नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो २०२२ चे शेवटचे ३ महिने असणार आहेत काही राशींसाठी खास आणि ते खास का असणार आहेत तर त्यांना सगळ्याच पातळ्यांवर नफा होणार. मग कोणत्या आहेत त्या राशी आणि कसा होणार आहे त्यांना नफा चला हे सगळ जाणून घेऊया. जेव्हा खरंतर वर्ष सुरू होत तेव्हा आपल्याला राशिभविष्य ची उत्सुकता असते.
आपल्याला नवीन वर्ष कसे जाणार आहे. पण आता वर्ष संपत आल आहे अस म्हणायला हरकत नाही. आणि मग २०२२ चे शेवट चे जे तीन महिने आहेत. ते काही राशींसाठी खास असणार आहेत. आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मिथुन रास.
मिथुन रास- २०२२ चे शेवटचे ३ महिने म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे मिथुन राशीसाठी फायदेशीर ठरणार आहेत. कारण तुमच्या राशीचा स्वामी बुध आहे. गुरु तुमच्या दहाव्या घरात असेल. तसेच गुरु हा तुमच्या दहाव्या आणि सातव्या घराचा कारक ग्रह आहे. या काळात तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील.
तुम्ही अविवाहित असाल तर तुम्हाला लग्नासाठी स्थळ सुद्धा येऊ शकतात. व्यवसायाचा विस्तार होण्याचीही शक्यता आहे. तसेच यावेळी तुम्हाला मानसन्मान सुद्धा मिळू शकतो. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. नोकरीत बदलही संपवतो. तसेच तुम्हाला तुमच्या नोकरीत बढती सुद्धा मिळू शकते आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ अनुकूल आहे.
तुळ रास- २०२२ चे शेवटचे तीन महिने आहेत ते तुळ राशीसाठी सुद्धा फायदेशीर ठरणार आहेत. यादरम्यान कामाच्या ठिकाणी तुळ राशीच्या व्यक्तींच कौतुक झालेल पाहायला मिळेल. त्याचबरोबर माण सन्मान ही त्यांना मिळेल.
यावेळी तुम्ही वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकता. व्यवसायात तुम्हाला नफाच होणार आहे. त्याचबरोबर राजकारणात सक्रिय असलेल्यांना पद मिळू शकत. तसच नोकरीतही वाढती मिळू शकते. त्यानंतरची रास आहे वृश्चिक रास.
वृश्चिक रास- वृश्चिक राशीला सुद्धा हे शेवटचे तीन महिने चांगले जाणार आहेत. कारण तुमच्या लाभाचा कारक बुध
आहे आणि गुरुची स्थिती ही तुमची संपत्ती आणि संतती ठरवते. त्यांची प्रकृती चांगली राहील. यावेळी तुम्ही ज्या कामात हात घालाल त्या कामात तुम्हाला यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. तसेच नोकरीच्या ठिकाणी बदल होऊ शकतात. अचानक आर्थिक लाभही होऊ शकतो. आता २०२२ चे शेवटचे तीन महिने ज्या राशीला लाभदायक ठरणार ती आहे राशी चक्रातील सुद्धा शेवटची रास अर्थात मीन रास.
मीन रास- मीन राशीला सुद्धा हे ३ महिने शुभ ठरू शकतात. कारण या शेवटच्या तीन महिन्यात असलेली गुरु आणि बुधाची स्थिती तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच नवीन नोकरीची ऑफर सुद्धा येऊ शकते.
व्यवसायात गुंतवणुकीसाठी सुद्धा काळ अनुकूल आहे. व्यवसाय विस्तारण्याची ही शक्यता आहे. व्यवसायात लाभ होऊ शकतो. स्पर्धात्मक परीक्षांसाठी किंवा स्पर्धात्मक तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काळ अनुकूल आहे.
तुम्ही कोणत्याही उच्च संस्थेत प्रवेश घेऊ शकता. दुसरीकडे जे लोक अविवाहित आहेत त्यांना सुद्धा स्थळ येऊ शकतात. थोडक्यात काय तर या चार राशींसाठी वर्षाचे शेवटचे तीन महिने चांगले जाणार आहेत. अर्थात वर्षाचा शेवट त्यांचा गोड होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. यामध्ये तुमची रास आहे की नाही नक्की सांगा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.