देवासमोर फोडलेला नारळ खराब निघाला तर संकेत काय? वाचा सविस्तर माहिती.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

जेव्हा तुम्ही एखाद्या मंदिरात जातात तेव्हा काय करता सगळ्यात आधी फुल आणि नारळ विकत घेता. आणि मंदिरात जाऊन तो नारळ फोडता. पण तो नारळ खराब निघाला तर? नक्की याचा अर्थ काय असतो आपल्या मनात नाना तरेच्या शंका येतात त्याला खरंच काही अर्थ असतो का? चला तर मग हे सगळं जाणून घेऊया

नारळ त्याला आपण श्रीफळ असं सुद्धा म्हणतो. हे श्रीफळ अर्थात नारळ हे खूप पवित्र मानलं गेलेला आहे. आणि म्हणूनच आपल्या अनेक पूजा विधि मध्ये याचा समावेश असतोच असतो. नारळाशिवाय आपलं कुठलच देवकार्य पूर्ण होत नाही असं म्हणायला हरकत नाही.

मला इतकं महत्त्व असण्याचं कारण आहे की नारळाचे झाड सुद्धा पवित्र असतं. नारळाचा सगळ्याच गोष्टींचा उपयोग माणसाला भरपूर प्रमाणे होतो. आणि धार्मिक दृष्ट्या नारळाचे महत्त्व आहेच यात काही शंकाच नाही. आणि म्हणूनच देवासमोर जेव्हा आपण जातो जशी फुल विकत घेतो तसेच नारळ ही विकत घेतो. आणि तो नारळ आपण देवासमोर फोडतो त्याचा प्रसाद मंदिरात आलेल्या इतर लोकांना सुद्धा देतो. उरलेला घरी घेऊन येतो. पण असा हा नारळ जेव्हा आपण देवासमोर फोडतो तेव्हा ते खराब निघतो.

आपल्या मनामध्ये बऱ्याच शंका येतात. काही वाईट तर घडणार नाही ना, आपलं काही चुकलं का, देवाचं काही करायचं राहून गेले का, अशा नाना तरी च्या शंकांनी मन अगदी भरून जाते. पण चिंता करण्याचं कारण नाही. नारळ जरी खराब निघाला तरी त्याचा एक अर्थ असा होतो की, तुमच्यावरचं कुठलं तरी मोठं संकट आता टळलेला आहे.

जे संकट तुमच्यावर येणार होते ते आता दूर झालेला आहे. मी तुमची पूजा देवापर्यंत पोहोचली आहे. बर आता याचा असा अर्थ घेऊ नका की नारळ खराब निघाला नाहीतर आपली पूजा पोहोचली नाही का देवापर्यंत मुळीच नाही. आपली पूजा तेव्हा सुद्धा देवापर्यंत पोहोचते. चांगला निघालेला नारळा पण इतरांना सुद्धा वाटायचं असतो. पण जेव्हा नारळ खराब निघतो तेव्हा मनात येणाऱ्या सगळ्या शंका बाजूला सरायच्या असतात.

आपल्यावरच कोणतरी मोठे संकट दूर झालेला आहे असं समजायच. देवाजवळ आपली प्रार्थना पोहोचली आहे असाच त्याचा अर्थ असतो . जीवनामध्ये तुम्हाला काही मोठ्या समस्या असतील तर त्या आता दूर होणार आहेत आणि आनंदाचे क्षण आता तुमच्या आयुष्यात येणार आहेत.

सकारात्मक विचार तुम्ही तेव्हा करायचा असतो आणि तो नारळ बाजूला ठेवून दुसरा देवासाठी घ्यायचा आणि तो फोडायचा आणि तो देवाला अर्पण करायचा. जेव्हा नारळ खराब निघतो आणि तुम्ही तुमच्या मनामध्ये असा विचार करता अरे बापरे ! मी आता कोणत्यातरी संकटातून वाचलो आहे. आणि माझ्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहेत. विचार केल्याने नक्कीच तुम्ही बघाल तुमच्या मनामध्ये शांतता निर्माण झाली आहे.

त्याचबरोबर तुमच्या मनातल्या साऱ्या संग काही बाजूला झालेले आहेत. आपण जेव्हा कुठलीही धार्मिक पूजा विधी करतो तेव्हा घडणाऱ्या अशा गोष्टींचा चित्र विचित्र अर्थ काढतो आणि मनाला त्रास करून घेतो. तो कधीही करून घेऊ नये नेहमी सकारात्मक विचार करावा. सकारात्मक अर्थ घ्यावा. त्यामुळे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना सुद्धा सकारात्मक घडतात. आणि नक्कीच सगळं अलबेल होत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *