नमस्कार मित्रांनो.
४ नोव्हेंबरला आहे प्रबोधिनी एकादशी हीलाच देव उठणी एकादशी सुद्धा म्हटला जात. कारण की आषाढी एकादशीला जेव्हा श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेमध्ये जातात. ते या एकादशीला अर्थात देव उठणी एकादशीला पुन्हा जागे होतात. देव जागे झाल्याच्या आनंदात भक्त त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करतात. विशेष पूजा केली जाते.
जे वर्षभर एकादशीचा उपवास करत नाहीत. तेसुद्धा या एकादशीला उपवास करतात. देव उठणी एकादशीचे व्रत केल्याने माणसाला संपूर्ण एकादशीच व्रत केल्याचं पुण्य मिळत. आणि मृत्यूनंतरही मोक्ष प्राप्त होतो. परंतु ज्या व्यक्ती हे व्रत करू शकत नाही त्यांनी सुद्धा या दिवशी काही नियमांचा पालन मात्र कराव. काही गोष्टी चुकूनही खाऊ नयेत.
देव उठणी एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये. एकादशीच्या दिवशी भात खाल्ल्याने व्यक्तीचे सर्व पुण्य नष्ट होते असं मानलं जात. एकादशी तिथीला मसुराची डाळ वांगी सोयाबीन हे खाणं सुद्धा वर्ज आहे. त्याचबरोबर कांदा आणि लसणाचा वापर तर करूच नये. एकादशीच्या दिवशी भगवान नारायणाला पान अर्पण केलं जात. अशा स्थितीमध्ये व्यक्तीने पान सुद्धा खाऊ नये. या दिवशी मांस दारू अति तिखट मसालेदार पदार्थांचे सेवन करू नये. सात्विक आहार घ्यावा.
देव उठणी एकादशीच्या दिवशी दुसऱ्याच्या घरचे अन्न खाऊ नये. दुसऱ्याच्या घरचे पाणीही पिऊ नये. एकादशीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वीच घर जाणून घ्यावे. एकादशीच्या दिवशी केस दाढी नख कापू नयेत. तसेच ब्रह्मचर्याचे पालन करावे. एकादशीच्या रात्री उशिरापर्यंत जागरण करून देवाचे भजन कराव. उपवासाच्या दिवशी झोपू नये. या दिवशी तुळशीची पूजा केली जाते.
त्यामुळे तुळशीची पान तोडण्याची चूक सुद्धा करू नका. कोणाबरोबरही वाईट बोलू नये. खोटं बोलू नये. वडीलधाऱ्यांचा अपमान करू नये. आणि घरात वाद विवाद मुळीच करू नये. देव उठणी एकादशी पासून चातुर्मास संपतो. त्यामुळे मंगल कार्याची सुरुवात त्याच्या दुसऱ्या दिवशी पासनं केली जाते.
आता विवाहाचे मुहूर्त किंवा इतरही शुभकार्यांचे मुहूर्त आपल्याला देव उठणी एकादशीनंतर मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं देव उठणी एकादशीनंतर तुळशीचं लग्न केलं जात. आणि तुळशीच्या लग्नापासूनच सगळ्या मंगल कार्यांना सुरुवात होते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.