नमस्कार मित्रांनो.
फक्त ५ सोमवारचे तुमचे हे व्रत तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण करू शकतात. तुम्हाला वर्षभरामध्ये कोणत्याही महिन्याचे ५ सोमवार निवडायचे आहेत. म्हणजेच वर्षभराचा कोणत्याही महिन्याचा ५ सोमवार तुम्हाला हे व्रत करायचे आहे. पूर्ण श्रद्धेने निष्ठेने मनो भावाने भक्ती भावाने आणि महादेवाचा कृपेसाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हे व्रत करायचे आहे.
शिव महापुराणामध्ये याविषयी सांगितले गेले आहे साधकाने कोण कोणत्या नियमांचे पालन करावे कोणत्या वस्तूचे दान करावे. अगदी स्पष्टपणे महापुराणा मध्ये सांगितले गेले आहे. तर आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेऊया की ५ सोमवारचे हे व्रत कसे करावे. हे व्रत करण्याची विधी अशी आहे की, व्रत करतांना सलग ५ सोमवार किंवा मध्ये काही प्रॉब्लेम आला.
तुम्ही ते व्रत त्या सोमवारी करू शकत नसाल. तर तुम्ही पुढे येणारा जो सोमवार असेल तर तुम्ही तो धरू शकता फक्त एक सोमवार तुमच्या वाढेल, एवढाच प्रॉब्लेम असेल. तर एखादा सोमवार तुमचा चुकला तरी काही हरकत नाही. फक्त पुढचा सोमवार तुम्ही तो करावा आणि ज्या सोमवारी तुम्ही हे व्रत करू शकत नसाल. त्या सोमवारी फक्त उपवास केला तरी चालतो.
फक्त तो सोमवार तुम्ही मोजायचा नाही. सकाळी लवकर उठावे,ज्यांना शक्य असेल त्यांनी ब्रह्म मुहूर्तावर उठावे. स्वच्छ स्नान करावे, सूर्यदेवाला जल अर्पण करावे म्हणजे हातात तांब्या घेऊन त्यामध्ये दोन्ही हात उंच करून सूर्याकडे पाहून जल अर्पण करावे आणि जल अर्पण करताना ओम सूर्याय नमः ओम सूर्याय नमः असे ११ वेळेस बोलावे.
तुम्हाला जमले तर सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जावे. मंदिरात जाऊन शिवलिंगाची विधिवत पूजा करावी. शिवलिंगास ज्या वस्तू आपण घेऊन जाऊ. आपल्या इच्छेनुसार समजा पाणी, दूध किंवा फुल घेऊन गेलो तर त्या तुम्ही त्या शिवलिंगावर अर्पण करावे. पूजेमध्ये बेलपत्र अत्यावश्यक मानले जाते. बेलपत्र अवश्य असावी बेलपत्र तुम्ही शिवलिंगावर वाहू शकतात.
जर महादेवाच्या मंदिरात जाणे शक्य नसेल. तर घरीच आहे आपल्या देवघरात शिवलिंग असते. त्याची तुम्ही देव घरातच पूजा करू शकतात आणि फुल असतील किंवा बेलपत्र असेल तर शिवलिंगावर तुम्ही ठेवत असाल. तर त्यासोबतच १०८ वेळेस तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा १०८ वेळेस तुम्ही जप करावा. सोमवारच्या दिवशी तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे.
सूर्य मावळल्यानंतर संध्याकाळी तुम्ही उपास सोडू शकतात. म्हणजे देवाला नैवेद्य दाखवावा आणि आपण जेवण करू शकतो. दिवसभर मात्र मिठाचे कोणतेही पदार्थ खाऊ नये. फळ खाऊ शकतात, पाणी पिऊ शकतात, चहा पिऊ शकतात. पण मीठ असलेले काहीच खाऊ नये. तुम्ही हे सोमवारचे व्रत कम्प्लीट ५ सोमवार तुम्हाला करायचा आहे तुमची इच्छा यांनी लगेच पूर्ण होईल.
५ व्या सोमवारी म्हणजेच शेवटच्या सोमवारी तुम्ही उद्यापण घरच्या घरी करू शकतात. जसे की, कोणत्याही गरिबाला तुम्ही दान करू शकतात. दानामध्ये जेवण देऊ शकतात किंवा ५ मुलींना घरी बोलावून जेवण करू शकतात. लहान मुलांना जेवण देऊ शकतात किंवा गरीब आहे त्यांना फळ देऊ शकतात. मंदिराकडे गरीब लोक असतात त्यांना तुम्ही फळ देऊ शकतात किंवा
प्राण्यांना जेवण देऊ शकतात. अस काही तरी दान पाचव्या सोमवारी तुम्ही करावे आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, पहिला सोमवार जेव्हा तुमचा असेल. तेव्हा तुम्ही देवघरात एक नारळ आणून ठेवायचे. न सोलताच नारळ न सोडता असेच देवघरात आणून ठेवायचे आणि पाची सोमवार नारळाची पूजा करावी.
शेवटच्या सोमवारी तो नारळ फोडून त्याचा प्रसाद सर्व घरच्यांनी लोकांनी खावा. तर हेच सोपे ५ सोमवारचे व्रत इच्छा पूर्ण करणारे व्रत तुम्ही नक्की करा.
मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.
मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.