रोग पंचकामध्ये चैत्र नवरात्रीची घटस्थापना कशी होणार? गुढीपाडव्याला या मुहूर्तावर करा पूजा

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी २२ मार्चला गुढीपाडवा आहे आणि या गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे. मात्र ते आधीच पंचक लागणार आहे. १९ मार्च रोजी पंचक येत असून रविवारपासून सुरू होणाऱ्या पंचकाला रोग पंचक असे म्हणतात.२२ मार्च हा चैत्र नवरात्रि चा पहिला दिवस असून संपूर्ण दिवस पंचक आहे.

त्यामुळे अनेक भाविकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की रोग पंचकांमध्ये चैत्र नवरात्रीच्या कलशाची स्थापना कशी करायची. दुर्गेची पूजा कशी करायची याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो पंचकानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला नवरात्रीची सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी प्रथम कलशाची स्थापना केली जाते आणि नंतर देवी शैलपुत्र तिची पूजा केली जाते.

या दिवशी २२ मार्च प्रतिपदा रात्री ८ वाजून २० मिनिटांपर्यंत आहे. यामुळे २२ मार्चला शुभ मुहूर्तावर कलश स्थापना होणार आहे. यावर्षी चैत्र नवरात्रीच्या कलशाची स्थापना करण्याचा शुभ मुहूर्त फक्त सकाळीच आहे. सकाळी ०६:२३ मिनिटापासून ते ०७:३२ मिनिटांपर्यंत तुम्ही कलशाची स्थापना करू शकता. कारण हीच योग्य वेळ आहे.

कारण दुपारी अभिजीत मुहूर्त नाही. तसे कलश स्थापनेसाठी अभिजीत मुहूर्त चांगला मानला जातो. पण यावर्षी तुम्हाला कलश स्थापना फक्त सकाळीच करायचे आहे. पंचकांमध्ये कलशाची स्थापना होते की नाही हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. पंचकांमध्ये कलश स्थापना घटस्थापना करण्यास काहीही अडचण नाही.

पंचक लागलेले असताना फक्त दक्षिणेस प्रवास करणे टाळा. छत बनवणे,खाट बनवणे,पलंग बनवणे अशी कामे पंचक मध्ये करू नये. ही अशुभ मानली जातात. ज्या प्रकारे तुम्ही दरवर्षी शुभ मुहूर्तावर कलश स्थापना किंवा घटस्थापना करता यावेळी त्याच पद्धतीने तुम्ही घटस्थापना करावी. अशुभ काळात कलश स्थापना आणि पूजा करू नये.

राहू काळ हा अशुभ काळ मानला जातो. चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी राहू काळ हा दुपारी १२:२८ मिनिटांपासून ते रात्री ०१:५९ मिनिटांपर्यंत आहे. राहू काळात चुकूनही दुर्गेची पूजा करू नये किंवा घटस्थापनाही करू नये. हा खूप अशुभ काळ म्हटला जातो. कलशामध्ये धान्याची पेरणी कशी करावी.

पूजेच्या ठिकाणी कलशाची स्थापना करण्याबरोबरच त्यात काही धान्य पेरण्याची ही परंपरा आहे. नऊ दिवसात धान्याची वाढ होण्यावरून शुभ आणि अशुभ चिन्ह समजतात. जर रोपे नऊ दिवसात हिरवी आणि मोठी झाली तर ती सुख-समृद्धी देणारी मानली जाते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *