तुम्ही देवपूजा करतात तेव्हा करायचा आहे.
तुम्हाला देवघरात बसून एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे. रोज पूजा करण्याचा दिवा सोबतच तुम्हाला आणखी एक दिवा लावायचा आहे आणि तो दिवा देवघराच्या समोर ठेवायचा आहे. दिवा लावल्यावर तुम्ही तेलाचा दिवा लावला असल्यास तेलात आणि तुपाचा दिवा लावला असल्यास तुपात तुंम्हाला तो लवंग टाकायचा आहे.
लवंग टाकताना तुमच्यावर ज्या काही अडचणी आणि समस्या आलेल्या आहेत त्या मनात देवाकडे पार्थना करायची की, देवा यातून मला मार्ग दाखव आणि असे म्हणून तुपात किंवा तेलात तो लवंग तुम्हाला टाकायचा आहे. तो दिवा जोपर्यंत जळणार तोपर्यंत त्याला जळू द्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ झाल्यावर तो दिवा त्यामध्ये जी जळलेली वात आणि लवंग असेल तो तुम्हाला एका कागदात बांधायचा आहे आणि तो कागद तुम्ही वाहत्या पाण्यात किंवा घराच्या बाहेर कोणत्याही झाडाखाली ठेऊन द्यायचा आहे. अशा रितीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.
मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.