दिवाळी आधी घरातल्या या जागा स्वच्छ करा, नाहीतर…

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

दिवाळीमध्ये सर्वांची जल्लोषात दिवाळी सुरू असते. स्वच्छते पासून ते खरेदी पर्यंत सर्वजण कामांमध्ये व्यस्त असतात. वास्तुशास्त्रानुसार धनाची देवता माता लक्ष्मी घरात टिकून राहण्यासाठी तुम्ही दिवाळीच्या अगोदर घरातील या काही कोपऱ्यांची स्वच्छता नक्की करा. या काही कोपऱ्यांची स्वच्छता करणे आवश्यक आहे. नाहीतर घरात माता लक्ष्मीचा प्रवेश होत नाही. अस म्हटल जात.

तर मग कोणत्या आहेत ते कोपरे सरला जाणून घेऊया. ज्या घरात स्वच्छता आणि प्रकाश असतो. त्या घरातच माता लक्ष्मी वास करते. तरी घरात स्वच्छता ठेवावी. धनत्रयोदशी आणि दिवाळीसाठी वास्तुशास्त्रामध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचे पालन करण्याचा प्रयत्न करावा. वास्तुशास्त्रानुसार घरातील सर्वात महत्त्वाचे स्थान आहे.

ईशान्य दिशा अर्थात ईशान्य कोपरा. आता ईशान्य कोपरा म्हणजे नक्की कोणता कोपरा. ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्या मधली दिशाही देवतांचे स्थान मानल जात. या दिशेला स्वयंपाक घर आणि देवघर असत. नसेल तरी हा कोपरा स्वच्छ केला पाहिजे. धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी स्वच्छ करावा. या दिवशी अनावश्यक वस्तू या कोपऱ्यामध्ये ठेवण टाळाव.

ईशान्य कोपरा स्वच्छ असेल तरच माता लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी याचबरोबर धनाची देवता कुबेर यांचा प्रवेश आपल्या घरामध्ये होतो यांची कृपा आपल्यावर होते. आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते. आणि त्याचबरोबर सूर्य पूर्व दिशेला उगवतो. हे तर आपल्याला माहीतच आहे. आणि घरात सकारात्मकतेचा प्रवेश सुद्धा याच दिशेने होतो.

त्यामुळे घराची पूर्व दिशा नेहमी स्वच्छ असावी. धनत्रयोदशी किंवा दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची पूर्व दिशा स्वच्छ करावी. पूर्व दिशेला जर तुमची अडगळीची खोली असेल तर ती सगळ्यात आधी स्वच्छ करा. घरातील ब्रह्मस्थान हे सुद्धा महत्त्वाच आहे. घराच्या मधल्या भागाला ब्रह्मस्थान असे म्हणतात. ही जागा नेहमी उघडी आणि स्वच्छ ठेवावी. शक्य असल्यास हवेशीर सुद्धा ठेवावी.

जड फर्निचर किंवा अनावश्यक वस्तू इथे ठेवू नये. त्याशिवाय या ठिकाणी तुटलेले फर्निचर सुद्धा ठेवू नये. विशेष म्हणजे दिवाळी आणि धनत्रयोदशीला या वस्तू घरामध्ये ठेवूनच चुकीच आहे. घरामधील या तीन जागा स्वच्छ राहिल्या तर माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते.

तसेच घरामध्ये सुख शांती आरोग्य नांदते. त्यामुळे प्रगती होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही दिवाळीची स्वच्छता सुरू केली असेल तर तुम्ही वास्तुशास्त्रानुसार स्वच्छता करा. घरातील त्यामुळे नकारात्मक ऊर्जा सगळीच दुर निघून जाईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *