संध्याकाळी या ५ गोष्टी कधीच करू नका.. घरात गरिबी आणि दारिद्र्य येते..

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी वास्तुशास्त्राला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे . वास्तुशास्त्राच्या नियमानुसार संध्याकाळी काही गोष्टी टाळण्याचे सांगितले आहे कुटुंबाच्या सर्वांगीण विकासासाठी वास्तूच्या तत्त्वाचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे घराच्या बांधकामा त किंवा देखभालीमध्ये वास्तूच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास कुटुंबातील सदस्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

अस म्हणतात की, संध्याकाळी काही विशेष कामे केल्याने वास्तुदोष निर्माण होतात संध्याकाळच्या वेळी या चुका केल्याने घराच्या आर्थिक समृद्धीवर खूप वाईट परिणाम होतो घरात दारिद्र्य येते आणि यामुळे सगळंच उध्वस्त होऊन जातात चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात सूर्यास्तानंतर कोणती कामे केली नाही पाहिजे.

१) उधार पैसे देऊ नये- वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी पैशाचे व्यवहार कधीही करू नयेत सूर्यास्तानंतर कोणालाही कर्ज देऊ नका आणि कोणाकडूनच कर्ज घेऊ नका असं म्हणतात की सूर्यास्तानंतर तुम्ही एखाद्याला कर्ज दिले तर ते परत मिळवण्यासाठी समस्या निर्माण होते या वेळेत घेतलेले कर्जाचे ओझे कधीच उतरत नाही.

२) तुळशीची पाने तोडू नये- तुळशीमध्ये देवी लक्ष्मी वास करते त्यामुळे संध्याकाळी चुकूनही तुळशीचे पाने तोडू नका असे केल्याने भगवान विष्णू नाराज होतात तुळशीचे पाने संध्याकाळी वेळी तोडल्यास रोग आणि आर्थिक समस्या यांना सामोरे जावे लागते संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा .

३) संध्याकाळी घर झाडू नये- वास्तुशास्त्रानुसार चुकूनही सूर्यास्तानंतर घर झाडू नये संध्याकाळी घर झाडल्याने माता लक्ष्मी घरात प्रवेश करीत नाही ज्यामुळे व्यक्तीचा आर्थिक स्थितीवर परिणाम होतो काही कारणास्तव घर झाडून घ्यावे लागत असेल तर त्यातून जमा झालेला कचरा घराबाहेर संध्याकाळी टाकू नका एका बाजूला गोळा करा आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतरच घराबाहेर काढा .

४) मुख्य दरवाजा बंद ठेवू नका- संध्याकाळी घराचा मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवा असे म्हणतात की सूर्यास्तानंतर घराचा मुख्य दरवाजा बंद ठेवू नये धार्मिक मान्यतेनुसार याचवेळी देवी लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा जर संध्याकाळी बंद असेल तर देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही ती आल्या पावली परत निघून जाते.

५) भांडणे करू नका- वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर घरात कधीही भांडण किंवा वादविवाद करू नका यामुळे लक्ष्मी देवी कोपते आणि घराभोवती दारिद्र्य येऊ लागते जर एखादा गरीब माणूस संध्याकाळी तुमच्या दारात आला तर त्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नका. तुमच्या क्षमतेनुसार अशा लोकांना काहीतरी दान करा यामुळे तुम्हाला पुण्य लाभेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *