नमस्कार मित्रांनो.
मंडळी ज्योतिष शास्त्रात असा विश्वास आहे की, धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही काही वस्तू खरेदी करू नयेत. त्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात. धनत्रयोदशी हा दिवाळीचा महत्त्वाचा दिवस मानला जातो. हा सण समृद्धी आणि संपत्तीचा ही मानला जातो. यावर्षी २३ ऑक्टोंबरला धनत्रयोदशी साजरी होणार आहे.
असे मानले जाते की या दिवशी काही लोक ज्या विशेष वस्तू धातू जसे की सोने चांदी इत्यादी खरेदी करतात ते वर्षभर घरात सुख आणि समृद्धी घेऊन येतात. यासोबतच असाही विश्वास आहे की या दिवशी काही वस्तू आपण खरेदी नाही केल्या पाहिजेत. असे केल्याने तुमच्या घरात धनहानी होऊ शकते. आणि देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत.
धनत्रयोदशीला लोखंड खरेदी करू नका. असे मानले जाते की धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा धातू खरेदी करणे शुभ असते परंतु जर तुम्ही या दिवशी लोखंडाची कोणतीही वस्तू खरेदी केली. तर तुमच्या घरात सुख-समृद्धी येण्याऐवजी गरिबी येईल. शनिवारी आणि धनत्रयोदशीला लोखंडी वस्तू खरेदी केल्याने शनि दोष होतो असे म्हणतात.
तथापि जर तुम्ही लोखंडी भांडी किंवा इतर वस्तू एखाद्या गरजूला दान करण्यासाठी घेतल्यास ते शुभ मानले जात नाही. धनत्रयोदशीला प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करू नका. धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही काही खरेदी करत असाल तर प्लास्टिकची भांडी घेणे टाळावे. धनत्रयोदशीच्या दिवशी काही धातू खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्या दिवशी जे काही खरेदी केले जाते ते लक्ष्मीपूजनात वापरले जाते.
प्लास्टिकची वस्तू खरेदी केल्यास त्यामध्ये लक्ष्मीजींना काहीही अर्पण करणे किंवा पूजेसाठी वापरणे अशुभ मानले जाते. आर्टिफिशियल दागिने घेणे टाळा. धनत्रयोदशीच्या दिवशी लोक सोना चांदी हिऱ्यांचे दागिने खरेदी करतात. परंतु त्या दिवशी कृत्रिम दागिने घेऊ नका. कसे केल्याने तुमच्या जीवनात आर्थिक अडचणी येऊ शकतात. आणि अशा रीतीने माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते.
वास्तविक धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलेली कोणतीही वस्तू दिवाळीच्या वेळी धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीला अर्पण करा. तरच त्या गोष्टी वापरता येतील. आर्टिफिशियल ज्वेलरी अर्पण केल्यास घरात गरीब येते. शिक्षण साधने घेणे टाळा. धनत्रयोदशीच्या दिवशी लोक भांडी किंवा स्वयंपाक घरातील कोणतीही वस्तू खरेदी करतात.
या दिवशी अनेक स्त्रिया खरेदीचा शगुन म्हणून स्वयंपाक घराशी संबंधित काही वस्तू घेतात. जसे की चाकू कात्री तरी खरेदी करतात. परंतु या दिवशी कोणतेही तीक्ष् वस्तू किंवा उपकरणे खरेदी करू नयेत. असे केल्याने तुमच्या घरात भांडणे वाढू शकतात. आणि माता लक्ष्मीला रागही येऊ शकतो. जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीला जात असाल तर घरात सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी येथे सांगितलेल्या वस्तू घेणे टाळावेत.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.