४३ दिवस करा हा एक उपाय नोकरीची समस्या सुटणारच..!

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

खूप खूप प्रयत्न करूनही तुम्हाला नोकरी मिळत नाही का? मनासारखा पगार मिळत नाहीये का? किंवा नोकरीमध्ये राजकारणाचा त्रास होत आहे का? नोकरीत नको तेवढा मनस्ताप सहन करावा लागतोय का? नोकरी आणि नोकरीच्या समस्या या सर्वांवर प्रभावी एक रामबाण उपाय आहे. जो तुम्हाला ४३ दिवस करायचा आहे. बिना खर्चिक हा उपाय आहे आणि शंभर टक्के रिझल्ट देणार उपाय आहे. काय आहे तो उपाय झाला जाणून घेऊया.

मित्रांनो बरेचदा उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही. नोकरी मिळाली तर मनासारखा पगार मिळत नाही. नोकरीमध्ये पगार चांगला मिळाला तरी आपल्या कामाचा आपल्याला क्रेडिट दिले जात नाही वा नोकरी मधल्या राजकारणाचा त्रास आपल्याला होतो. इतकंच कशाला तर सगळ चांगल असेल तर वरिष्ठांचा त्रास होतो किवा सहकार यांच्या असहकाराचा त्रास होतो. नोकरी आणि नोकरीच्या समस्यांवर तुम्ही रामबाण उपाय तुम्ही करू शकता.

तो उपाय १००% रिझल्ट देतो अस ज्योतिष शास्त्रात सांगितले आहे. पण हा उपाय करताना तुम्हाला सलग ४३ दिवस हा उपाय करायचा. काय आहे तो उपाय लक्ष देऊन वाचा. नोकरीच्या संदर्भात जर काही अडचणी असतील. फक्त नोकरीच नाही तुमच्या व्यवसायात जर प्रगती होत नसेल नफा मिळत नसेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. थोडक्यात काय तर करिअर मध्ये येणाऱ्या अडचणींवर हा उपाय आहे.

उपाय असा आहे की, तुम्हाला यामध्ये सूर्याची उपासना करायची आहे. उपासना हा शब्द ऐकून तुम्ही घाबरून जाऊ नका. काय काय करायच आहे किती वेळ लागेल अस अजिबात काही नाही. सकाळची फक्त पाच मिनिटे तुम्हाला काय करायच आहे रोज सकाळी उठल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. सूर्याला अर्घ्य द्यायचं म्हणजे काय करायच सूर्याला जल अर्पण करायच हा उपाय तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल. या उपायाचे वैशिष्ट्य हे आहे. हा उपाय कसा करायचा कधी करायचा हे लक्षात घ्या.

सूर्य आपल्यासाठी मानसन्मान, प्रतिष्ठा,नोकरी,पगार या सर्वाचा कारक ग्रह आहे. सूर्य चांगला असेल सूर्याची कृपा असेल आपल्या सर्व करिअर संबंधीच्या अडचणी दूर होतात. कुंडली मध्ये सूर्यग्रह बलवान असणे आवश्यक आहे. जेव्हा आपल्याला करिअरमध्ये अडचण येतात तेव्हा सूर्य कमकुवत आहे हे समजून घ्या आणि सूर्याची उपासना सुरू करा आणि ती उपासना कशी करायची रोज सकाळी लवकर उठून स्नान करून एका तांब्याचा यश घ्यायचा.

त्यात तांब्याच्या कलश यामध्ये शुद्ध पाणी भरायच त्यामध्ये एक लाल फुल टाका सकाळ सकाळी लाल फुल मिळत नसेल तर लाल चंदन किंवा कुंकू सुद्धा टाकू शकता आणि सकाळी सकाळी सूर्याकडे तोंड करून उभे राहावा आणि सूर्याला हे पाणी अर्पण करा. सूर्याला हे पाणी अर्पण करताना “ओम सूर्याय नमः “या मंत्राचा जप करा व तुम्हाला गायत्री मंत्र येत असेल तुम्ही गायत्री मंत्र सुद्धा म्हणू शकता. मनोभावे सूर्याला नमस्कार करा.

हे करायला अगदी पाच मिनिटे लागणार आहेत. पण हे तुम्हाला केव्हा करायचा आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला सलग ४३ दिवस करायचा आहे आणि त्यामध्ये एक वेळ निश्चित करायचे आहे. जर तुम्ही सकाळी आठ वाजता हे करणार असाल तर तुम्ही रोज हे आठ वाजता सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. दुपारी बारा वाजेपर्यंतची वेळ कोणतीही ठरवू शकता. १२ नंतर मात्र चालणार नाही.

दुपारी बारापर्यंत तुम्हीb दहा ठरवा नऊ ठरवा अकरा ठरवा काही साथ ठरवणार असाल तर अतिउत्तम सूर्योदयाची वेळ अतिउत्तम आहे. पण तुम्हाला अगदी सकाळी जमत नसेल. एकच वेळ ठरवा आणि ते ४३ दिवस तुम्हाला त्याच वेळी सूर्याला जल द्यायचा आहे. महिला वर्ग असेल तर महिला वर्गांनी अडचणीचे पाच दिवस सोडून द्यायचे आहेत आणि महिला वर्ग सुद्धा हा उपाय करू शकतात.

सलग ४३ दिवस हा उपाय तुम्ही केलात सूर्यनारायणाच्या कृपेचा अनुभव तुम्हाला येईल. मनात कोणतीही शंका घेण्याआधी करून बघा. करिअरच्या समस्येने त्रासला आहात का? मग ही छोटीशी गोष्ट करून बघायला काहीच हरकत नाही. पण त्याबरोबरच प्रयत्न करायलाही विसरू नका. कारण की सूर्यनारायण सुद्धा तुम्हाला प्रयत्न केल्यानंतरच यश देणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *