Love You All म्हणणाऱ्या या मॅडम सोबत नंतर वर्गात काय घडले ते अवश्य पहा.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

मिसेस पाटील आपल्या वर्गात शिरल्या इंग्रजी माध्यमाची शाळा होती. पाटील बाईंना वर्गात बोलणी सुरू करताना
लव यू ऑल अस म्हणायची सवय होते. तसे त्या म्हणाल्याही पण त्यांना जाणवल की खर तर आपण हे मनापासून म्हणत नाही आहोत.

त्याला कारण शेवटच्या बाकावर बसणारा एक मुलगा होता. तो मुलगा अगदी अव्यवस्थित गबाळ असा होता आणि पाटील बाईंना त्याच्याबद्दल प्रेम किंवा आत्मीयता वाटेल किंवा त्याची दखल घ्यावी अस काही नव्हत.

त्या मुलाशी जरा अलिप्तपणाने वागायच्या. कोणत्याही नकारात्मक गोष्टींसाठी बरेचदा त्याचच उदाहरण द्यायच्या आणि कोणत्याही सकारात्मक गोष्टी च्या बाबतीत त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायच्या. पहिले तीमाही झाली प्रगती पुस्तक लिहायचे दिवस आले.

काही मुलांची प्रगती त्यांनी लिहिली. शाळेची अशी पद्धत असते की प्रगती पुस्तकावर शेवटी मुख्याध्यापिकेची सही होते. त्याप्रमाणे प्रगती पुस्तके सहीसाठी गेली. मुख्या ध्यापिकेने पाटील बाईना बोलावून घेतले आणि त्या म्हणाल्या प्रगती पुस्तकात प्रगती लिहायची असते. पालकांना कळायला हवे की त्यांच्या मुला-मुलींना काही भवितव्य आहे.

या शैलेश बद्दल तुम्ही काहीच लिहिले नाही अस कस चालेल. त्याच्या पालकांना काय वाटेल, त्याला ते मारतील सुद्धा एखाद्या वेळेस. पाटील बाई म्हणाल्या मी त्या मुलाच करू तरी काय? आहो सकारात्मक काहीच नसेल काही प्रगती नसेल तर मी तरी काय लिहू. ठीक आहे तुम्ही वर्गावर जा मुख्याध्यापिका म्हणाल्या.

मुख्याध्यापिकेने लगेच शाळेची कागदपत्रे सांभाळणाऱ्या व्यक्तीला बोलावून घेतले आणि शैलेश ची जुनी प्रगती पुस्तके काढून आणायला सांगितले आणि शैलीश ची जुनी प्रगती पुस्तके पाटील बाईंकडे पाठवून दिली. पाटील बाईंनी प्रगती पुस्तक चाळायला सुरुवात केली.

तिसरीच्या प्रगती पुस्तकावर शेर होता शैलेश हा वर्गातील सगळ्यात हुशार विद्यार्थी आहेत. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला त्यांनी चौथीचे प्रगती पुस्तक पाहिले त्यात असलेले दर तिमाहीची शेरे असे सुचवत होते की, त्याच्या प्रगतीचा आलेख हळूहळू खाली येत आहे.

त्याच्या आईला कॅ न्सरने ग्रासले होते आणि रोग आता शेवटच्या स्थितीत पोचला होता. त्याची आई त्याच्या कडे आता पूर्वीसारखे लक्ष देऊ शकत नव्हती आणि ते हळूहळू त्या शेऱ्यांमधून दोन्हीत होत होते.

६ वीत शेरा होता. शैलेशने त्याची आई गमावली आहे आणि तो स्वतः हरवल्यागत झाला आहे. आता त्याच्याकडे अधिक लक्ष देण्याची नितांत गरज आहे. नाहीतर आपण त्याला गमावू, आत्तापर्यंत पाटील बाईंच्या डोळ्यात अश्रू दाटले होते.

त्या तशाच मुख्याध्यापिका कक्षात गेल्या म्हणाल्या मला कळले काय करायला पाहिजे ते पुन्हा सोमवारी त्या वर्गावर गेल्या आणि वर्गावर नजर फिरून नेहमीप्रमाणे म्हणाल्या लव यू ऑल. पुन्हा त्यांना जाणवल की, आपण खर बोलत नाही आहोत. कारण त्यांना सर्व मुलांबद्दल वाटणाऱ्या प्रेमापेक्षा कित्येक पटीने जास्त माया आता शैलेश विषयी वाटत होती.

