लहान मुलांचे बोरन्हान का करायचे? यामागील शास्त्र जाणून घ्या..!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आपल्याकडे प्रत्येक सणाचे महत्त्व आहे. संक्रांतिबाबतही एक अख्यायिका सांगितले जाते. असे म्हणतात फार वर्षांपूर्वी एक राक्षस होता. तो लोकांना त्रास देईल त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि शंकरासला ठार केले. त्याच्यात जाचापासून लोकांची मुक्तता केली. त्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.

या कालावधीत उत्तर गोलार्धात राहणाऱ्या लोकांना अर्थात भारतवासीयांना अधिक प्रकाश आणि ऊर्जा मिळते. जानेवारीत होणारे हे संक्रमण जास्त महत्त्वाचे असते. या दोन कारणांमुळे या सणाला अधिक महत्त्व आहे. मकर संक्रात आली की लहान मुलांना बोरन्हान घातले जाते. पण काही जण हे रथसप्तमीपर्यंत करतात. वयोगट एक वर्षाच्या मुलांना पासून ते वयोगटात वर्षांच्या मुलांपर्यंत हे बोरन्हान केले जाते. हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो.

मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रातीला लहान मुलांना बोरन्हान घातल जात. संस्कार म्हणून लहान मुलांना बोरन्हान घातले जाते. या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना याबद्दलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे उदाहणात बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा लहान मुलांच्या डोक्यावरून टाकले जातात.

लहान मुले इतर वेळेतील फळे दिली तरी खात नाहीत. पण अशा खेळीच्या वातावरणातून त्यांना वेचायला दिली तर ती फळे खातात. त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांच्या शरीर सुदृढ बनते. असे शास्त्रीय कारण त्यामागे सांगितले जाते.
बोरन्हान करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात.

पाटावर बसून त्याचे औक्षण करतात व बोर,ऊस, हरभरे,भुईमुगाच्या शेंगा,मुरमुरे, बत्तासे,हलवा,तिळाच्या रेवड्या, बिस्किट, गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून ते टाकले जाते. त्याने बाळास आंघोळ घातली जाते. घरातील व जवळपासची मुले यावेळी उपस्थित असतात. खाऊ गोळा करून खातात.

त्यालाच बोलणार असे म्हणतात. बोरन्हान का करायची त्याच्या संदर्भात अशी अख्यायिका आहे की करीनामाचा एक राक्षस होता. त्याकाळी राक्षसांची वाईट विचार आणि वाईट दृष्टी मुलांवर पडू नये. त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णा वर केले होते. त्यानंतर ही प्रताप पडली आणि त्या दिवसापासून बोरन्हान केले जाते. लहान मुल कृष्णाचे स्वरूपच आहे. त्यांच्या करी अक्षरात राक्षसाचे वाईट विचार वाईट दृष्टी असे म्हणून लहान मुलांवर बोरन्हान केले जाते.

तसेच शास्त्राप्रमाणे बघितल तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना याबद्दल त्या ऋतूची बाधा होऊ नये. म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी. म्हणून त्यांना मजा म्हणून अशाप्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते. खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुल वेचून खातात. त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते.

असे शास्त्रीय कारण यामागे असावे. खाल्ली या चॉकलेट गोळ्या बिस्कीट देखील समावेश करण्यात येतात. केवळ करायची म्हणून ही प्रथा नाही. तर याला शास्त्रीय कारणही आहे. थंडीच्या या दिवसात हे पदार्थ खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. बदलत्या ऋतुमानाशी जुळवून घेत शारीरिक आरोग्य राखायच असा व्यापक विचारही त्या मागून दिसून येतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *