नमस्कार मित्रांनो.
७ ऑगस्ट रोजी शुक्र कर्क राशीत गेला आहे. आता ३१ तारखेपर्यंत तो या राशीमध्ये असेल. कर्क कन्या मीन या राशीच्या लोकांसाठी शुक्राची ही स्थिती शुभ राहील. आणि त्याचबरोबर पाच वर्षांसाठी मात्र हा काळ योग्य असणार नाही. आणि त्याचबरोबर राहिलेल्या राशींवर शुक्राचा संमिश्र परिणाम दिसून येईल. तर जाणून घ्या की ३१ ऑगस्टपर्यंतचा काळ कोणासाठी शुभ असेल आणि कोणासाठी अशुभ.
मी मगाशी म्हटल तस कर्क, कन्या, मीन या राशीसाठी असेल शुभकाळ. कर्क, कन्या आणि मीन राशीच्या लोकांना शुक्राच्या चाल बदलामुळे नोकरीचे फायदे मिळतील. कर्क, कन्या आणि मीन राशीच्या लोकांना चांगला काळ येईल. या तीन राशीच्या नोकरदार आणि व्यावसायिक लोकांना भरपूर फायदा होऊ शकतो. कामाच कौतुक होईल आणि पुढे जाण्याची संधी सुद्धा मिळू शकेल.
नशिबाची साथ सुद्धा मिळेल. शत्रूंवर विजय मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल. स्वतःवर खर्च कराल. छंद पूर्ण होतील आणि विश्रांतीही मिळेल त्याचबरोबर वृश्चिक राशी सह चार राशी अशा आहेत. ज्यांच्यासाठी हा काळ सामान्य असेल. कर्क राशि मध्ये शुक्र गेल्यामुळे मेष, वृषभ, मिथुन आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी काळ सामान्य राहील.
या राशीच्या लोकांचे आरोग्य सुधारेल परंतु दैनंदिन कामात अडथळे येऊ शकतात. खर्च वाढू शकतो पण साथीदाराची साथ मिळेल. त्यामुळे बरीच काम मार्गी लागतील. मेष, सिंह आणि धनु राशीच्या लोकांसाठी मात्र काळ अशुभ असेल. शुक्राच्या चाल बदलामुळे सिंह, धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल.
या लोकांचा खर्च वाढू शकतो. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. गुपित उघड होऊ शकतात. मेहनतही जास्त करावी लागेल. जोडीदाराची वादविवाद ही होऊ शकतात. रागावर नियंत्रण न ठेवल्यास मोठ भांडणही होऊ शकत. त्यामुळे थोडा संयम धरा. हा ही काळ निघून जाईल.
मंडळी हे होत शुक्राच्या राशी परिवर्तनाच फळ पण अर्थात आता शुक्र हा ग्रह तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये कुठल्या घरामध्ये कुठल्या ग्रहांसोबत बसला आहे. त्याचप्रमाणे त्याची अवस्था कुठली आहे. त्यानुसार तुम्हाला हे फळ कमी जास्त प्रमाणात मिळू शकत. म्हणजे जरी तुमची रास कन्या असेल किंवा कर्क असेल किंवा मीन असेल पण शुक्राच हे फळ तुम्हाला जर हव तेवढ मिळाल नाही.
तर नक्कीच तुमच्या वैयक्तीक कुंडली मध्ये शुक्र ग्रह हा कमकुवत असू शकतो आणि म्हणून तुम्हाला त्याप्रमाणे फळ मिळत नाही. असा त्याचा अर्थ होतो. आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या कुंडलीतला शुक्र ग्रह मजबूत करावा लागेल. त्यासाठी तुम्ही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला नक्की घ्या. त्याचबरोबर तुम्ही रोज जर महालक्ष्मी अष्टक म्हटल तर नक्कीच तुमचा शुक्र ग्रह मजबूत होईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.