६ मार्च हुताशनी पोर्णिमा होळी ६ राशींचे भाग्य चमकणार पुढील १० वर्ष खूप जोरात असेल या राशींचे नशीब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्या तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच फाल्गुन महिन्यामध्ये येणारी हुताशनी पौर्णिमा ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते कारण या दिवशी या पौर्णिमा तिथीला होलिका दहन केले जाते. पौर्णिमेच्या दिवशी व्रत उपवास करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या दिवशी भगवान विष्णू बरोबरच माता लक्ष्मी सोबतच देवाची पूजा करणे देखील लाभकारी मानले जाते.

मान्यता आहे की, या पौर्णिमेला व्रत उपवास करून स्नान आणि दान केल्याने सुख सौभाग्याची प्राप्ती होते आणि सोबतच आरोग्याची देखील प्राप्ती होते. पोर्णिमा तिथे विशेष रूपाने भगवान शिवशंभोला समर्पित आहे. शंभू आणि भगवान विष्णूची पूजा आराधना केले जाते. हिंदू धर्मामध्ये होळीचा सण अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवशी होळी पेटवून आनंद साजरा केला जातो. होळीमध्ये वाईट विचार नकारात्मक विचार अनिष्ट जळून नष्ट व्हावी अशी कामना केली जाते.

त्यामुळे होळीचा सण हा देशभरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी सर्वजन वाद विवाद विसरून होळी पेटवतात. आणि लगेच दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी होत असते त्यामुळे हा सण विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. होळीच्या शुभप्रसंगी या दिवशी सर्व देवी देवतांची पूजा केल्याने साधकाला भरपूर लाभ मिळतो. जीवनात सुख समृद्धी नांदते.

यंदाची येणारी होळी या काही खास राशींसाठी अतिशय शुभ फलदायी आणि आनंद देऊन जाणारी होळी ठरणार आहे. या राशींच्या जीवनातील दुःख दारिद्र्य आता समाप्त होणार आहे. यांच्या जीवनातील नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे. शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात या राशींच्या वाट्याला येणार आहे.

मित्रांनो फाल्गुन शुक्लपक्ष मघा नक्षत्र दिनांक सहा मार्च रोजी दुपारी ४:१७ मिनिटानंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होणार असून फाल्गुन शुक्लपक्ष दिनांक सात मार्च रोजी सायंकाळी६:१० मिनिटानंतर पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या सहा राशींच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे.

आता इथून पुढे जीवनामध्ये लाभकारी परिवर्तन या राशींच्या जीवनामध्ये घडून येण्याचे संकेत आहेत. या भाग्यवान राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये आता आनंद आणि सुख समृद्धीची भरभराट येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या सहा भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास- मेष राशीवर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. होलिका दहना पासून आपल्या जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग भरणार आहेत. आता जीवनामध्ये चालू असणारा दारिद्र्य दुःखाचा काळ समाप्त होणार आहे. मानसिक तणाव आता दूर होईल. उद्योग व्यापार करिअर कार्यक्षेत्र अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. भाग्याची आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये साथ मिळणार आहे.

सकाळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय उत्तम आणि लाभकारी ठरणार आहे. आता इथून पुढे जीवनामध्ये अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार असून जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारा दारिद्र्याचा काळात समाप्त होणार आहे. आपले नातेसंबंध मधुर आणि मजबूत बनतील. आर्थिक प्राप्ती मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. धनलाभाचे योग या काळामध्ये जमून येतील.

२) वृषभ रास- वृषभ राशीसाठी होळी नंतर येणारा काळ सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. जीवनातील दारिद्र्याचा समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने काळा अतिशय उत्तम ठरणार आहे. आर्थिक प्राप्ती मोठ्या प्रमाणात वाढण्याची संकेत आहे. जनक-धन लाभाची योग सुद्धा बनत आहेत. विद्यार्थी वर्गासाठी काळ लाभकारी ठरणार आहे.

त्याबरोबरच प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा अनुकूल काळ येणार आहे. या काळामध्ये वादविवाद पासून दूर राहणे आवश्यक आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. धनलाभाचे योग देखील बनत आहेत. उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळेल. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणारा असून मनासारखा रोजगार या काळामध्ये प्राप्त होणार आहे.