त्यांनी मनाशी काही ठरवल होत. आता शैलेशला हाक मारताना त्यांचा स्वर बदलला होता. त्या शैलीशी सकारात्मक वागत होत्या दिवस जात होते. शाळेचा शेवटचा दिवस उगवला सगळ्या मुलांनी टीचर साठी छान छान गिफ्ट्स आणलले होते.

एकच गिफ्ट एका जुन्या वर्तमानपत्रात आलेले होते. शिक्षकांच्या अंतःप्रेरणेने त्यांनी ओळखले हे कोणाचे गिफ्ट आहे ते. एक अर्धी वापरलेली परफुमची बाटली आणि दोन खड्याच्या बांगड्या एका बांगडीतले दोन खडे आधीच निखळले होते. सगळे मुले हसली त्यांनी ती गिफ्ट शैलेशची आहे हे ओळखल.

काही न बोलता पाटील बहिणी तो परफ्यूम आपल्या साडीवर उडवला त्या दोन बांगड्या आपल्या हातात घातल्या. आता शैलेशचा चेहरा खुलला हलकेच हसून तो म्हणाला आता माझ्या आईसारख्या सुगंध तुमच्या साडीला येतोय. ती मला सोडून गेली त्याआधी तिने वापरलेला हा शेवटचा होता आणि शेवटी तिच्या हातात ह्याच बांगड्या होत्या.

एका वर्षानंतर म्हणजे शाळा संपली तेव्हा पाटील बाईंच्या टेबलावर एक पत्र होते. मला जेवढे शिक्षक, शिक्षिका लाभल्या त्यातल्या तुम्ही सर्वात छान आहात, शैलेश. त्यानंतर बरीच वर्षे शैलेश कडून याच आशयाचे पत्र त्यांना दरवर्षी मिळत असे.

वर्ष निघून गेली त्यांचा संपर्क राहिला नाही. दरम्यान त्या निवृत्त झाल्या. अचानक त्यांना एक कुरिअरवाला शोधत आला त्याने एक पत्र त्यांना दिले. त्यावर प्रेक्षक म्हणून नाव होत डॉक्टर शैलेश पीएचडी. यादरम्यान शैले मोठा झाला होता आणि खूप प्रगती केली होती डॉक्टरेट मिळवली होती.

पत्रात तिच ओळ पुन्हा होती फक्त थोड्या फरकाने. मला जगात खूप माणसे भेटली पण तुम्ही सर्वात छान आहात मी लग्न करतोय आणि तुमच्या उपस्थिती शिवाय लग्न करण्याचा विचार स्वप्नातही करू शकत नाही. सोबत विमानाची दोन तिकिटे होती जायचे आणि यायचे.

पाटील बाईकडे आता तो परफ्युम नव्हता पण त्या बांगड्या मात्र अजूनही त्यांच्याच हातात होत्या. पाटील बाईंना राहवले नाही त्या लग्नाला गेल्या तिथे अपरिचित जास्त होते त्यामुळे त्या मागच्या रांगेत बसून चाललेला सोहळा पाहत होत्या. मात्र कुणी तरी त्यांना शोधत होते त्यांनी त्यांना ओळखले आणि पहिल्या रांगेकडे घेऊन गेले.

तिथे एका खुर्चीवर चिट्ठी लावलेली होती “आई” त्यांना पाहताच सोहळा थांबवू शैलेश त्यांच्यापाशी आला. त्याने त्यांना सन्मानाने खुर्चीवर बसवले पाया पडला आणि म्हणाला तुम्ही माझ्या आई पेक्षा कमी नाही. आज मी जो काही आहे
तो केवळ तुमच्यामुळेच.

लग्न पार पडले जोड्याने पुन्हा पाया पडायला आला. तेव्हा नवपरिणीत पत्नीला म्हणाला, या नसत्या तर आज जसा मी आहे तसा कधीच घडललो नसतो.

त्यावर पाटील बाई उतरल्या शैलेश जर माझ्या वर्गात नसता तर मला कधीही कळल नसत की शिक्षकाने आधी प्रत्येक मुलाची आई असण जास्त गरजेचे आहे मग शिक्षक. असल्या चांगल्या गोष्टी जमेल तेवढ्या लोकांपर्यंत पाठवा हा लेख जमेल तेवढ्या लोकांपर्यंत शेअर करा.

मित्रांनो हा लेख आवडला असेल तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *