घरातील ही वस्तू वापरा फक्त पाच मिनिटात धान्यातील किडे पळून जातील. पुन्हा धान्यात किडे कधीच होणार नाहीत.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

घरामध्ये सतत जाणवणारी समस्या म्हणजे तुमच्या घरा मध्ये कोणतेही धान्य असेल गहू, तांदूळ, कडधान्य, डाळी, मटकी, मूग या मध्ये किडे होणे ही नेहमीचीच समस्या आहे. धान्य काही महिने पुरेल म्हणून आपण भरून ठेवत असतो.

ज्यामध्ये डाळी, तांदूळ, गहू असेल परंतु या धान्याला किडे पार पोखरून टाकतात. याच्यामध्ये सोंड, सूळ होण या नेहमीच्या समस्या असतात आणि हे धान्य खराब झाल की मग आपल्याला वापरता येत नाही.

विशेषता कडधान्य म्हणजे मूग मटकी हे जर खराब झाल तर ते आपल्याला परत वापरता येत नाही. कारण हे किडे त्यामध्ये शिरून बसतात आणि ते काही केल्याने बाहेर निघत नाही.

किडे होऊ नये म्हणून विविध प्रकारचे औषध वापरत असतो, गोळ्या वापरत असतो. तसेच इंजेक्शन ही वापरत असतो. परंतु यामुळे त्या धान्याला वास लागतो. ते धान्य खावस वाटत नाही. शिवाय त्या केमिकल चा आपल्या शरीरावर परिणाम देखील होऊ शकतो.

म्हणून आजच्या लेखामध्ये अत्यंत साधा घरगुती उपाय आपण बघणार आहोत. ज्यामुळे तुमच्या धान्यांमध्ये म्हणजे गहू, तांदूळ, मटकी, मूग कोणताही धान्य असो त्यामध्ये की अजिबात होणार नाही आणि जर तुमच्या धान्यांमध्ये किडे झालेले असेल अगोदर तरी तुम्ही हा उपाय केला तर ते किडे तुमच्या धान्या मधून पूर्ण निघून जातील.

तुमच्या घरा मध्ये धान्य कुठलाही असेल तर ते धान्य जास्त दिवस टिकवायचे असेल. तसेच त्यामध्ये कीड होऊ नये. किंवा किड झालेली असेल तर एक साधा उपाय करायचा आहे.

सर्वांच्या घरामध्ये पेपर असतो, न्यूज पेपर सर्वांच्या घरी येतो. तर कुठलही धान्य भरत असताना त्यामध्ये लहान लहान तुकडे करायचे न्यूज पेपरचे आणि ते धान्य भरत असताना त्यामध्ये हे पेपरचे तुकडे टाकायचे. या पेपरच्या वासामुळे त्यामध्ये कुठलाही किडा, सोंड हे अजिबात होत नाही.

त्याचबरोबर याचा अजून एक फायदा आहे. ते पेपर जेव्हा आपल्याला धान्य लागणार आहे. त्यामधून सहज बाजूला करता येतात. आणि सर्वात महत्वाचे याचा कुठलाही शरीरावर वाईट परिणाम होत नाही. तसेच या पेपरचा वास सुद्धा धान्याला लागत नाही. हा अत्यंत साधा उपाय आहे.

जर तुमच्या घरामध्ये ऑलरेडी धान्याला किडे झालेले असतील. सोंड झालेली असतील, सुळ झालेले असतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय कसा करू शकता. एक मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही ते धान्य घ्यायचे आहे.

त्यामध्ये पेपरचे लहान लहान तुम्हाला जेवढे लहान तुकडे करता येतील तेवढे लहान तुकडे कात्रीने, हाताने करायचे आहेत न्यूज पेपरचे. यासाठी न्यूज पेपरच वापराचा आहेत. आपल्याला दुसरा पेपर वापरायचा नाही. न्यूज पेपरची जी शाही असते. त्या शाहीमुळे किडे, सुळ, सोंडे आहेत त्या निघून जातात. म्हणून आपल्याला न्यूज पेपरच वापरायचा आहेत.

एक मोठ पातेल किंवा मोठ भांड घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे धान्य टाकून त्यामध्ये लहान लहान पेपरचे तुकडे करून टाकायचे आहेत आणि ते धान्य तसेच उघडे करून ठेवायचे आहेत. यामुळे तुमच्या धान्यातील किडे निघून जातील. ते धान्य मध्ये अजिबात थांबणार नाही या पेपरच्या वासामुळे.

मित्रांनो हे उपाय आवडले असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहि ती ही सर्वसा मान्य माहि तीवर आधा रित आहे. मराठी तडका या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *