रात्रभर खरकटी भांडी तशीच ठेवण म्हणजे समस्यांना आमंत्रण देणे. बघा तुम्ही तर नाहीना करत ही चूक, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागू शकतो..

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी घरातील प्रत्येक वस्तू आपल्या आयुष्यात ऊर्जा निर्माण करत असते. कधी सकारात्मक ऊर्जा तर कधी नकारात्मक. पण घरात आपल्याकडूनच काही चुका होऊन जातात आणि त्याचा परिणाम वाईट होतो. घरातील अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि इथेच आपण चुकतो.

घरातील काही अशा वस्तू आहेत ज्यामध्ये प्रचंड नकारात्मक शक्ती तयार होते. यामुळे घरात वास्तुदोष येतो. बरीच संकटे आपल्या घरावर येतात. घरातील स्वयंपाक घर हे घरातील महत्त्वाचा भाग मानला जातो. स्वयंपाक घरात लवकर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते .

यामुळे याची विशेष काळजी आपण घेतली पाहिजे. स्वयंपाक घरात बरेच लोक रात्रीचे खरकटे भांडी तशीच ठेवतात. आणि याचा घरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊयात. मित्रांनो आपल्याकडे रात्रीचे जेवण झाल्यानंतर अनेक घरांमध्ये लगेच सगळी भांडी घासून स्वच्छ करून ठेवायची पद्धत आहे.

पण हल्ली महिला रात्री उशिरापर्यंत बाहेर असतात. किंवा कामाच्या घाईत रात्रीच सगळी भांडी घासून ठेवणं जमत नाही पण शक्यतो घरातल्या सदस्यांनी तरी रात्रीची भांडी ठेवू नयेत. यामागे काही शास्त्र आहे काही धार्मिक कारणे सुद्धा आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार भांड्यांचा अधिपती ग्रह म्हणजे मंगळ आहे.

जर खरकटी भांडी रात्री तशीच ठेवली गेली, तर मंगळ ग्रह नाराज होतो. आणि त्यामुळे घरातील सुख शांती कमी होते. दुःख वाढत जातो. तसेच रात्रभर खरकटी भांडी तशीच ठेवल्याने चंद्र आणि शनी ग्रह ही नाराज होतात. यामुळे तुमचा आर्थिक नुकसान होऊ शकतं. तसंच घरातील व्यक्तींना मानसिक ताणही वाढू शकतो.

हिंदू धर्मशास्त्रानुसार सकाळी लवकर उठण, देवपूजा करण, ताटात अन्न न टाकण, अन्न वाया न घालवणे, सूर्यास्तानंतर केअर न काढण. अशा अनेक गोष्टी आवर्जून करायला सांगितले आहेत. या नियमांमुळे आपल्या जीवनात शिस्त लागते आणि दैनंदिन कार्य ही सुरळीत होते. रात्रीच्या वेळी खरकटी भांडी ठेवली न जाऊ नये असेही म्हटले जाते. खरकटी भांडी रात्रभर का ठेवू नयेत याबद्दल धर्मशास्त्रात काय सांगितलं गेलं आहे.

खरतर जेवण झाल्यानंतर लगेचच भांडी घासून स्वच्छ करून ठेवली पाहिजेत. असं धर्मशास्त्र सांगितला आहे. पण जरी लगेचच तुम्हाला हे करणं शक्य नसेल, तरीही रात्रभर खरकटी उष्टी भांडी तशीच ठेवू नका. अशा खरकट्या भांड्यांमुळे ग्रह नाराज होतात. आणि तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. शास्त्रामध्ये अनेकदा घराची स्वच्छता आणि साफसफाई बद्दल बोललं जातं.

ज्या घरात स्वच्छता राखली जाते तिथे पावित्र्य नांदत असे म्हणतात. जर घरात शुद्धता ,स्वच्छता ,पावित्र्य ठेवलं गेलं नाही, तर यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतो. रात्रीच्या वेळी खरकटी भांडी तशीच ठेवल्याने देवी लक्ष्मी नाराज होते. त्या घराची कधीही भरभराट होत नाही. तसेच पैसा आणटाई कारणांसाठी खर्च होतो. तशीच उष्टी खरकटी राहिलेली भांडी घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *