या ३ राशींच्या लोकांनी नक्की बांधा लाल धागा लवकरच मिळेल यश.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

लाल रंगाचा धागा कोणत्या राशींच्या व्यक्तींनी आपल्या हातावर बांधायला हवा याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. लाल रंग हा माता लक्ष्मीचा रंग मानला जातो. माता लक्ष्मीला वस्तू अर्पण केल्या जातात त्या पण लाल रंगाच्या. माता लक्ष्मीला लाल रंग प्रिय आहे.

हा लाल रंगाचा धागा जर आपण आपल्या हातात बांधला तर आपल्यावर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद कायम राहतो. त्यामुळे आपल्याला आपल्या उद्योगधंद्यात नोकरी व्यवसायात यश मिळते असे म्हणतात. मित्रांनो लाल रंग जसा माता लक्ष्मीशी निगडित आहे. कसा असतो बजरंग बली हनुमानांशी निगडित आहे‌.

त्यांचा तो आवडता रंग आहे. सेंदूर आणि लाल रंग याच जवळच नात आहे. आणि म्हणूनच लाल रंग धारण केल्याने हनुमान देखील प्रसन्न होतात. आपण अशा तीन राशी बघणार आहोत ज्यांच्यासाठी लाल रंग हातात धारण करणे भाग्याच मानल जात. कोणत्या आहेत त्या तीन राशी चला जाणून घेऊया. पहिली रास आहे ती म्हणजे सिंह रास.

सिंह रास- सिंह राशीचे लोक अत्यंत कर्तुत्ववान असतात. पराक्रमी असतात. मोठे काहीतरी काम करून दाखवण्याची धमक त्यांच्यामध्ये असतेच परंतु अनेक वेळा मागील जन्मा तील काही पाप कर्म केलेली असतील तर त्यामुळे त्यांना अनेक कष्टांना सामोरे जावे लागते. हे लोक धैर्यवान आहेत. पराक्रमी आहेत. मात्र त्यांचे पूर्वकर्म त्यांच्या प्रगतीच्या आड येऊ शकत. त्यामुळे या पूर्वकर्मातून मुक्ती मिळण्यासाठी या लोकांनी लाल रंगाचा धागा हातात बांधावा.

तसेच लाल रंगाचा धागा हा मंगळवारी बांधवा. तसेच जेणेकरून हनुमानाची आणि माता लक्ष्मीची कृपा त्यांच्यावर सदैव राहील. परिणामी सर्व समस्येतून त्यांची सुटका होईल. म्हणूनच ज्यांना या सगळ्याचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी मंगळवारी हनुमानाचे दर्शन घेऊन आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन लाल रंगाचा धागा आपल्या उजव्या हातात बांधावा अस म्हटल जात. मित्रांनो जी दुसरी रास आहे ती आहे.

कर्क रास- कर्क राशीचे लोक दयाळू कष्टाळू असतात आणि कोणताही प्रकारचे काम अगदी वेगाने करणे आणि कामाचा विस्तार वाढवणे त्यांना चांगले जमते. त्यांनी कोणतेही काम हाती घेतले की ते पूर्णच करतात. अतिशय कौशल्यपूर्ण आणि छोट्या छोट्या बाबींचा विचार करत ते काम पूर्ण करतात. अष्टपैलू व्यक्तिमत्व अशा या व्यक्ती असतात.

आणि या राशीच्या लोकांनी हा लाल रंगाचा धागा धारण करण पुण्याच मानल जात. त्यांच्यावर देखील हनुमानाची आणि माता लक्ष्मीची कृपा होते. त्यांच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात. सर्व काही सुख-समृद्धी त्यांना मिळते. म्हणून त्यांनी देखील लाल रंगाचा धागा मंगळवारी हातात बांधावा अस सांगण्यात येत. मंडळी तिसरी रास आहे.

मिथुन रास- मिथुन राशीचे लोक नेहमी चंचल असतात. त्यांना कोणताही प्रकारच्या निर्णय यावर ठाम राहता येते. हे लोक अतिशय बुद्धिमान देखील असतात. त्यांच्यामध्ये बोलण्याचे कौशल्य चांगले असते. कोणत्याही प्रकारचे मोठे डील ते करू शकतात. म्हणूनच मोठ्या कंपनीमध्ये सीईओ पदावरती या राशीचे लोक आढळून येतात.

ही लोक ज्या कंपनीमध्ये काम करत असतील तर त्यांच्या कामाचा प्रभाव देखील तिथल्या लोकांवर पडत असतो. पण मंडळी मिथुन राशीचे लोक बुद्धिमान असूनही त्यांची चंचलता त्यांच्या प्रगतीच्या आड येऊ शकते. परिणामी काही वेळा त्यांना अपयशाचा सुद्धा सामना करावा लागतो. त्यांची कीर्ती तर खूप असते मात्र त्यांच्या हातात म्हणाव अस यश पडत नाही.

मग अशावेळी मिथुन राशीच्या लोकांनी शुक्रवारच्या दिवशी लाल रंगाचा धागा बांधणे शुभदायी ठरते. ज्योतिष शास्त्रानुसार असा धागा शुक्रवारच्या दिवशी हातात बांधल्याने त्यांच्या मनातील चंचलता कमी होते. त्यांनी हाती घेतलेली काम पूर्ण होतात. आणि त्यांचे मन कुठेही भटकत नाही. मग मंडळी तुमची रास काय आहे. आणि याबाबतीतला तुमचा अनुभव काय आहे. आम्हाला नक्की सांगा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *