महाशिवरात्रीला करा हे उपाय, भगवान शंकर प्रसन्न होतील. चमकुन उठेल तुमचे भाग्य.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी महाशिवरात्री हा भगवान शिव भक्ताचा वर्षातील महत्त्वाचा सण आहे. महाशिवरात्री हा शिव आणि शक्तीच्या मिलनाचा महान सण आहे. शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवसापासूनच सृष्टीची सुरुवात झाली आहे असे मानले जाते. महाशिवरात्रीला रात्रीच्या वेळी भगवान शिव शंकराची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे.

भगवान शंकराला प्रसन्न करून तुम्ही तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकता. महाकाल शिव हे सहज प्रसन्न होणारे आणि भक्तांच्या ओंजळीत भरणारे देव आहेत. मनातील विकार, दुःख,दारिद्र्य, अकाली मृत्यूची भीती ग्रहदोष दूर करून पुत्र,संपत्ती,सुख समृद्धीत इत्यादी प्रधान करणारे आहेत. काही सोपे उपाय केल्याने भगवान शंकर प्रसन्न होऊन मनातील सर्व इच्छा पूर्ण करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात.

मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त आपल्या घरात समृद्धी राहण्यासाठी भगवान शिवाचे विविध उपाय करून त्यांना प्रसन्न करतात.

१) या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण करणे आणि शिवलिंगाला बेलपत्रांनी सजवणे हे तर महत्त्वाचे मानले जाते. पण त्याचबरोबर आपण शिवभक्त तल्लीन होऊन उपवास करावा.

२) जे निपुत्रिक आहेत अशा लोकांनी या दिवशी पिठाच्या शिवलिंगाची पूजा करावी. त्यांनी किमान अकरा शिवलिंग बनवावेत. आणि त्या सर्वांना अकरा वेळा गंगाजलाने अभिषेक करावा. नीट पूजा करावी मनापासून नियमित केली पाहिजे. असे केल्याने संतती योग तयार होतो.

३) शिवरात्रीला २१ बेलाची पाने घेऊन त्यावर चंदनाने ओम नमः शिवाय असे लिहावे. आणि ओम नमः शिवाय मंत्राच्या जपाने शिवाला अर्पण करा. असे केल्याने मनोकामना लवकर पूर्ण होतात.

४) जर तुम्हाला तुमच्या जीवनात पैसा, धान्य,सुख आणि समृद्धी हवी असेल तर शिव रात्रीच्या दिवशी शिवाला जव अर्पण करा. बार्ली हे पवित्र धान्य मानले जाते.

५) जर तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल आणि तुमची त्यापासून सुटका होत नसेल सर तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. मंत्र जपण्यापूर्वी भगवान शंकराची बेलपत्र,चंदन, फुले,फळे, धूप,दिवे इत्यादीनी पूजा करावी.

६) जर तणाव असेल आणि त्यातून सुटका हवी असेल शिवरात्रीला शिवाची पूजा करा आणि त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान १०८ वेळा जप करा. तुम्हाला यामुळे शांती मिळेल.

७) जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही संकटे येत असतील शिवरात्रीला पती-पत्नीने मिळून शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील.

८) जे लोक कोणत्याही कारणामुळे लग्न करू शकत नाहीत. त्यांनी शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर गाईच्या दुधात कुंकू मिसळून अभिषेक करावा. सकारात्मक परिणाम लवकरच दिसू शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *