या ३ कारणांमुळे अडचणीत सापडतात स्त्रिया, बघा तुम्ही तर नाही ना करत ही चूक.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो स्त्रियांना त्यागाची मूर्ती समजले जात. स्त्रियांमध्ये काही गुण असतात तसे अवगूनही असतात. त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर होतो. स्त्री ही घराचा पाया असते. तिच्यावर संपूर्ण कुटुंबाचा भार असतो. घर सांभाळण्यापासून मुलांना चांगले वळण लावण्यापर्यंत महिलेची भूमिका महत्वपूर्ण असते. पण आचार्य चाणक्य सांगतात की स्त्रिया त्यांच्या काही सवयींमुळे नेहमी त्रस्त असतात.

या सवयी प्रमाणाबाहेर वाढल्या त्यामुळे ती फक्त तीच नाही तर संपूर्ण कुटुंब त्याचे दुष्परिणाम भोगते. चाणक्यांच्या नुसार महिलांनी या तीन सवयी जाणून घेतल पाहिजे आणि त्या सवयी दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणत्याही त्या सवयी चला जाणून घेऊयात.

१) मित्रांनो सर्वात पहिली सवय म्हणजे स्त्रिया ज्याकडे दुर्लक्ष करतात ते म्हणजे त्यांच्या आजार त्यांचे दुखणे स्त्रियांनी त्यांच्या आजाराकडे दुर्लक्ष चुकूनही करता कामा नये. महिला वर्ग घरात सर्वांची तब्येतीची काळजी घेत असते. सर्वांची तब्येत चांगली व्हावी म्हणून झटत असतो. स्वतःच्या तब्येतीकडे मात्र महिलावर्ग लक्ष देत नाही. तिची तब्येत बिघडली असतानाही पतीला किंवा कुटुंबाला सांगत नाही.

तसेच अनेक प्रकारच्या तणावाचा सामना ती करत राहते. ज्याचा तिच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि बऱ्याच वेळा उपचार न घेतल्याने हा आजार मोठे रूप धारण करतात. ज्याचा त्रास तिलाही होतो आणि कुटुंबालाही म्हणूनच महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे.

कितीही कामाचा ताण असला तरी सुद्धा स्वतःची दुखणी दुर्लक्षित करता कामा नये. एक आदर्श पत्नी एक आदर्श आई एक आदर्श सून एक आदर्श बहिण एक आदर्श मुलगी होण्याच्या नादात ती स्वतःकडे दुर्लक्ष करत राहते.

२) आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे तो म्हणजे निर्णय. सुखी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीने प्रत्येक निर्णय यात एकमेकांचा विचार घेऊन निर्णय घेतला पाहिजे. चाणक्य सांगतात काही वेळेस पती-पत्नी यांचा एक मत न झाल्याने वाद होतो आणि मग वाद फार वाढू नये म्हणून पत्नी पतीच्या निर्णयाशी सहमत होते.

पण अनेकदा तिचा तिला पश्चाताप होतो. म्हणूनच महिलांनी मोकळेपणाने बोलावे. घरात कोणत्या गोष्टीबद्दल काय वाटत. स्वतःचं मत ठामपणे मांडावे आणि महत्त्वाच्या निर्णयामध्ये सहभाग द्यावा. जेणेकरून कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप त्यांना नंतर होणार नाही.

३) तिसरी गोष्ट म्हणजे खोटे बोलणे. ज्या स्त्रियांना खोटे बोलण्याची सवय असते. त्या स्वतःच्या खोट्याच्या जाळ्यात स्वतःच अडकतात. खोटे बोलण्याची सवय कोणालाही असू शकते. तो सतत खोट बोलण्यामुळे घरात अशांततेचा वातावरण निर्माण होऊ शकत.

खोटे बोलल्यामुळे क्षणभर आनंद मिळतो पण सत्य बाहेर आल्यानंतर आपल्या कुटुंबाला त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून महिलांनी खोटे बोलण्याच्या सवयीपासून दूर राहावे. खर तर महिलांनीच नाही तर घरातील प्रत्येक सदस्यांनी खोटे बोलण्याच्या सवयीपासून लांब राहिला हव तरच कुटुंबामध्ये विश्वास आणि प्रेमाची भावना निर्माण होते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *