२५ ऑक्टोंबर अश्विन अमावस्या सूर्यग्रहण या राशींचे भाग्य चमकणार १२ वर्षे खूप जोरात असेल यांचे नशीब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथेला विशेष महत्त्व प्राप्त आहे. आणि आश्विन अमावस्या ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. कारण या अमावस्येला लक्ष्मीपूजन आणि इथून पुढे दीपावली ची खरी सुरुवात होत असते ही अमावस्या विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. यावेळी दोन दिवसांची अमावस्या तिथे येत आहे. कारण २४ आणि २५ ऑक्टोबर या दिवशी अमावस्या होणार आहे.

या अमावस्येला पवित्र स्नान आणि दानधर्म करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. पण अश्विन अमावस्येला अभ्यांग स्नानाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. हिंदू धर्मामध्ये दीपावलीचा सण हा खूप मोठा सण मानला जातो. पंचांगानुसार आश्विन अमावस्येला दीपावलीची सुरुवात होत असते. या दिवशी भगवान शनि देवाने माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा केली जाते.

मान्यता आहे की, दीपावलीच्या रात्री माता लक्ष्मी सर्वांवर कृपादृष्टी बरसत असते. माता लक्ष्मी सर्वांना आशीर्वाद देत असते. शास्त्रानुसार कार्तिक अमावस्येच्या रात्री देवी लक्ष्मी स्वर्गलोकांतून पृथ्वीवर येते आणि सर्वांच्या घरी जाते. ज्यांच्या घरी साफसफाई केलेली असते घर स्वच्छ बनवलेले असते घरामध्ये दीपावली म्हणजे त्या घरामध्ये दिवे लावलेले असतात.

सर्वत्र प्रकाश असतो आणि ज्या घरामध्ये विविध पूर्वक माता लक्ष्मी सोबत इतर देवतांची सुद्धा पूजा होत असते अशा घरांमध्ये माता लक्ष्मी वास करते. अशी मान्यता आहे आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने वर्षभर घरामध्ये सुख समृद्धी नांदते. दीपावलीचा उत्सव हा सर्वात महत्वपूर्ण मानला जातो.

मित्रांनो यावर्षी अमावस्येच्या दिवशी यावेळी खंडग्रास सूर्यग्रहण देखील लागत आहे. त्यामुळे यावेळी दीपावलीला ग्रहांचा अद्भुत सहयोग बनत असून यावेळी काही राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. हा संयोग अनेकांच्या मनामध्ये संभ्रम देखील निर्माण करत आहे. कारण अनेक वर्षांपूर्वी दीपावलीला असे ग्रहण लागत आहे.

मित्रांनो अश्विन कृष्णा अमावस्या दिनांक २५ ऑक्टोंबर २०२२ रोजी स्वाती नक्षत्रावर तुळ राशीमध्ये खंडग्रास सूर्यग्रहण होत आहे. हे ग्रहण भारतात ग्रस्तात खंडग्रास सूर्यग्रहण होईल. म्हणजे सूर्यग्रहण होत असतानाच सूर्याचा नक्ष होईल आणि नंतर ग्रहण मोक्ष होईल. २५ ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजून पंचावन्न मिनिटांची ग्रहण स्पर्श होणार असून सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी ग्रहण समाप्त होणार आहे.

पहाटे ०३ वाजून २६ मिनिटांपासून ग्रहणाचे वेध पाळले जाणार आहेत. बालवृद्ध अशक्त आजारी व्यक्ती तसेच गरोदर स्त्रियांनी ग्रहण बारा वाजून तीस मिनिटांपासून वेद पाळावेत. ग्रहण मोक्ष काळाचे स्नान सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी करावे. सूर्याचे प्रतिबिंब पाहून स्नान करून नेहमीच्या कामास लागावे.

