नमस्कार मित्रांनो.
भारतीय ज्योतिष शास्त्रात अमावस्येला खूप महत्व प्राप्त आहे. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अंतिम स्थितीला अमावस्या असे म्हणतात. यावेळी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या दिनांक नऊ जुलै २०२१ रोजी येत आहे. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावास्येला अहोरात्र अमावस्या असे म्हणतात. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दानधर्म करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. अमावस्याच्या दिवशी पितरांचे पिंड व कालसर्प दोष निवारण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
ज्या दिवशी पितरांच्या नावे दानधर्म करणे अतिशय उपयुक्त मानले असून पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो. आणि जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते. ज्योतिष शास्त्रमध्ये अमावस्या ला विशेष महत्व प्राप्त असून मान्यता आहे की, या दिवशी केलेले उपाय विशेष लाभदायक ठरतात. दिनांक ९ जुलै रोजी येणाऱ्या या अमावास्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव या पुढील सहा राशींवर पडणार असून अमावस्या पासून यांचा भाग्योदय घडण्यास सुरुवात होणार आहे.
अमावस्या पासून सुखाच्या व मंगलमय काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. भाग्य अचानक कलाटणी येणार आहे. आपल्या जीवनात सुरू असलेला अपयशाचा काळ आता संपणार असून यश प्राप्ती च्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे. आता कार्यक्षेत्रात यशस्वी ठरणारा हात आपल्या यश प्राप्ति च्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. घर परिवारामध्ये सुख समृद्धी आणि यशामध्ये वाढ होणार असून जीवन आनंदाने फुलून येणार आहे.
आपल्या जीवनातील संघर्षाचा काळ आता समाप्त होणार आहे. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि नशिबाची साथ प्राप्त होणार असल्यामुळे प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. दिनांक आठ जुलै रोजी उत्तर रात्री ५:१७ मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून १० जुलै अमावस्या संपणार आहे. अमावस्या पासून पुढे येणारा काळ या सहा राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे.
कुंभ- आरोग्य चांगले राहील. नात्यातील लोकांसोबत नातेसंबंध सुधारतील. नातेसंबंधांमध्ये गोडी वाढेल. कामाच्या संदर्भात दूरचे प्रवास होतील. आपल्याला कामात मित्रांचे सहकार्य मिळेल. व्यवसाय -उद्योगात प्रगती होईल. नोकरदारवर्ग व छोटे व्यावसायिक यांचा दिवस मध्यम राहील. विद्यार्थ्यांसाठी मेहनत व परिश्रम केल्यास चांगले यश प्राप्तीचे योग आहेत. बाकी सर्व सामान्य राहील.
सिंह- आजचा आपला दिवस आनंदी आणि उत्साहाने भरलेला असणार आहे. आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आज चांगली राहणार आहे. अति घाई मध्ये विचार करून कोणताही निर्णय घेऊ नका. कोणत्याही नवीन कामाची सुरवात करताना ज्येष्ठ व्यक्तिंचा सल्ला घेणे लाभदायक ठरेल.
तुळ- संपूर्ण विचार केल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नका. अहंकाराची भावना मनामध्ये ठेवू नका. कनिष्ठांकडून गोड बोलून कामे करुन घ्या, वरिष्ठांकडून आपल्या कामाचे कौतुक होईल. इतरांच्या भाव-भावनांचे विचार करुन बघितल्यास आपल्याला अनेक समस्यांवर सहज मार्ग सापडेल!