दिनांक ८ ऑगस्ट पुत्रदा एकादशी या राशींची लागणार लॉटरी पुढील १२ वर्ष राजयोग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्व सांगितले जाते. आणि त्यातच पुत्रदा एकादशीही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. विष्णू भक्तांसाठी किंवा महाराष्ट्रात विठ्ठल भक्तांसाठी हा दिवस विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येत असतात.

एक येते कृष्ण पक्षात आणि दुसरी येते ती शुक्लपक्षात. वर्षातून एकूण 24 एकादशी येत असतात. एकादशीचा दिवस हा पूर्णपणे भगवान विष्णूंना समर्पित असतो. या दिवशी विधी विधान पूर्वक भगवान विष्णूची पूजा आराधना केली जाते. मान्यता आहे की, एकादशीला व्रत उपास करून भगवान विष्णूची पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात.

मित्रांनो श्रावण महिन्यात येणाऱ्या एकादशी तिथीला पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते. या एकादशीला पवित्र एकादशी असे देखील म्हटले जाते. या दिवशी संतान प्राप्तीसाठी व्रत उपास करणे विशेष लाभकारी मानले जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान विष्णूची पूजा आराधना करणे शुभ मानले जाते.

पूजेमध्ये गंगाजल आणि तुळशीच्या पानाचा उपयोग करणे देखील शुभ मानले जाते. यावेळी येणारे एकादशीही श्रावण सोमवारी येत असल्यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. कारण एकादशीच्या व्रताबरोबरच श्रवण सोमवारचे व्रत देखील पूर्ण होणार आहे. त्यामुळे या दिवशी महादेवाची पूजा करणे आणि शिवलिंगावर जल अर्पण करून सोबतच बेलपत्र वाहने शुभ फलदायी मानले जाते.

या दिवशी पवित्र पवित्रता पाळणे आवश्यक आहे‌ मित्रांनो मास मधीरे पासून दूर राहणे या दिवशी अत्यंत आवश्यक आहे. सोबतच या दिवशी या दिवशी मनात सुद्धा वाईट विचार येऊ देऊ नये. हा दिवस भगवान भोलेनाथ आणि भगवान श्री विष्णूना समर्पित असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाले आहे. या दिवशी दिवसभर ईश्वराचे नामस्मरण करणे आवश्यक आहे.

श्रावण शुक्लपक्ष ज्येष्ठा नक्षत्र दिनांक ८ ऑगस्ट रोजी सोमवार पुत्रदा एकादशी आहे. एकादशीच्या शुभ प्रभावाने या काही खास राशींचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. एकादशीपासून पुढे येणारा काळ यांच्या जीवनाला एक नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे. आता जीवनात मोठे सकारात्मक परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही.

भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी बरोबरच भगवान भोलेनाथाची विशेष कृपा या राशीवर बसणार आहे. जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. अतिशय शुभ आणि सुंदर काळ आपल्या वाटेला येण्याची संकेत आहेत. तर चला वेळ वायांना घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून.

मेष राशी- मेष राशीवर पुत्रदा एकादशीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बसणार असल्यामुळे कौटुंबिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. त्यासोबतच संतानसंबंधी ज्या काही समस्या चालू असतील त्या संतती संबंधी ज्या काही समस्या आपल्या जीवनात चालू आहेत त्या समस्या हातात दूर होणार आहेत. प्रगतीचे अनेक मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होणार आहेत.

मित्रांनो यशाच्या शिखरावर विराजमान होण्यासाठी वेळ आली आहे. आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. करिअरच्या दृष्टीने सुद्धा काळ आपल्यासाठी लाभकारी करणार आहे. करिअर विषयी एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. व्यापारातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होतील. नोकरी विषयी हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे.

मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता बदलत आहेत. यशाचे नवे मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत. आपल्या कल्पनेत असलेल्या योजना आता प्रत्यक्षात उतरण्याचे संकेत आहेत. अनेक दिवसापासून ज्या योजना आपल्या डोक्यात होत्या त्या आता प्रत्यक्षात उतरतील त्या योजना साकार बनतील. येणाऱ्या काळात आपल्या जीवनात अतिशय मोठे यश आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. पण गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. शेअर मार्केट बँकिंग क्षेत्रात इतर कुठल्याही क्षेत्रात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेऊन जर आपण गुंतवणूक केली तर निश्चित आपल्याला त्यापासून चांगला लाभ प्राप्त होऊ शकतो. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. हा काळ आपल्यासाठी आनंददायी ठरणार आहे.