मित्रांनो ग्रहण कालावधीमध्ये गरोदर स्त्रियांनी धारदार वस्तूंचा प्रयोग करू नये. उदाहरणार्थ भाजी चिरणे किंवा शिवणकाम करणे सुई धागा घेणे अशा प्रकारची कामे करू नयेत. आणि गर्भवती महिलांनी हे ग्रहण सुद्धा पाहू नये. असेच शास्त्रानुसार सांगण्यात आले आहे. यावेळी येणारी अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

मित्रांनो अमावस्या लक्ष्मीपूजनासाठी खास मानली जाते. यावेळी अमावस्येला अतिशय शुभ आणि सकारात्मक संयोग बनत आहेत. या संयोगाचा प्रभाव या काही खास राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. यंदाची दीपावली यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे.

कार्तिक कृष्णपक्ष हस्त नक्षत्र दिनांक २४ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५ वाजून २८ मिनिटानंतर अमावस्येला सुरुवात होणार असून २५ ऑक्टोंबर रोजी दुपारी ४ वाजून १९ मिनिटानंतर अमावस्या तिथी समाप्त होणार आहे. यावेळी सूर्य स्वाती नक्षत्रामध्ये प्रवेश करत आहेत. दुपारी १२ वाजून १८ मिनिटानंतर सूर्य स्वाती नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहेत.

अमावस्येपासून पुढे येणारा काळ या राशींसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणते आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. सोबतच सूर्यग्रहणाचा शुभ प्रभाव देखील दिसून येणार आहे. त्यामुळे आता इथून पुढे एका नव्या कारकिर्दीला सुरुवात होणार आहे. नशिबात आहे कसा सकारात्मक दिशेने वळण घेणार आहे. सूर्यग्रहणाच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य.

सूर्यग्रहणाचे मध्यम फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. तरीपण हा काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. आर्थिक दृष्ट्या प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने काय अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये देखील भरघोस यश प्राप्त होऊ शकते. धनलाभाचे योग बनत आहेत. यावेळी माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा आराधना करणारा विशेष महत्त्व प्राप्त आहे. जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत.

वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनावर या ग्रहणाचा अतिशय लाभकारी प्रभाव दिसून येणार आहे. अमावस्या आणि सूर्यग्रहणाचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. हा काळ आपल्यासाठी सर्वत्र दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. नशीबाची साथ स्वतःची प्रयत्न आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळून जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. मानसिक सुख शांती मध्ये देखील वाढ होणार आहे.

मनाला सतवणारे चिंता दूर होतील. मानसिक ताणतणावापासून आता मुक्त होणार आहात. येणारा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. उद्योग व्यापार कार्यक्षेत्र सर्व दृष्टीने आपल्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे आता एका नव्या प्रगतीची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. मित्रांनो या काळामध्ये आळशी बोनू नका. आळस आपल्याला सोडावा लागणार आहे आणि जोमाने कामे करण्याची गरज आहे.

एक दोन अपयश आले तरी घाबरू नका. माता लक्ष्मीची कृपा आपल्या राशी बरोबर असणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. संततीकडून आपल्याला प्रेम सुख पैसा हे दोन्हीही प्राप्त होणार आहे. पण आपले स्वतःचे कर्म देखील चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपण आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवून या काळाचा आनंद घ्यावा. हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

मिथुन राशि- मिथुन राशि साठी देखील सूर्यग्रहण आणि अमावस्येचा सुप्रभात दिसून येणार आहे. अमावस्येच्या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये एखादी सकारात्मक घटना घडवून येण्याचे संकेत आहेत. एखादी नवीन प्रेरणा आपल्या मनाला प्राप्त होऊ शकते. या प्रेरणेला आधार म्हणून नव्या जीवनाची सुरुवात आपण करणार आहोत. पण प्रयत्न मध्ये मात्र आपल्याला सातत्य ठेवावे लागणार आहे.