३) कन्या रास- कन्या राशीच्या जीवनामध्ये आनंद आणि सुखाची बहार येणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय लाभकारी असणार आहे. आता इथून पुढे भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. आपल्या शब्दाला महत्त्व प्राप्त होईल. सामाजिक क्षेत्रामध्ये मानसन्मान यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. आर्थिक प्राप्ती दुप्पट गतीने मजबूत बनेल. या काळामध्ये स्वतःमध्ये असणाऱ्या कलागुणांचा आपण योग्य वापर करून यश खेचून आणण्यामध्ये सफल ठरणार आहात. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडवून येणार आहेत.

हाती घेतलेल्या कामांमध्ये आपल्याला उत्तम यश प्राप्त होणार आहे. नोकरी विषयक काळ सुखाचा जाणार आहे. भाग्याची भरपूर प्रमाणात साथ मिळणार असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला विजय होणार आहे. अनेक दिवसांचा संघर्ष आता फळाला येणार आहे. अध्यात्माच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. अध्यात्म्याची आवड आपल्याला निर्माण होईल. त्यामुळे मन आनंदी आणि समाधानी बनणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे.

४) तुळ रास- तूळ राशीचे जीवनावर हुताशनी पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. जीवनातील दारिद्र्य आता समाप्त होणार असून सुख-समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. कार्य क्षेत्रामध्ये उत्तम प्रगती घडून येईल. एक दिवसापासून आपण ज्या कामासाठी मेहनत घेत आहात ती यशस्वीरित्या पूर्ण होतील. आपल्या कल्पनेत असणारे योजना आता साकार बनतील. मानसिक तणावात दूर होईल.

आरोग्याच्या दृष्टीने देखील काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होण्याचे संकेत आहेत. बेरोजगारांना मनासारखा रोजगार प्राप्त होईल. घरातील वातावरण आनंदाने प्रसन्न राहणार आहे. सुख सौभाग्य आणि ऐश्वर्या मध्ये वाढ होणार आहे. भौतिक सुख साधनांची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. आता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आर्थिक क्षमता मजबूत बनेल.

५) वृश्चिक रास- हुताशनी पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. आता इथून पुढे सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. समाजामध्ये मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल आणि प्रगतीचा काळ ठरणार आहे. आपल्या योजना साकार बनतील. नशीब एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार आहे. पाणीच आपण या काळात अतिशय चांगला उपयोग करणारा आहात.

स्वतःमध्ये असलेल्या क्षमतेचा भरपूर प्रमाणात उपयोग करून मोठे यश आपल्या पदरात पाडून घेणार आहात.अनेक दिवसापासून अपूर्ण असलेल्या आपल्या इच्छा या काळामध्ये पूर्ण होणार आहेत. आपले स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. पण या काळामध्ये क्रोधावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आपल्या शब्दाने कुणाचे मनात व भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.

६) कुंभ रास- कुंभ राशीवर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. हुताशनी पौर्णिमेपासून पुढे जीवनामध्ये सकारात्मक काळ येणार आहे. आनंदाचे नवे रंग आपल्या जीवनात भरणार आहेत. दारिद्र्याचा काळात आता समाप्त होणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल.कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत. आता इथून पुढे समाजामध्ये आपल्याला मानसन्मान प्राप्त होईल. आर्थिक क्षमता मजबूत बनेल.

नोकरीच्या क्षेत्रामध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होईल. एखादी नोकरी चांगली मिळू शकते. नोकरीसाठी काळ अनुकूल आहे. सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये आपल्याला नोकरी मिळण्याची योग आहे. घर जमीन तो आवाहन सुखाची प्राप्ती आपल्याला या काळामध्ये होऊ शकते. नवीन घरामध्ये आपण प्रवेश करू शकता .घर घेण्याची स्वप्न साकार होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होणार आहे. संततीकडून आनंदाची बातमी कानावर येणारा आहे. सुख समृद्धीने आपले जीवन फुलून येणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *