कैलास पवार चिखळीतील वीर जवान यांना सियाचिनमध्ये वीरमरण.

Daily News

नमस्कार मित्रांनो.

सीमेवर देशाच रक्षण करणाऱ्या चिखलीतील कैलास पवार या जवानाला वीरमरण आले आहे. सियाचीनहून आपल्या गावाकडे परतत असताना शहीद झाले. फक्त ५० डिग्री तापमान असणाऱ्या खडतर ठिकाणी ते कर्तव्य बजावत होते. महार बटालियनमध्ये ऑगस्ट २०२० पासुन ते कार्यरत होते. १ ऑगस्टला त्यांची एका वर्षाची सेवा संपली होती.

सियाचीनच्या बर्फाळ डोंगरावरून खाली उतरत असताना पाय घसरला आणि खाली कोसळले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी लडाखमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृ-त्यू झाला.

कैलास शहीद झाल्याची बामी ऐकताच पवार कुंटुबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अत्यंत खडतर कर्तव्य बजावल्यानंतर ६ महिन्यांच्या सुट्टीसाठी ते चिखलीला येणार होते. मात्र डोंगर उतरताना झालेल्या दर्घटनेत त्यांना वीरमरण आल. वरून खाली येताना पायीच प्रवास करावा लागतो. तेथुन खाली उतरण्यासाठी चार दिवस लागतात.

यावेळी पाठीवर सामनाचे ओझे घेऊन उतराव लागत.पाय घसरून पडल्यानंतर इतर जवानांनी त्यांना रुग्णालयात दाखल केल. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

समस्त पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. दिवंगत जवान कैलास पवार यांच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ आणि धाकटी बहीण असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता लष्करी पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *