नमस्कार मित्रांनो.
मंडळी जो जन्मला त्याचा मृत्यू अवश्य आहे. कोणाचा कधी मृत्यू होईल याची कोणालाच कल्पना नसते. पण मृत्यू हा होतोच. मृत्यू ही अटळ गोष्ट आहे. परंतु मृत्यू हा शेवट नाही. कारण आत्मा ही अमर आहे. आत्माही कधीच नष्ट होत नाही. आत्मा ही आपल्या कर्माप्रमाणे पुन्हा पुन्हा जन्म घेत असते. कधी पशुपक्षी तर कधी मानव शरीर, कधी जीव जंतू तर कधी वनस्पती अशा विविध रूपात आपणाला प्रवास करावा लागतो.
मृत्यू हे एक सत्य आहे जे कोणीही नाकारू शकत नाही. मृत्यूनंतर सुद्धा ती व्यक्ती त्यांचा विशेष व प्रिय वस्तूंसाठी या पृथ्वीवर भटकत असते. म्हणून मृत व्यक्तीच्या या वस्तू कधीच वापरू नका. नाहीतर तुम्ही अडचणीत याल. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या वस्तू तुम्ही नाही वापरल्या पाहिजे.
मित्रांनो आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला की आपण त्यांची आठवण म्हणून काही वस्तू तशाच जपून ठेवतो. कधी कधी काही लोक त्यांच्या वस्तू वापरतात सुद्धा परंतु गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीचे काही वस्तू आहेत. ज्यांचा वापर कधीही कोणीही करू नये असे सांगितले आहे. कारण मृत्यूच्या आधी ती व्यक्ती त्या वस्तू वापरत असतो.
नंतर त्या वस्तूंमध्ये त्या व्यक्तीची ऊर्जा तशीच असते. म्हणूनच मृत्यू झाल्यावर सुद्धा त्या व्यक्तीची त्या वस्तूंसाठी ओढ कायम असते. म्हणून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वस्तू तुम्ही कधीच वापरू नका. अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुमच्यावर बरेच संकटे येऊ शकतात. कारण आत्म्याने एकदा का शरीर सोडले तर ती आत्मा कोणाचीच राहत नाही. म्हणून ती मृत आत्मा अनेक प्रकारे त्रास देऊ शकते. त्यात पहिली वस्तू म्हणजे.
१) मृत व्यक्तीचे कपडे- मृत व्यक्तीचे कपडे कधीच परिधान करू नका. कारण पुढे तुम्ही जर मृत व्यक्तीचे कपडे परिधान केले तर त्यांची आत्मा तुमच्या सोबत जोडली जाते. आणि यामुळे त्या व्यक्तीच्या आठवणी आपल्याला त्रास देऊ लागतात. आणि ती मृत आत्मा आपल्याला मानसिक आणि शारीरिक दुर्बळ बनवते. म्हणून मृत व्यक्तीचे कपडे कधीच परिधान करू नका. तुम्ही मृत व्यक्तीचे कपडे दान केले पाहिजेत. मग ते कसेही असो.
२) दुसरी वस्तू म्हणजे मृत व्यक्तीचे दागिने- मृत व्यक्तीचे दागिने कधीही वापरू नये. कारण मृत्यूच्या आधी ते दागिने त्या व्यक्तीला खूप प्रिय असतात. आणि त्याच्या आठवणी त्या दागिन्यांसोबत जोडलेल्या जातात. तुम्ही जर मृत व्यक्तीचे दागिने वापरत असाल तर ती आत्मा तुमच्या आसपास भटकत असते.
आणि विशेष म्हणजे महिलांची दागिन्यांबद्दल ओढ मृत्यूनंतर सुद्धा कायम तशीच असते. जर तुम्ही दागिने वापरले तर तुम्हाला मानसिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणून कधीच मृत व्यक्तीचे दागिने वापरू नका. तुम्ही त्या मृत व्यक्तीचे दागिने मोडून त्याचे नवीन दागिने करून आणि मग ते वापरावे.
३) तिसरी वस्तू म्हणजे मृत व्यक्तीचे घड्याळ- मृत व्यक्तीचे घड्याळ कधीच वापरू नये. कारण घड्याळ हे एक ऊर्जा वाहक आहे. आणि घड्याळ ही व्यक्तीसोबत आयुष्यभर जोडले गेले असते. आणि त्या घड्याळामध्ये त्या व्यक्तीची वेळ दिसत असते. घड्याळ ही त्या व्यक्तीच्या चांगल्या वाईट काळाचा हिशोब ठेवते. आणि म्हणूनच मृत व्यक्तीचे घड्याळ कधीच वापरू नका. नाहीतर तुमच्यावर वाईट वेळ येऊ शकते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.