घरात हे झाड लावणे शुभ की अशुभ, फायदे, याची पाने कधी तोडावी कधी तोडू नये.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धार्मिक विधींमध्ये बेलपत्र अर्पण करण्याचे अधिक महत्त्व आहे. शिवपुराणानुसार बेलपत्राचा उपयोग भगवान शंकराची पूजा करण्यासाठी केला जातो. बेल पत्राचा उपयोग इतर हिंदू देवतांसाठी केला जातो. त्याचप्रमाणे आयुर्वेदात बेल पत्राचे वर्णन आरोग्य आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. बेलपत्रांच्या पानांचे सेवन केल्याने आपण रोगमुक्त निरोगी जीवन जगू शकतो असेही सांगण्यात येत.

शिवाय कोणत्या वनस्पतीने आपल्याला कोणता लाभ मिळतो. या संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेलच मात्र घरात बेल पत्राचे झाड किंवा रोप लावावा असेही प्रश्न बरेच जणांना पडलेले असतात. मग ज्या व्यक्ती आपल्या घरात बेल पत्राचे झाड किंवा बेल पत्राचे रोप लावून इच्छिते तर हा लेख तुमच्यासाठीच आहे चला तर मग बिल पत्राचे झाड घरात लावावा का किंवा हे झाड घरात असल्यामुळे लाभ अथवा नुकसान होता का हे ही जाणून घेऊयात.

श्रावण महिन्यापासून भगवान शंकराच्या पूजेचा उत्सव सुरू होत आहे आणि शिवपूजेत बेलपत्राचे विशेष महत्त्व आहे. ज्या घरात बेलाचा रोप लावल जात. त्या घरात भगवान शंकराची असीम कृपा कायम राहते असे सांगण्यात येत. यासोबतच ज्या घरात बेलपत्रयाचे झाड लावले जाते त्या घरात देवी लक्ष्मीचा वास सदैव असतो असेही म्हणतात.

घरामध्ये ठराविक ठिकाणी बेलपत्राचा रोप लावल्याने आणि त्याला योग्य रीतीने स्थापित केल्याने सुद्धा अनेक समस्या सुटतात असेही सांगितले जाते. याबरोबरच शिवपुराणानुसार ज्या ठिकाणी बेलपत्राचे रोप लावल जात ते स्थान काशीतीर्थसारखे पवित्र पूजनीय स्थान मानले जाते. म्हणून तुम्हाला बेलपत्राची रोप किंवा झाड लावायचे असेल तर त्याची काय फायदे आहेत हेही जाणून घेऊयात.

१) सर्वात महत्त्वाचा जर आपल्या घरी बेलपत्र जर घरी असेल तर आपली आर्थिक परिस्थिती सुधारते. वास्तुशास्त्रानुसार घरातील गरिबी दूर करण्यासाठी घरामध्ये बेलाच्या पानाचे रोपटे लावण्या सांगितल जात यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरात धन धान्याचा साठा वाढतो. शिवाय बेल पत्राची काही पान संपत्तीच्या ठिकाणी ठेवल्यामुळे घरात नेहमी लक्ष्मीचे आशीर्वाद राहतात असेही म्हणतात. यामुळेच आर्थिक समृद्धीसाठी उत्तर दक्षिण दिशेला बेलाचे झाड किंवा बेलाचे रोप लावावे.

२) शिवपुराणानुसार घरात बेलपत्राचे रोप ठेवल्याने व्यक्तींच्या वाईट कर्माचा प्रभाव नष्ट होतो आणि घरात राहणाऱ्या सर्व सदस्यांना अक्षय पुण्य प्राप्त होतो असेही म्हणतात. असे मानले जाते की बेल पत्राच्या झाडाच्या मुळामध्ये गिरजा माता आणि देठात देवी माहेश्वरी फांद्यांमध्ये, आई-दक्षायनी, पानात देवी पार्वती, फुलांमध्ये देवी गौरी आणि फळांमध्ये देविका कात्यायनी वास करते.

३) शास्त्रानुसार घरात लावलेल्या बेलपत्राचे झाड हे उत्तर किंवा पश्चिम दिशेला असेल तर यामुळे सकारात्मक ऊर्जा प्रसारित आणि घरात राहणारे सदस्य अधिक तेजस्वी आणि ऊर्जावान बनतात.

४) शिवाय घराच्या अंगणात हे झाड असल्यास झाडामुळे घरात वाईट शक्ती प्रवेश करत नाही असेही म्हणतात.

५) बेलपत्राच्या झाडामुळे कामात येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्तता होते आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचे रक्षणही होत. ६) घरामध्ये बेलाचा रोप लावल्याने तुम्हाला तर चंद्रदोष आणि इतर प्रकारच्या दोषांचा अशुभ प्रभाव कधी सहन करावा लागत नाही असही शास्त्र सांगत.

७) मात्र अष्टमी, अमावस्या,चतुर्थी आणि चतुर्दशीला बेलपत्र कधीही तोडू नये. याशिवाय संक्रातीच्या दिवशी सोमवारी या दिवशी बेलपत्र कधीही तोडू नये. पूजेसाठी बेल पत्राचा उपयोग जर तुम्ही करत असाल तर एक दिवस आधीच बेलपत्र तोडून ठेवावी. यामुळे कसलेही दोष लागत नाहीत असे सांगण्यात येत. तर अशाप्रकारे घरात बेलपत्र याचे झाड लावलेल अत्यंत फलदायी ठरत. तुम्ही तुमच्या घरात बेलपत्र झाड किंवा छोटस रोप नक्कीच लावा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *