नमस्कार मित्रांनो.
३० एप्रिलला शुक्रवारच्या दिवशी सगळ्यात मोठी संकष्टी चतुर्थी आहे. हा एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस ३० एप्रिलचा. संकष्टी चतुर्थी गणपती चा विशेष दिवस या दिवशी उपवास केला जातो. गणपतीला विशेष मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो.
काही उपाय काही सेवा केली जाते, जेणेकरून तो दुखहर्ता गणेश आपले व आपल्या समस्या संकट दूर करू शकेल. संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी चतुर्थी असते. या दिवशी ३० एप्रिलच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस जेव्हाही आपण आपल्या घरात देवपूजा करतो.
त्यावेळेस गणपतीसमोर तुम्हाला एक चमत्कारी मंत्र बोलायचा आहे. हा मंत्र तुमचे सगळे विघ्न दूर करेल, तुमचे सगळे संकट, समस्या दूर करेल आणि तुमच्या सर्व इच्छा श्रीगणेश पूर्ण करतील.
संकष्टी चतुर्थीच्या या खास दिवशी तुम्ही हा मंत्र फक्त संध्याकाळी देवपूजा करताना बोलायचा आहे. महिला, पुरुष घरातल्या कोणत्याही व्यक्तीने बोलला तरी याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला होतो आणि हा मंत्र बोलताना सगळ्यात आधी देवघरात दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि मग हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे.
हा मंत्र काही असा आहे. ओम सुमुखाय नमः ओम सुमुखाय नमः गणेशाचा खूप चमत्कारी मंत्र आहे त्याचा जप तुम्हाला फक्त १०८ वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ या मंत्राचा जप करायचा आहे. जर तुमच्या घरात माळ नसेल तर तुम्ही पाच किंवा दहा मिनिट या मंत्राचा जप करायचा आहे.
३० एप्रिल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती समोर बसून गणपतीला वंदन करून, प्रार्थना करून चमत्कारी मंत्र तुम्हाला १०८ वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ बोलायचा आहे. जमलेच तर या दिवशी मोदकांचा नैवेद्य सुद्धा गणपतीला दाखवा.
कारण गणपती मोदकांनी अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. आपल्याला जे हव ते देतात आपले विघ्न दूर करतात.
मित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पो-स्ट मागचा उद्देश नाही. फ-क्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हे-तू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज क-रून घे-ऊ नये.