सिंह राशि- सिंह राशि वर पुत्रदा एकादशीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. जीवनात आपल्याला यश प्राप्तीचे नवे मार्ग उपलब्ध होतील. मागील अनेक दिवसापासून आपण करत असलेल्या कामांना आता यश प्राप्त होणार आहे. मित्रपरिवार आपली चांगली मदत करणार आहेत. करिअरमध्ये सध्या चालू असणाऱ्या अडचणी अडथळे दूर होणार असून प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत.

माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार असल्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी समाप्त होण्याचे संकेत आहेत. ज्या कामाची सुरुवात कराल त्यामध्ये आपल्याला चांगले यश प्राप्त होणार आहे. लघुउद्योग किंवा छोटासा उद्योग उभार ण्यासाठी अनुकूल ठरेल. त्याबरोबर पैशांची गुंतवणूक करण्याची काळ लाभकारी ठरणार आहे. फक्त गुंतवणूक करण्याआधी पूर्ण माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे.

तूळ राशी- तुळ राशीवर भगवान विष्णूंची विशेष कृपा बरसणार असून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. एकादशीपासून पुढे जीवनाला शुभ काळाची शुभ दीशेची प्राप्ती होणार आहे. आत्तापर्यंत कल्पनेत असणाऱ्या किंवा आपल्या मनामध्ये असणाऱ्या योजना आता प्रत्यक्षात उतरतील. आणि प्रत्येक योजना यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवणार आहात.

करिअरच्या दृष्टीने उत्तम फलदायी काल ठरणार आहे. करिअर विषयी एखादी सुंदर वार्ता शुभ वार्ता कानावर येऊ शकते. प्रेम जीवनामध्ये निर्माण झालेली निराशा आता दूर होणार आहे. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. मित्रांनो संसारिक जीवनामध्ये सुद्धा पती-पत्नी मधील प्रेमात वाढ होणार आहे.

अनेक दिवसांची अपूर्ण राहिलेली आपली एखादी जुनी इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते‌ संतती विषयी आनंदाची बातमी कानावर येण्याची योग आहे. मित्रांनो या काळामध्ये नवदांपत्याच्या जीवनामध्ये चिमुकल्या पाहण्याचे आगमन होऊ शकते. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर एकादशीचा शुभ प्रभाव दिसून येईल. जीवनात ज्या काही समस्या चालू आहेत किंवा जे काही दुःख चालू आहेत ती आता समाप्त होणार आहेत. हळूहळू एका नव्या दिशेने प्रगतीला सुरुवात होणार आहे .मागील काळात झालेले आपले नुकसान आता या काळात भरून निघणार आहे. एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. आपण सातत्याने जे प्रयत्न करत आहात ते प्रयत्न आपल्याला खूप पुढे घेऊन जाणार आहेत.

या काळात एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याची ओळख आपल्याला होऊ शकते. राजकारणामध्ये पदार्पण होण्याचे योग आहेत. त्यामुळे सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपला मानसन्मान वाढणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. या काळात निश्चित केलेले ध्येय पुढे चालून खूप मोठे रूप घेणार आहे. आपले ध्येय साकार होण्याचे योग बनत आहेत.

धनु राशि- धनु राशिवर माता लक्ष्मीचा वर्धास्थ कायम राहणार आहे. संसारिक जीवनात ज्या काही समस्या सध्या चालू आहेत. त्या आता समाप्त होतील प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने सुद्धा अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. एखाद्या मोठ्या व्यापाराची ओळख अथवा मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते.

आपल्या ओळखीमुळे आपल्याला चांगले लाभ त्यापासून मिळणार आहेत. मित्रांनो या काळात संसारिक सुका विषयी आपल्याला एक सकारात्मक अनुभूती होणार आहे. घरामध्ये धार्मिक अथवा मंगल कार्य आयोजित होण्याची संकेत आहेत. अध्यात्माची आवड सुद्धा या काळात आपल्याला निर्माण होऊ शकते. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.

मीन राशि- मीन राशिवर एकादशीचा शुभ प्रभाव दिसून येईल. अनेक दिवसापासून करत असलेल्या सततच्या प्रयत्नांना आता यश प्राप्त होणार आहे. मित्रांनो काल आपल्या जीवनाला एक सकारात्मक दिशा देणारा कालखंड आहे. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या आशीर्वादाने जे काही प्रयत्न आपण अनेक दिवसांपासून करत आहात ते प्रयत्न आता सफल ठरतील. फलदायी ठरतील. आर्थिक प्राप्ती भरपूर प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *