नमस्कार मित्रांनो.
संकष्टी चतुर्थी व्रत श्री गणेश यांना समर्पित व्रत आहे. श्री गणेश भक्त मोठ्या श्रद्धेने व भक्तीने हे व्रत करतात. हे व्रत केल्याने मानले जाते की, श्री गणेश कृपा प्राप्त होऊन सर्व संकट, बाधा, दुःख श्रीगणेश कृपेने दूर होतात.
यामुळे या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठल्यापासून श्री गणेश भक्ती मंत्र जप सेवा करावी. त्यामुळे या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठल्यावर या एका श्री गणेश यांच्या मंत्र जपाने दिवसाची सुरुवात करायची आहे व दिवसभर श्री गणेश भक्ती मध्ये दंग रहावे.
चला जाणून घेऊ या हा मंत्र कोणता आहे तसेच त्याचे नियम देखील आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठावे कारण यावेळी वातावरणामध्ये सकारात्मक शक्ती जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असतात.
त्याचा आपल्याला विशेष लाभ होतो. त्यानंतर आपण नेहमी सारखे फ्रेश व्हावे. या दिवशी आंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल व काळे तीळ टाकून स्नान करावे. ते अति शुभ मानले गेलेले आहेत.
त्यानंतर पूजा स्त्री आसन टाकून बसावे. धुप, दिप, अगरबत्ती लावावी. त्यानंतर ओम नामाचा ५ वेळेस उच्चारण करायचा आहे. शांत व एकाग्र होऊन डोळे बंद करून श्री गणेश मूर्ती मनामध्ये आठवुन श्री गणेश गायत्री मंत्र आपण म्हणायचा आहे.
आपण हा मंत्र कमीत कमी ११ वेळेस किंवा जास्तीत जास्त १०८ वेळेस आपण हा मंत्र म्हणायचा आहे. हा गणेश गायत्री मंत्र आपण आपली श्रद्धा व भक्तीने म्हणायचा आहे.
त्यानंतर सुर्योदय झाल्यावर सूर्यनारायणाला एका तांब्याच्या लोट्यामध्ये जल घेऊन ते अर्पण करायचे आहे. अशा प्रकारे सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवात श्री गणेशाय नामाने केल्यास संपूर्ण दिवस हा शुभ मंगलमय होऊन सर्व विघ्ने दूर होतात, तसेच सुखसमृद्धीची प्राप्ती होते.
जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.
मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.
मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.