नशीब आपल्याला साथ देणार आहे. पण प्रयत्न आपल्याला करावीच लागते. कारण देवाने दिले आणि कर्माने नेले असे होऊ नये. असे जर पाहिजे नसेल तर आपल्याला आळसाला सोडून जिद्द आणि चिकाटीने कामाला लागण्याचे आवश्यकता आहे. या काळामध्ये संततीकडून सुख आणि मानसन्मान आपल्याला मिळणार आहे.

आपल्या मनात असणारी मुला-मुलींविषयीची काळजी आता समाप्त होणार आहे. त्यांचे जीवन सुखी आणि सुंदर बनणार आहे. आता इथून पुढे व्यापार कला साहित्य या क्षेत्रांमध्ये देखील मिथुन राशीच्या लोकांना चांगले यश प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापार भरभराटीस येणार आहे.

सिंह राशि- सिंह राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. अमावस्या आणि सूर्यग्रहणाचा अतिशय शुभ प्रभात आपल्या राशीवर दिसून येणार आहे. ग्रहणाचे उत्कृष्ट फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. इथून पुढे प्रगतीच्या नवापूर व आपल्या जीवनामध्ये सुरू होणार आहे. आपले कष्ट आपले प्रयत्न आता निश्चित फळाला येणार आहेत. मागील अनेक दिवसापासून ज्या काही दुःख यातना जीवनामध्ये चालू होत्या त्या आता समाप्त होणार आहेत.

प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. प्रत्येक संकटातून प्रत्येक परेशानीतून मार्ग आपल्यासाठी निघणार आहे. हा काळ आपल्या वैभवाच्या दृष्टीने आणि सौभाग्याच्या दृष्टीने देखील अनुकूल ठरणार आहे. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. जीवनामध्ये आनंदाची सुरुवात होणार आहे. या काळात आपल्याला पैशांची बचत करणे अत्यंत आवश्यक आहे.

अनावश्यक खर्च करणे आपल्याला टाळावे लागेल. या काळात केलेली पैशांची बचत पुढे चालून उपयोगी पडणार आहे. आपल्या मनातील महत्त्वपूर्ण गोष्टी मनातील इतर गुपिते इतर कोणालाही सांगू नका. आपल्या कितीही जवळचा व्यक्ती असला तरी त्याला आपल्या मनातील गुपित सांगू नका. नाहीतर आपले नुकसान होऊ शकते.

मित्रांनो माता लक्ष्मीची श्रद्धापूर्वक भक्ती आराधना करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. विशेष करून माता लक्ष्मीला पिवळ्या आणि लाल रंगाची मिश्रित फुले अर्पण करणे आपल्यासाठी अनुकूल ठरेल. त्यामुळे संततीचे प्रेम आणि पैसा हे दोन्ही आपल्याला प्राप्त होणार आहे.

धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. अमावस्येपासून पुढे त्यामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. विशेष करून ज्येष्ठ नागरिक जे धनु राशीचे ज्येष्ठ नागरिक आहेत. अशांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. या काळामध्ये संततीकडून प्रेम आपल्याला प्राप्त होईल.

संततीकडून आर्थिक सहाय्यता देखील आपल्याला मिळणार आहे. संतती विषयी मनात असलेली चिंता किंवा मनात असलेल्या राग आता दूर होणार आहे. पण या काळामध्ये रागावर आपल्याला नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. पैशांची उधळपट्टी न करता पैसा जपून ठेवणे आपल्यासाठी आवश्यक आहे. आर्थिक आवक या काळात चांगली होणार आहे. नव तरुणांसाठी प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत.

प्रेम जीवनामध्ये सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. एखाद्या नवीन चेहऱ्याच्या प्रेमात आपण पडू शकता. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्राला नवी चालना प्राप्त होणार आहे. करिअरमध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. परदेशामध्ये जाऊ नोकरी करण्याचे स्वप्न साकार होणार आहे. आता व्यापाराच्या दृष्टीने काही प्रवास देखील आपल्याला करावे लागू शकतील. आपले प्रवास लाभकारी ठरणार आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *